शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पक्षापेक्षा आम्हाला काम करणारा खासदार हवा! वैतागलेल्या डहाणूकरांचा कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 04:02 IST

पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे.

- शौकत शेखडहाणू  - पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने शिवसेनेसाठी जागा सोडली आहे. त्यामुळे पारंपारिक मतदारसंघ असलेल्या डहाणू विधानसभा क्षेत्रातुन भाजपकडून तलासरी, डहाणू भागातून जाहीर विरोध होऊ लागला आहे. तलासरी येथे जाहीर सभेत आदिवासी आघाडी प्रसिद्धी प्रमुख यांनी भाजपाला ही जागा न सोडल्यास अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.डहाणू विधानसभा, पंचायत समिती, डहाणू नगर परिषद, ग्रामपंचाती भाजपाकडे आहेत. त्यामुळे भाजपाकडुन पालघर लोकसभा लढण्याची तयारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून पुर्ण झाली होती. मात्र वरच्या स्तरावर शिवसेनेकडे माप झुकल्याने येथील मतदार या पक्षीय राजकारणाला मोल देतील का? असा प्रश्न विचारला जात आहे. कारण लोकांना निवडणुकीपेक्षा रोजगाराचा प्रश्न महत्वाचा वाटू लागला आहे त्यामुळे बेरोजगारी, उद्योगबंदी, शिक्षण आदि समस्या सोडवणाऱ्या खासदाराच्या शोधात डहाणूचे मतदार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.लोकसभेचे बिगुल वाजले आणि पालघर लोकसभेची जागा भाजपाने शिवसेनेसाठी सोडली असली तरी रविवारी तलासरी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत शिवसेनेला विरोध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडू नये असा एकमुखी ठराव घेण्यात आला. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हेवेदावे समोर येऊ लागले आहेत. डहाणू विधानसभा मतदार संघाचा प्रभाव लाक्षणिक ठरणारा आहे. पालघर लोकसभा युतीने शिवसेनेला सोडली आहे. यामध्ये डहाणू विधानसभेत भाजपाचे वर्चस्व आहे. त्याचा फायदा शिवसेनेला होणारा आहे. उद्योगबंदीमुळे लोकांना रोजगारासाठी वणवण करावी लागत आहे. त्यातच आहे त्या उद्योगांचे स्थलांतर होवू लागल्याने लोकांना स्थलांतर करण्याची वेळ ओढवली आहे. अपेक्षित कामधंदा मिळत नसल्याने तरूण वर्ग सैरभर झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस, काँगेस आणि सीपीएम यांचे प्रभावक्षेत्र मानले जाणारे डहाणू, तलासरी तालुके कष्टकऱ्यांची नगरी परिचित आहे. डहाणू समुद्र किनारपट्टीवरील क्षेत्राच्या हद्दीत गेल्या काही वर्षांपासून झालेली बांधकामे नियमित करण्याची जुनी मागणी आहे. मात्र त्याची उकल होत नाही हे त्याचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. डहाणूमध्ये गेल्या २५ वर्षात उद्योग बंदी असल्याने एकही कारखाना सुरू झालेला नाही परिणामी मोलमजुरीचे काम करणारे आदिवासी दरवर्षी वीटभट्टी तसेच बोटीवर कामासाठी बाहेर पडावे लागते.२५ वर्षे उद्योगबंदी अन् रोजगाराचा अभाव२००९ मध्ये डहाणू विधानसभेत माकपचे राजाराम ओझरे निवडुन आले होते. त्यानंतर भाजपचे पास्कल धनारे निवडुन आले आहेत. त्यामुळे सध्या विद्यमान आमदारांचा प्रभाव असलेल्या डहाणू विधानसभेत विकासकामे झाली असली तरी १९९१ पासून डहाणू तालुक्याला लागलेली उद्योगबंदी २५ वर्षात उठलेली नाही. परिणामि स्थलांतर, रोजगार, उद्योगबंदी, यामुळे जनतेत सरकारचा रोष पसरला आहे. त्यामुळे डहाणूत समस्या सोडवणार्या खासदाराच्या शोधात मतदार राजा असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघर