शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना देणार नवा चेहरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 23:29 IST

विद्यमान आमदारांविरोधात नाराजी? : श्रीनिवास वनगांबाबतही नापसंती; मातोश्रीवर होणार चर्चा

हुसेन मेमन पालघर : पालघर विधानसभेचे विद्यमान आ. अमित घोडा यांच्या कार्यशैलीमुळे मच्छीमार तसेच इतर समाजात प्रचंड नाराजी असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात सापडली आहे. त्यांना पर्याय म्हणून श्रीनिवास वणगा किंवा उच्चशिक्षित असलेल्या डॉ. विश्वास वळवी यांच्या नावाची चर्चा मातोश्रीवर सध्या सुरू आहे. अनेक भागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉ. वळवी यांचे बॅनर झळकू लागल्याने शिवसैनिकांची त्यांना पसंती असल्याचे दिसून येत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या खा. राजेंद्र गावितांना पालघर विधानसभेने १ लाख ११ हजार ७९४ हजार इतके भरभक्कम मताधिक्य दिले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला विजयाच्या समीप पोहचण्यास विशेष अडचण भासणार नाही, असे चित्र आहे. मात्र, विद्यमान आ. अमित घोडा यांनी आपल्या मतदार संघात काम करताना वापरलेला निधी हा आपल्या चारोटी, कासा, डहाणू भागात जास्त खर्च करून त्या निधीचे ठेकेही आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. चारोटी, कासा, डहाणू आदी भागातील अनेक वर्षांपासून सेनेसोबत असलेल्या मच्छीमार समाजाबाबत आ. घोडा यांनी दुजाभाव ठेवल्याने हा समाज त्यांच्यावर नाराज असल्याचे एका कट्टर शिवसैनिकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले. त्यामुळे आ. घोडा यांच्या मुंबई, ठाण्याच्या वाºया वाढल्या आहेत.

माजी खा. चिंतामण वणगा यांच्या अकस्मात मृत्यूने पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेनेने त्यांच्या मुलाला, श्रीनिवासला उमेदवारी देत भाजपपुढे आव्हान उभे केले. मात्र, त्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी राजेंद्र गावितांना तिकीट देत तसेच विजयी करून चोख उत्तर दिले होते. त्यामुळे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे श्रीनिवासच्या पुनर्वसनाचा यक्षप्रश्न उभा राहिला होता. २०१९ च्या पालघर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला असूनही शिवसेनेने हा मतदारसंघ मागून घेतला. त्यामुळे श्रीनिवासला उमेदवार घोषित करून त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विजयी राजेंद्र गावित यांनाच सेनेत प्रवेश देत त्यांना जिंकूनही आणले.

जिल्ह्यात स्थानिक पातळीवर खूप काम करून नंतरच लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा असल्याचे आपणास श्रीनिवासने सांगितल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी लोकसभेदरम्यान एका भाषणात काढले होते. अशावेळी राजकारणातले स्वत:चे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने लोकसभा क्षेत्रात विकासात्मक कामे करून आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी त्यांनी गमावली आहे.सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला नाही?राजकीय कार्यक्र माच्या व्यासपीठावरील आपली उपस्थिती दाखविण्याव्यतिरिक्त श्रीनिवास काही विशेष करू शकले नसल्याचे दिसून आले आहे. व्यासपीठासह मतदार संघात एक मौनी व्यक्तीमत्व अशीच त्यांची प्रतिमा आजपर्यंत राहिलेली आहे. आपल्या कार्यक्षेत्रात विकासकामे करून दाखवण्याची संधी त्यांनी गमावल्याची चर्चा मतदारसंघात होते आहे.सहानभूतीच्या लाटेवर उभ्या असलेल्या श्रीनिवास यांना आजही मतदारसंघावर आपली छाप सोडता आली नसल्याने ‘मौनी’ भूमिकेत वावरणारा उमेदवार आम्हाला नको, अशी मागणी शिवसैनिकांमधूनच होताना दिसते आहे. त्यामुळेच उच्च शिक्षित असलेले डॉ.वळवी यांना शिवसैनिकामधून पसंती मिळत असल्याने त्यांचे बॅनर पालघर मतदार संघात झळकू लागले आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpalghar-acपालघरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019