शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
6
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
7
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
8
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
9
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
10
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
11
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
12
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
13
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
14
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
15
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
16
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
17
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
18
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
19
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
20
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम

जव्हार तालुक्यातील २३ गाव-पाड्यांना कोरड, सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 00:53 IST

जव्हार तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

जव्हार - तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. शिवाय चार गावांचे टंचाई प्रस्ताव जव्हार पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहेत.तालुक्यातील खरंबा, पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जुनीजव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच टंचाईला सुरवात झाली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पंचायत समितीद्वारे एक दिवसाआड टॅँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.जव्हार पंचायत समितीकडे ६ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे या गावांनाही पाणी टंचाई सुरु झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे असल्याने या गावातील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाकडे ठराव करून दिला आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली आहे.गत वर्षी ७ गावे टंचाईग्रस्त होते. मात्र, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत २३ गावंपाड्यांना झळ बसली आहे. शासकीय यंत्रणा गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी गुरांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गुरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट असून त्यांना जास्त पाणी लागत असल्याने अनेकांनी त्यांना माळरानावर सोडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दिवसा आड पुरवठा होत असल्याने पानवठ्यावर वाद होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टँकर विहिरीत सोडला जात आहे. दरम्यान, पुढच्या काळात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात नापासमोखाडा : मुख्यमंत्र्यांनी तालुक्यामध्ये वर्ष २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली. मात्र, तीन वर्षांत या योजनेच्या नावाखाली २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च होऊन देखील तालुका तहानलेलाच असल्याने जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात सप्शेल नापास झाली आहे. आज घडीला तालुक्यातील ८६ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे जलयुक्त शिवार कागदावरच दिसत आहे.तालुक्यात कृषी विभागाने सीसीटी, मजगी, फळ लागवड, सिमेंट नाला बांध, सिमेंट वळण बंधारा ,माती नाला बांध शेततळे, लूज बोल्डर सिमेंट नाला बांध दुरु स्ती, माती नाला बांध दुरु स्ती, गाळ काढणे, अशा विविध कामांवर २०१५ -१६ ला १०७७.४ लाख २०१६-१७ ४०९.६४ लाख तसेच २०१७-१८ मध्ये ४१.२३ लाख खर्च केला आहे. २०१५-१६ ११९,३७ लाख खर्च केले असून २०१६-१७ तसेच २०१७-१८ मध्ये वनविभागाची कामेच केलेली नाहीत.लघुपाटबंधारे विभागाने गावतलाव, पक्का बंधारा, कोल्हापुरी बंधारा, गावातळे नुतनीकरण ,पाझर तलाव दुरु स्ती, पक्का बंधारा दुरु स्तीच्या कामांवर ३७८.६४ लाख २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात कामे झालेली नाहीत तसेच लघुसिंचन च्या मार्फत २०१५-१६ या काळात २५३.५१ लाख खर्च झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेविहिरी दुरु स्तीवर २२.५२ लाख खर्च झाला आहे. यावर गटनेते प्रकाश निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोष दिला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpalgharपालघर