शहरं
Join us  
Trending Stories
1
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
2
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
3
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
4
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
5
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
6
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
7
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
8
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
9
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
10
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
11
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
12
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
13
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
14
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
15
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
16
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
17
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
18
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
19
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
20
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल

जव्हार तालुक्यातील २३ गाव-पाड्यांना कोरड, सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 12:53 AM

जव्हार तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

जव्हार - तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. शिवाय चार गावांचे टंचाई प्रस्ताव जव्हार पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहेत.तालुक्यातील खरंबा, पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जुनीजव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच टंचाईला सुरवात झाली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पंचायत समितीद्वारे एक दिवसाआड टॅँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.जव्हार पंचायत समितीकडे ६ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे या गावांनाही पाणी टंचाई सुरु झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे असल्याने या गावातील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाकडे ठराव करून दिला आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली आहे.गत वर्षी ७ गावे टंचाईग्रस्त होते. मात्र, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत २३ गावंपाड्यांना झळ बसली आहे. शासकीय यंत्रणा गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी गुरांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गुरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट असून त्यांना जास्त पाणी लागत असल्याने अनेकांनी त्यांना माळरानावर सोडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दिवसा आड पुरवठा होत असल्याने पानवठ्यावर वाद होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टँकर विहिरीत सोडला जात आहे. दरम्यान, पुढच्या काळात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात नापासमोखाडा : मुख्यमंत्र्यांनी तालुक्यामध्ये वर्ष २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली. मात्र, तीन वर्षांत या योजनेच्या नावाखाली २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च होऊन देखील तालुका तहानलेलाच असल्याने जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात सप्शेल नापास झाली आहे. आज घडीला तालुक्यातील ८६ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे जलयुक्त शिवार कागदावरच दिसत आहे.तालुक्यात कृषी विभागाने सीसीटी, मजगी, फळ लागवड, सिमेंट नाला बांध, सिमेंट वळण बंधारा ,माती नाला बांध शेततळे, लूज बोल्डर सिमेंट नाला बांध दुरु स्ती, माती नाला बांध दुरु स्ती, गाळ काढणे, अशा विविध कामांवर २०१५ -१६ ला १०७७.४ लाख २०१६-१७ ४०९.६४ लाख तसेच २०१७-१८ मध्ये ४१.२३ लाख खर्च केला आहे. २०१५-१६ ११९,३७ लाख खर्च केले असून २०१६-१७ तसेच २०१७-१८ मध्ये वनविभागाची कामेच केलेली नाहीत.लघुपाटबंधारे विभागाने गावतलाव, पक्का बंधारा, कोल्हापुरी बंधारा, गावातळे नुतनीकरण ,पाझर तलाव दुरु स्ती, पक्का बंधारा दुरु स्तीच्या कामांवर ३७८.६४ लाख २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात कामे झालेली नाहीत तसेच लघुसिंचन च्या मार्फत २०१५-१६ या काळात २५३.५१ लाख खर्च झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेविहिरी दुरु स्तीवर २२.५२ लाख खर्च झाला आहे. यावर गटनेते प्रकाश निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोष दिला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpalgharपालघर