शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

नायगावात पाणी झाले ‘कुलूप बंद, पाणीबाणीचा असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 11:43 PM

नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे.

नालासोपारा : नायगाव पूर्व मधील गणेश नगर येथे सध्या पाणीबाणी सुरू आहे. पाणी जास्त मौल्यवान असून त्याच्या एका थेंबाचीही चोरी होवू नये याकरिता येथील रहिवासी पाण्याच्या पिंपांना कुलूप लावत असल्याचे आश्चर्यचकीत करणारे चित्र दिसून येत आहे. पाण्याची टंचाई आणि त्यात पाणी कमी पडू नये म्हणून ही उपाययोजना केली जात असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मौल्यवान वस्तू कोणी चोरून नेईल या भीतीने जशी कुलूपात सुरक्षित ठेवली जाते, बँकेच्या लॉकर्सचा आधारही घेतला जातो. त्याच रितीने आता नायगावमध्ये पाणी सांभाळण्यासाठी पिंपांना कुलूप लावले जात आहे.याठिकाणी वसई विरार महापालिकेचे पाणी अद्याप आले नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा होत असतो. चाळीत प्रवेश करताच याठिकाणी पाण्याची मोठमोठी कुलूपबंद पिंपे ठेवलेली दिसतात. रात्री साडेआठ वाजता टँकर येताच पाणी भरण्याची धावपळ सुरु होते ते भरले की त्याला बाहेरून कुलूप ठोकले जाते. याठिकाणी चाळीत राहणाऱ्या रहिवाशांची सुमारे २५० हून अधिक पिंपे बाहेर असतात. बैठ्या चाळीतील घरांचे क्षेत्रफळ कमी असल्याने घराच्या समोर हीे पिंपे ठेवली जातात.वसई विरार महापालिकेने या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यास सुरुवात केली आहे. परंतु अनेक इमारती पाण्यावाचून आहेत. त्यामुळे टँकरचा पाणीपुरवठा या भागात होत असतो. एका टँकरसाठी १ हजार ते १५०० रुपये मोजावे लागतात. गणेश चाळीत देखील हीच परिस्थिती आहे.