शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
2
अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा
3
"बेबी, आय लव्ह यू, तू खूप...", स्वयंघोषित बाबा रात्रभर पाठवायचा अश्लील मेसेज, ३५ मुलींचा छळ
4
डोळ्यांत मिरची पूड ओतली, नंतर साडीने लेकाचा गळा आवळला अन्...; जन्मदात्री आई इतकी क्रूर का झाली?
5
जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती लॅरी एलिसन ९५% संपत्ती दान करणार; काय आहे अट?
6
कमाल झाली राव! आता QR कोड नाही, तर फक्त अंगठ्याने करा पेमेंट; काय आहे ThumbPay?
7
भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी...
8
मुंबई पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं गूढ उकललं; ४ महिन्यांनी हत्येचा खुलासा, 'त्या' पत्रावर संशय
9
बाहुबली नेते राजा भैय्या यांच्या मुलांनी आईवर केले गंभीर आरोप, म्हणाले, "आमच्या घरात…’’  
10
ललिता पंचमी व्रत २०२५: शुक्रवारी इच्छापूर्तीसाठी 'असे' करा ललिता पंचमीचे व्रत; टाळा 'ही' एक चूक!
11
"हो मला बाबा व्हायचंय...", ५९व्या वर्षी सलमान खानला हवंय मूल, म्हणाला...
12
इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर...
13
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांना मदत केलेला आरोपी सुरक्षा दलाच्या जाळ्यात; ऑपरेशन महादेवला मोठं यश
14
काश्मीर मुद्द्यावरून अमेरिकेचा पाकिस्तानला धक्का! पंतप्रधान मोदी-ट्रम्प भेटीबद्दलही केले मोठे विधान
15
'अशा' कमाईवर विशेष टॅक्स सूट नाही; कर सवलत मिळालेल्यांना थकबाकी भरावी लागणार, पण एक दिलासा...
16
"पैशाचं सोंग आणता येत नाही, मग सरकार शेतकऱ्यांना जीवन संपवू देणार का?’’, विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
17
एअरस्पेसमध्ये रशियाचा 'डिजिटल हल्ला'; स्पेनच्या संरक्षण मंत्र्यांच्या विमानाच्या जीपीएसमध्ये बिघाड, युरोपमध्ये खळबळ
18
महाराष्ट्रातील बेस्ट पर्यटन स्थळे क्लिक करा, ५ लाख जिंका; शासनाची अनोखी स्पर्धा, काय आहेत अटी?
19
नवरात्री २०२५: शुक्रवारी ललिता पंचमी, ३ शुभ योगासह, भद्रा राजयोगात ७ राशींचा भाग्योदय
20
लडाखमधील भडकलेल्या आंदोलनाचं पाकिस्तान कनेक्शन? सोनम वांगचूक यांच्या दौऱ्याबद्दल उपस्थित होताहेत शंका

टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:52 IST

संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत.

पालघर  - संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. तसेच, दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करावा, या मागणीसाठी मंगळवारी युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार, विक्रमगड, वाडा आदी तालुक्यांत मागील पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फक्त काही गावांतच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याचा आरोप करत युवासेनेच्या नेतृत्वाखाली शेकडो तहानलेल्या ग्रामस्थांनी, सेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी जश्विन घरत, धनंजय मोहिते, राकेश पाटील, पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, उपसंपर्कप्रमुख केतन पाटील, जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण, राजेश शहा, ज्योती मेहेर, वैदेही वाढाण, परीक्षित पाटील, राहुल लोंढे, हेमंत धर्ममेहेर, सिद्धेश घरत आदी उपस्थित होते.जिल्ह्यात जव्हार, विक्रमगड, मोखाडा व वाडा या आदिवासी पट्ट्यात अवकाळी पडलेल्या पावसामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्हाधिकाºयांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील आणेवारी ५० पैशांपेक्षा खाली गेल्याचे निदर्शनास आल्याने संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त झालेला आहे. ग्रामीण भागात पावसाचे प्रमाण चांगले असताना पाणी साठवण्यास शासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत इथले पाणी शहराकडे पळवले जाते. ही वास्तवता आदित्य ठाकरे यांना कळल्यानंतर या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सेना पदाधिकारी पोलिसांमध्ये बाचाबाचीमोर्चादरम्यान जिल्हाधिकाºयांना भेटणाºया शिष्टमंडळात फक्त पाच जणांना प्रवेश दिला जात असल्याचे आदेश असल्याने सेनेचे पदाधिकारी आणि सातपाटी सागरी पोलिसात बाचाबाची झाली. यावेळी कोकण विकास पाटबंधारे विभागाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी यांनाही आडवण्यात आले होते.युवासेनेचा मोर्चा असताना युवा पदाधिकाºयांना डावलून सेनेचे वरिष्ठ पदाधिकारी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यास गेल्याने युवांनी नाराजी व्यक्त केली.मुंबईला पाणी नेण्यात दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा तीव्र विरोध मोखाड्यातील कार्यक्र मातून हेतुपुरस्सर दूर ठेवण्यात आल्याने ते अत्यंत संतप्त झाले होते. माझ्या भागातील पाण्याशिवाय तुमचे महामुंबईचे स्वप्न साकार होतेच कसे, हे मी पाहतो, असा गर्भित इशारा त्यांनी दिला होता.ज्या मोखाड्यातील मध्य वैतरणा धरण प्रकल्पाचे पाणी मुंबईला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नेण्यात आले. त्याच मोखाड्यातील ७ गावे व १३ पाडे आज तहानेने व्याकूळ असल्याने टँकरचे पाणी पीत आहेत. त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचे पाणी मुंबईत नेले जाते, त्या गावांच्या तहानलेल्या लोकांसाठी सेनेने काय व्यवस्था केली, असा प्रश्नही यावेळी उपस्थित होत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर