शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

११ गावांनी नाकारला बंदोबस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 01:21 IST

वाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.

ठळक मुद्देतंटामुक्त गाव समित्यांचा पुढाकारजिल्ह्यात ७९१ गावे

आज पोळा लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: गावागावांमध्ये साजरे होणारे सणोत्सव शांततेत पार पडावे, यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र, बहुतांश समित्या कागदोपत्रीच कार्यान्वित असून, आजही पोलीस बंदोबस्ताविना सण-उत्सव साजरे होऊ शकत नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. तथापि, जिल्ह्यात ७९१ गावे आहेत. त्या तुलनेत केवळ ११ गावांनी पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारल्याची माहिती सूत्रांनी रविवारी दिली.गावातील तंटे गावातच मिटविण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला सुरूवात केली. जिल्ह्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये समित्यांचे गठण झालेले आहे. त्यानुसार, सणोत्सव शांततेत पार पाडण्याकरिता ‘एक गाव एक गणपती’, ‘एक गाव एक दुर्गादेवी’, पोलीस बंदोबस्ताविना पोळा, गुलाल आणि डीजे विरहित मिरवणूक, अशा संकल्पना समितीसमोर ठेवण्यात आल्या. त्यासाठी लोकसंख्येच्या  आधारावर लाखो रुपयांची बक्षिसे देखील दरवर्षी तंटामुक्त गाव समित्यांना दिले जातात. जिल्ह्यातील अनेक गावांनी तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त केले; परंतु सामाजिक उपक्रम राबविण्यास तंटामुक्त गाव समित्या कमी पडत असून, जिल्ह्यातील केवळ ११ गावांनी पोळा सणाला बंदोबस्त नाकारल्यावरून ही बाब सिद्ध होत आहे. मानोरा तालुक्यातून कारखेडा गावाने पोळा सणाला पोलीस बंदोबस्त नाकारला आहे. यासाठी तेथील तंटामुक्तीचे अध्यक्ष धम्मदीप ढवळे, पोलीस पाटील वासुदेव सोनोने यांनी पुढाकार घेतला. वाशिम तालुक्यात कुंभारखेडा, मालेगाव तालुक्यात केळी आणि रिसोड तालुक्यातील आठ गावांचा पोलीस बंदोबस्त नाकारण्यात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जनावरे आजारी; पिंपरीमध्ये यंदा भरणार नाही पोळा!पिंपरी अवगण (ता.मंगरूळपीर) येथे गेल्या आठ दिवसांपासून अज्ञात आजाराची लागण झाली असून, यात १0 जनावरे दगावली आहेत. दरम्यान, गावातील गुरांचे लसीकरण करण्यात आले; परंतु एकापेक्षा अधिक जनावरे जवळ आल्यास आजाराची लागण वाढू शकते, ही बाब लक्षात घेऊन गावातील पोळा यंदा रद्द ठेवण्याचा निर्णय गावकर्‍यांनी घेतला आहे.