शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात ५ महिन्यात ८ टक्के मतदार वाढ ही मतचोरीच- हर्षवर्धन सपकाळ
4
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
5
'या' केसांच्या तेलामुळे गुंतवणूकदार झाले मालामाल! एका दिवसात २०% नफा, स्टॉक झाला रॉकेट!
6
"एक, दोन नव्हे, पत्नीने केली पाच लग्नं, आता दिरासोबत करतेय प्रेमाचे चाळे’’, त्रस्त पतीची पोलिसांत धाव 
7
Crime: शिक्षिकाचे शाळेतच नको ते उद्योग; २४ विद्यार्थिनींसोबत...; नराधमाला अटक!
8
IND vs ENG: ऋषभ पंत-केएल राहुलच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी गोलंदाजाचा आरोप, अंपायरनाही सुनावलं...
9
५ वर्षात चौपट झाला गुंतवणूकदारांचा पैसा, आता प्रत्येक शेअरवर मिळणार डिविडेंड; तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
11
इराणच्या बाजुलाच आहे अमेरिकन लष्कराचा ताफा, कशासाठी झाला आहे वापर?
12
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
13
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
14
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
15
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
16
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
17
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
18
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
19
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
20
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  

१९०० फेरीवाल्यांना मिळणार दीड हजार रुपये !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:39 IST

वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या ...

वाशिम : राज्यात मिनी लॉकडाऊनची घोषणा करताना राज्य सरकारने फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार रिसोड शहरातील ८०० आणि वाशिम शहरातील ११०० अशा एकूण १९०० फेरीवाल्यांना दीड हजाराचा लाभ मिळणार आहे.

राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यापूर्वी निर्बंध कडक करण्यात आले होते. मात्र, कोेरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने १३ एप्रिल रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंध अधिक कठोर करण्याची घोषणा केली. मिनी लॉकडाऊनमुळे गोरगरीब नागरिक, फेरीवाले आदींना थोडाफार दिलासा म्हणून नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांना प्रत्येक दीड हजार रुपये दिले जाणार आहेत. रिसोड नगर परिषदेंतर्गत ८०० फेरीवाल्यांची नोंद आहे. वाशिम नगर परिषदेंतर्गत फेरीवाल्यांची नोंद नाही; मात्र यापूर्वी केंद्र सरकारने फेरीवाल्यांसाठी जाहिर केलेले अर्थसहाय्य देण्यासाठी ११०० फेरीवाल्यांना अधिकृत प्रमाणपत्र दिले होते. यानुसार या फेरीवाल्यांना मदत मिळाली होती. याच धरतीवर मदत मिळाली तर वाशिम शहरातील ११०० फेरीवाल्यांना याचा लाभ होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. फेरीवाल्यांच्या बँक खात्यात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य जमा केले जाणार असल्याने बँक खाते, आधार कार्ड व अन्य कागदपत्रे जमा केली जाणार आहेत. ही कार्यवाही वरिष्ठांच्या सूचनेनुसार केली जाणार आहे.

0000

कोट बॉक्स

मिनी लॉकडाऊनमुळे आमच्यासमोर बिकट आर्थिक प्रश्न निर्माण होतो. एक महिनाभर कडक निर्बंध असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा? हा प्रश्न आहे. सरकारने जाहिर केलेल्या मदतीचा थोडाफार दिलासा मिळू शकेल.

- अ. हबीब अ. कय्यूम

00

मिनी लॉकडाऊन असल्याने रोजगाराचा प्रश्न उभा ठाकला आहे. दीड हजार रुपये जाहिर केले आहेत. मात्र, ही रक्कम नेमकी केव्हा मिळणार हे अजून स्पष्ट नाही. फेरीवाल्यांना यामुळे थोडाफार दिलासा मिळाला.

- शुभम कांबळे

००००

रिसोड शहरात ८०० फेरीवाल्यांची नोंद आहे. या फेरीवाल्यांना राज्य सरकारच्या नवीन घोषणेनुसार दीड हजार रुपयांची मदत मिळणार आहे. वरिष्ठांच्या सुचनेनुसार या योजनेची अंमलबजावणी केली जाईल.

- गणेश पांडे,

मुख्याधिकारी, नगर परिषद रिसोड

००००

काय समस्या..

मिनी लॉकडाऊनमुळे धंदा कसा करावा हा महत्वाचा प्रश्न आहे.

००००

जिल्ह्यातील नोंदणीकृत फेरीवाले

१९००

००