शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार तालुक्यातील २३ गाव-पाड्यांना कोरड, सहा टँकरने पाणीपुरवठा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 00:53 IST

जव्हार तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे.

जव्हार - तालुक्यामध्ये यंदा गतवर्षीपेक्षा टंचाईच्या झळा वाढल्या असून, मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात २३ गावं-पाड्यांची तहाण भागवण्यासाठी ६ टँकरने दिवसाआड पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. शिवाय चार गावांचे टंचाई प्रस्ताव जव्हार पंचायती समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे प्रस्तावित आहेत.तालुक्यातील खरंबा, पाचबुड, सागपणा, रिटीपाडा, कासटवाडी, जांभळीचामाळ, जुनीजव्हार, कातकरीपाडा या गावांना यावर्षी मार्च महिन्यापासूनच टंचाईला सुरवात झाली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पंचायत समितीद्वारे एक दिवसाआड टॅँकरने पाणी पुरवठा सुरु आहे.जव्हार पंचायत समितीकडे ६ पाणी टंचाई गावांचे नवीन प्रस्ताव येवून पडले आहेत. कौलाळे, पवारपाडा, कुंडाचापाडा, नंदनमाळ, घिवंडा, पिंपळपाडा, न्याहाळे या गावांनाही पाणी टंचाई सुरु झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करणे गरजेचे असल्याने या गावातील ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाकडे ठराव करून दिला आहे. यावर्षी मार्च महिन्यापासून पाणी टंचाईला सुरवात झाली आहे.गत वर्षी ७ गावे टंचाईग्रस्त होते. मात्र, यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत २३ गावंपाड्यांना झळ बसली आहे. शासकीय यंत्रणा गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असली तरी गुरांसाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गुरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट असून त्यांना जास्त पाणी लागत असल्याने अनेकांनी त्यांना माळरानावर सोडले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी दिवसा आड पुरवठा होत असल्याने पानवठ्यावर वाद होत आहेत. विहिरीवरून पाणी भरण्यासाठी त्रास झाला तरी चालेल मात्र पाण्यावरून वाद नको म्हणून पाण्याचा आलेला टँकर विहिरीत सोडला जात आहे. दरम्यान, पुढच्या काळात ही समस्या आणखी बिकट होणार आहे.

मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात नापासमोखाडा : मुख्यमंत्र्यांनी तालुक्यामध्ये वर्ष २०१५-१६ मध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली. मात्र, तीन वर्षांत या योजनेच्या नावाखाली २३ कोटी ३९ लाख १४ हजार रु पये खर्च होऊन देखील तालुका तहानलेलाच असल्याने जलयुक्त शिवार योजना मोखाड्यात सप्शेल नापास झाली आहे. आज घडीला तालुक्यातील ८६ गावांची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे जलयुक्त शिवार कागदावरच दिसत आहे.तालुक्यात कृषी विभागाने सीसीटी, मजगी, फळ लागवड, सिमेंट नाला बांध, सिमेंट वळण बंधारा ,माती नाला बांध शेततळे, लूज बोल्डर सिमेंट नाला बांध दुरु स्ती, माती नाला बांध दुरु स्ती, गाळ काढणे, अशा विविध कामांवर २०१५ -१६ ला १०७७.४ लाख २०१६-१७ ४०९.६४ लाख तसेच २०१७-१८ मध्ये ४१.२३ लाख खर्च केला आहे. २०१५-१६ ११९,३७ लाख खर्च केले असून २०१६-१७ तसेच २०१७-१८ मध्ये वनविभागाची कामेच केलेली नाहीत.लघुपाटबंधारे विभागाने गावतलाव, पक्का बंधारा, कोल्हापुरी बंधारा, गावातळे नुतनीकरण ,पाझर तलाव दुरु स्ती, पक्का बंधारा दुरु स्तीच्या कामांवर ३७८.६४ लाख २०१६-१७ व २०१७-१८ या दोन वर्षात कामे झालेली नाहीत तसेच लघुसिंचन च्या मार्फत २०१५-१६ या काळात २५३.५१ लाख खर्च झाला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागानेविहिरी दुरु स्तीवर २२.५२ लाख खर्च झाला आहे. यावर गटनेते प्रकाश निकम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दोष दिला आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईpalgharपालघर