शहरं
Join us  
Trending Stories
1
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
2
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
3
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
4
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
5
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
6
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
7
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
8
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
9
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
10
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
11
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संजय निराधार योजना आदिवासींपर्यंत पोहोचणार कधी?, सारे काही कागदावरच : विधवा, अनाथ, अपंगांना नाही शासनाचा आधार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 06:08 IST

समाजातील दिनदुबळे, अपंग, मागासवर्गीय, विमुक्त व भटक्या विमुक्त जाती-जमातींबरोबरच वयोवृध्द, अपंग तसेच विधवा, निराधार यांना आधार मिळावा यासाठी राज्य व केंद्र शासनाने खास बाबत म्हणून संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे.

डहाणू : समाजातील दिनदुबळे, अपंग, मागासवर्गीय, विमुक्त व भटक्या विमुक्त जाती-जमातींबरोबरच वयोवृध्द, अपंग तसेच विधवा, निराधार यांना आधार मिळावा यासाठी राज्य व केंद्र शासनाने खास बाबत म्हणून संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे. परंतु साडेचार लाख लोकसंख्या असलेल्या डहाणू तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचिंचले, दाभाडी, दिवसी, चळणी, सूखट आंबा, किन्हवली, गांगूर्डी, मोडगाव, बापूगाव, अपटा, रायपूर, वंकास, धरमपूर इत्यादी दूर्गम भागांत अद्याप ही योजना पोहोचली नसल्याने येथील निराधारांवर भीक मागून जीवन जगण्याची वेळ आली आहे.डहाणूच्या मुंबई-अहमदाबाद हायवेच्या पलीकडील भागांत शेकडो आदिवासी गावे आहेत. शंभर टक्के आदिवासी वस्ती असलेल्या गावांत कायमस्वरूपी रोजगार नसल्याने दरवर्षी दिपावली नंतर हजारो कुटुंबे रोजगारासाठी जामनगर, वेरावळ, मांगरोळ, बहाडोली, वसई, मनोर, बोईसर, चिंचणी, डहाणू शहर इत्यादी ठिकाणी जात असतात. तिथे मिळेल ते काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत असतात. त्यामुळे गाव, खेडेपाडे ओस पडलेले असतात परंतु गावांतील अपंग, वयोवृध्द, निराधार कुष्ठरोगी, तसेच इतर गंभीर आजाराने पिडित आदिवासी अन्य कुठे ही आधार नसल्याने जवळच असलेल्या महालक्ष्मी मातेच्या देवस्थानाचा आश्रय घेताते. येथे गुजरात, महाराष्टÑ राज्यातील हजारो भाविक येथे येत असतात. हे श्रध्दाळू या गोर गरीबांना कपडे, अन्न, पैसे, तसेच इतर संसारोपयोगी वस्तू दान करीत असल्याने या निराधारांना त्याचा मोठा आधार असल्याने वर्षानुवर्षांपासून ते या मंदिराभोवती ठिय्या देऊन असतात.दºयाखोºयांत डोगर कुशीत राहणाऱ्या व दारिद्रयरेषेखाली जीवन जगणाºया आदिवासींकडे देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे झाली तरी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक असलेले रेशनकार्ड आधारकार्ड, इलेक्शनकार्ड नाही.. विशेष म्हणजे ज्यांच्या साठी शासनाने या योजना सुरू केल्या आहेत. त्या समाजातील दीन दलित, दुबळया लोकांना शासनाने आपल्यासाठी एवढया योजना सुरू करून ठेवल्या आहेत. याची माहितीही नसते. या विभागातील प्रमुख अधिकारी ही या योजना गरजू लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विशेष प्रयत्न करीत नसल्याची आदिवासी समाजाची तक्रार आहे. दरम्यान केंद्रच्या वतीने व महसूल खात्यामार्फत तालुक्यातील गोर, गरीब, अपंग, निराधार, कृष्ठरोगी, पिडीत, यांना दरमहा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत ८५० लाभार्थ्यांना दहा किलो धान्य मोफत दिले जात होते. परंतु गेल्या एक वर्षापासून ही योजना बंद झाल्याने हे निराधार खरोखरच निराधार झाले आहेत.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार