शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:00 IST

वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ९७ धरणे कोरडी पडली असून, सहाही तालुके पाण्याच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये सापडली आहेत. पाण्यासाठी हाहा:कार माजलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, त्यास आधीच उशीर होण्यासोबतच दिरंगाई होत असल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिकच गहण होत चालली आहे.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला. यामुळे वाढत्या बाष्पीभवनाचा प्रचंड परिणाम होवून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार सद्य:स्थितीत मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असून वाशिम तालुक्यातील एकबूर्जी प्रकल्पात १३; तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पात १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठ्याची सद्य:स्थिती मात्र फारच चिंताजनक असून वाशिम तालुक्यातील ३५ लघूप्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ३ टक्के पाणी उरले आहे. बोराळा, शेलगाव, फाळेगाव आणि पंचाळा या चार प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर ३१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे.मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ३.५० टक्के पाणी शिल्लक असून ५ प्रकल्प वगळता इतर १८ प्रकल्पांची पातळी शून्य टक्के आहे. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२५ टक्के पाणी शिल्लक असून १५ प्रकल्पांची पातळी शून्यावर आहे. मंगरूळपीर तालुक्यात १५ प्रकल्प असून २ प्रकल्पांमध्येच ३ टक्के पाणी शिल्लक असून इतर सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये १० टक्के पाणी शिल्लक आहे; तर उर्वरित १४ प्रकल्प पूर्णत: कोरडे झाले आहेत. जिल्ह्यातील या पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती मात्र थोडी चांगली असून १६ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्के पाणीसाठा आजमितीस शिल्लक असून इतर ८ प्रकल्पांची पातळी शून्यावर गेलेली आहे. एकूणच पाणी उपलब्धतेच्या बाबतीत सर्वच तालुके थोड्याफार फरकाने ‘डेंजर झोन’मध्ये सापडले असून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह अन्य पाणीपुरवठा योजनांवर प्रचंड परिणाम झाला आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत पाणी पुरावे, या उद्देशाने प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यावर कात्री लावण्यात आल्याने शहरांमध्ये १० दिवसानंतरच नळाला पाणी सोडले जात आहे. ग्रामीण भागात आजपर्यंत केवळ १६ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होवू शकला. त्यातही सातत्य नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण