शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
2
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
3
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
4
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
5
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
6
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
7
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
8
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
9
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
10
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
11
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
12
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
13
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
14
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
15
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
16
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
17
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
थ्रिलर फिल्मपेक्षाही भयंकर! जावयासोबत सासूचं सूत जुळलं, अडसर ठरणाऱ्या नवऱ्यालाच संपवलं
19
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, महापालिका निवडणुकीत नवा वाद; प्रचार संपला तरीही उमेदवारांना...
20
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं, तीन दिवसंपासून घसरतोय हा शेअर; आजही 5.58% आपटला, काय म्हणतात एक्सपर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

११ गावांनी नाकारला बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:21 IST

वाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देतंटामुक्त गाव समित्यांचा पुढाकारजिल्ह्यात ७९१ गावे

आज पोळा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात केली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये समित्यांचे गठण झालेले आहे. त्यानुसार, सणोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गाव एक दुर्गादेवी’, पोलीस बंदोबस्ताविना पोळा, गुलाल आणि डीजे विरहित मिरवणूक, अशा संकल्पना समितीसमोर ठेवण्यात आल्या. त्यासाठी लोकसंख्येच्या  आधारावर लाखो रुपयांची बक्षिसे देखील दरवर्षी तंटामुक्त गाव समित्यांना दिले जातात. जिल्ह्यातील अनेक गावांनी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त केले; परंतु सामाजिक उपक्रम राबविण्यास तंटामुक्त गाव समित्या कमी पडत असून, जिल्ह्यातील केवळ ११ गावांनी पोळा सणाला बंदोबस्त नाकारल्यावरून ही बाब सिद्ध होत आहे. मानोरा तालुक्यातून कारखेडा गावाने पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. यासाठी तेथील तंटामुक्तीचे अध्यक्ष धम्मदीप ढवळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी पुढाकार घेतला. वाशिम तालुक्यात कुंभारखेडा, मालेगाव तालुक्यात केळी आणि रिसोड तालुक्यातील आठ गावांचा पोलीस बंदोबस्त नाकारण्यात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जनावरे आजारी; पिंपरीमध्ये यंदा भरणार नाही पोळा!पिंपरी अवगण (ता.मंगरूळपीर) येथे गेल्या आठ दिवसांपासून अज्ञात आजाराची लागण झाली असून, यात १0 जनावरे दगावली आहेत. दरम्यान, गावातील गुरांचे लसीकरण करण्यात आले; परंतु एकापेक्षा अधिक जनावरे जवळ आल्यास आजाराची लागण वाढू शकते, ही बाब लक्षात घेऊन गावातील पोळा यंदा रद्द ठेवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे.