शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

१३४ प्रकल्पांमध्ये उरला जेमतेम ७ टक्के जलसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 14:00 IST

वाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३१ लघू अशा १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. ९७ धरणे कोरडी पडली असून, सहाही तालुके पाण्याच्या बाबतीत ‘डेंजर झोन’मध्ये सापडली आहेत. पाण्यासाठी हाहा:कार माजलेल्या गावांमध्ये पाणीटंचाई निवारण उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र, त्यास आधीच उशीर होण्यासोबतच दिरंगाई होत असल्याने समस्या सुटण्याऐवजी अधिकच गहण होत चालली आहे.दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी संपूर्ण वाशिम जिल्ह्यात तापमानाने उच्चांक गाठला. यामुळे वाढत्या बाष्पीभवनाचा प्रचंड परिणाम होवून जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमधील पाणीपातळी झपाट्याने कमी झाली आहे. जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार सद्य:स्थितीत मालेगाव तालुक्यातील सोनल या मध्यम प्रकल्पाने तळ गाठला असून वाशिम तालुक्यातील एकबूर्जी प्रकल्पात १३; तर कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पात १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पांमधील उपलब्ध जलसाठ्याची सद्य:स्थिती मात्र फारच चिंताजनक असून वाशिम तालुक्यातील ३५ लघूप्रकल्पांमध्ये आजमितीस केवळ ३ टक्के पाणी उरले आहे. बोराळा, शेलगाव, फाळेगाव आणि पंचाळा या चार प्रकल्पांचा अपवाद वगळता इतर ३१ प्रकल्पांची पाणीपातळी शून्यावर पोहचली आहे.मालेगाव तालुक्यातील २३ प्रकल्पांमध्ये सद्या ३.५० टक्के पाणी शिल्लक असून ५ प्रकल्प वगळता इतर १८ प्रकल्पांची पातळी शून्य टक्के आहे. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांपैकी ३ प्रकल्पांमध्ये सरासरी ३.२५ टक्के पाणी शिल्लक असून १५ प्रकल्पांची पातळी शून्यावर आहे. मंगरूळपीर तालुक्यात १५ प्रकल्प असून २ प्रकल्पांमध्येच ३ टक्के पाणी शिल्लक असून इतर सर्व प्रकल्प कोरडे पडले आहेत. मानोरा तालुक्यातील २४ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये १० टक्के पाणी शिल्लक आहे; तर उर्वरित १४ प्रकल्प पूर्णत: कोरडे झाले आहेत. जिल्ह्यातील या पाच तालुक्यांच्या तुलनेत कारंजा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती मात्र थोडी चांगली असून १६ प्रकल्पांपैकी ९ प्रकल्पांमध्ये सरासरी १७ टक्के पाणीसाठा आजमितीस शिल्लक असून इतर ८ प्रकल्पांची पातळी शून्यावर गेलेली आहे. एकूणच पाणी उपलब्धतेच्या बाबतीत सर्वच तालुके थोड्याफार फरकाने ‘डेंजर झोन’मध्ये सापडले असून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांसह अन्य पाणीपुरवठा योजनांवर प्रचंड परिणाम झाला आहे. आगामी पावसाळ्यापर्यंत पाणी पुरावे, या उद्देशाने प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यावर कात्री लावण्यात आल्याने शहरांमध्ये १० दिवसानंतरच नळाला पाणी सोडले जात आहे. ग्रामीण भागात आजपर्यंत केवळ १६ टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू होवू शकला. त्यातही सातत्य नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाईDamधरण