शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना देणार नवा चेहरा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 23:29 IST

विद्यमान आमदारांविरोधात नाराजी? : श्रीनिवास वनगांबाबतही नापसंती; मातोश्रीवर होणार चर्चा

हुसेन मेमन पालघर : पालघर विधानसभेचे विद्यमान आ. अमित घोडा यांच्या कार्यशैलीमुळे मच्छीमार तसेच इतर समाजात प्रचंड नाराजी असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात सापडली आहे. त्यांना पर्याय म्हणून श्रीनिवास वणगा किंवा उच्चशिक्षित असलेल्या डॉ. विश्वास वळवी यांच्या नावाची चर्चा मातोश्रीवर सध्या सुरू आहे. अनेक भागात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत डॉ. वळवी यांचे बॅनर झळकू लागल्याने शिवसैनिकांची त्यांना पसंती असल्याचे दिसून येत आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या खा. राजेंद्र गावितांना पालघर विधानसभेने १ लाख ११ हजार ७९४ हजार इतके भरभक्कम मताधिक्य दिले. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराला विजयाच्या समीप पोहचण्यास विशेष अडचण भासणार नाही, असे चित्र आहे. मात्र, विद्यमान आ. अमित घोडा यांनी आपल्या मतदार संघात काम करताना वापरलेला निधी हा आपल्या चारोटी, कासा, डहाणू भागात जास्त खर्च करून त्या निधीचे ठेकेही आपल्या जवळच्या नातेवाईकांनाच दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी नाराजी आहे. चारोटी, कासा, डहाणू आदी भागातील अनेक वर्षांपासून सेनेसोबत असलेल्या मच्छीमार समाजाबाबत आ. घोडा यांनी दुजाभाव ठेवल्याने हा समाज त्यांच्यावर नाराज असल्याचे एका कट्टर शिवसैनिकाने नाव न छापण्याच्या अटीवर लोकमतला सांगितले. त्यामुळे आ. घोडा यांच्या मुंबई, ठाण्याच्या वाºया वाढल्या आहेत.

माजी खा. चिंतामण वणगा यांच्या अकस्मात मृत्यूने पालघर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत सेनेने त्यांच्या मुलाला, श्रीनिवासला उमेदवारी देत भाजपपुढे आव्हान उभे केले. मात्र, त्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांनी राजेंद्र गावितांना तिकीट देत तसेच विजयी करून चोख उत्तर दिले होते. त्यामुळे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे श्रीनिवासच्या पुनर्वसनाचा यक्षप्रश्न उभा राहिला होता. २०१९ च्या पालघर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत हा मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला असूनही शिवसेनेने हा मतदारसंघ मागून घेतला. त्यामुळे श्रीनिवासला उमेदवार घोषित करून त्याच्या पुनर्वसनाचा प्रश्न सुटेल असे वाटत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचे विजयी राजेंद्र गावित यांनाच सेनेत प्रवेश देत त्यांना जिंकूनही आणले.

जिल्ह्यात स्थानिक पातळीवर खूप काम करून नंतरच लोकसभेची निवडणूक लढवायची इच्छा असल्याचे आपणास श्रीनिवासने सांगितल्याचे उद्गार उद्धव ठाकरे यांनी लोकसभेदरम्यान एका भाषणात काढले होते. अशावेळी राजकारणातले स्वत:चे स्थान पक्के करण्याच्या दृष्टीने लोकसभा क्षेत्रात विकासात्मक कामे करून आपले कर्तृत्व दाखविण्याची संधी त्यांनी गमावली आहे.सहानुभूतीच्या लाटेचा फायदा झाला नाही?राजकीय कार्यक्र माच्या व्यासपीठावरील आपली उपस्थिती दाखविण्याव्यतिरिक्त श्रीनिवास काही विशेष करू शकले नसल्याचे दिसून आले आहे. व्यासपीठासह मतदार संघात एक मौनी व्यक्तीमत्व अशीच त्यांची प्रतिमा आजपर्यंत राहिलेली आहे. आपल्या कार्यक्षेत्रात विकासकामे करून दाखवण्याची संधी त्यांनी गमावल्याची चर्चा मतदारसंघात होते आहे.सहानभूतीच्या लाटेवर उभ्या असलेल्या श्रीनिवास यांना आजही मतदारसंघावर आपली छाप सोडता आली नसल्याने ‘मौनी’ भूमिकेत वावरणारा उमेदवार आम्हाला नको, अशी मागणी शिवसैनिकांमधूनच होताना दिसते आहे. त्यामुळेच उच्च शिक्षित असलेले डॉ.वळवी यांना शिवसैनिकामधून पसंती मिळत असल्याने त्यांचे बॅनर पालघर मतदार संघात झळकू लागले आहेत.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpalghar-acपालघरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019