शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

स्कूल चले हम! शिक्षण विभागाच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 12:56 IST

मंगळवारी जिल्हा शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात दिरंगाई केल्याने सकाळ सत्रातील सर्वच शाळा भरल्या. पण..

मुंबई - डहाणू तालुक्यात पावसाची संततधार कायम असून मंगळवारी सकाळपासून जोराचा पाऊस सुरु आहे. तसेच 45 ते 50 किमी असलेला वाऱ्याचा वेग ताशी 60 पर्यंत वाढण्याचा ईशारा हवामान विभागाने दिला आहे. मंगळवारी जिल्हा शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात दिरंगाई केल्याने सकाळ सत्रातील सर्वच शाळा भरल्या. पण, सकाळी दहा वाजेपासून भरणाऱ्या शाळांपर्यंत हा आदेश उशिरा मिळाला. तोपर्यंत विद्यार्थी व शिक्षक शाळेकडे रवाना झाले होते.

मंगळवारी शाळा बंद ठेवण्याचा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचा हा आदेश लवकर प्राप्त न झाल्यामुळेच विद्यार्थी घराबाहेर पडल्याचे पालकांनी म्हटले आहे. याबाबत जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सुट्टीचा आदेश पाठविल्याचे त्यांनी सांगितले. तर हा आदेश सकाळी 8 वाजल्यानंतर प्राप्त झाला. त्यानंतर तात्काळ 462 प्राथमिक, 60 माध्यमिक शाळा आणि 8 महाविद्यालयातील मुख्याध्यापकांना कळविल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी विष्णू रावते यांनी दिली. मात्र, सकाळी 11 वाजेपर्यंत बहुतांश शिक्षक याबाबत अनभिज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. 

दरम्यान, तालुक्यातील  ओहळ ,नदी-नाले आणि खाड्या दुथडी भरून वाहत आहेत. जिल्ह्यात 12 जुलै पर्यंत अतिदक्षतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. सकाळी समुद्राच्या भरतीची वेळ 9:48 वाजता असून लाटांची उंची 13.22 फूट राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाच्या परवाना अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. पाऊस कायम राहिल्यास समुद्रात पाणी निचरा होण्यात अडथळा येऊन पूरस्थिती उद्भवू शकते. एकंदरीत परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने तातडीने निर्णय घेणे अपेक्षित असल्याचे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटMumbaiमुंबईRainपाऊसSchoolशाळा