शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी?; 'वर्षा'वरील बैठकीत दादा संतापले, दानवेंचा दावा
2
डॉ. मुजम्मिलच्या डायरीतून समोर आलं मोठं गुपित, 'कोड वर्ड'मध्ये लिहिला होता दहशतीचा प्लॅन! आणखी 25 नावं समोर
3
पार्थ पवारांच्या कंपनीला सूट द्यायची आहे का? बावनकुळेंच्या प्रश्नामुळे मुद्रांक शुल्क विभागच संभ्रमात
4
CM देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार; दोघांची भेट लक्षवेधी ठरणार
5
तहसीलदार पदावरून ४ वेळा निलंबन; ‘कामाची’ सवय असलेले सूर्यकांत येवले लाच प्रकरणांतही आघाडीवर
6
दिल्लीत स्फोटापूर्वी मशिदीत गेला होता दहशतवादी डॉ. उमर नबी; स्फोटाच्या आधीचे सीसीटीव्ही समोर
7
अल-कायदाचा माजी कमांडर; व्हाईट हाऊसमध्ये अल-शरा आणि डोनाल्ड ट्रम्प यांची ऐतिहासिक भेट
8
“बूट फेकीसारख्या घटना पुन्हा घडू नये यासाठी काय उपाय करता येईल?”; सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! कुशीत बाळ अन् हातात मशीन... आई करतेय कंडक्टरचं काम; 'ती'चा संघर्ष
10
'या' सरकारी बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा; घर घेण्याच्या विचारात असाल तर, पाहा काय आहेत नवे दर?
11
Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात
12
PAK vs SL: पाकिस्तानात स्फोट, श्रीलंकन क्रिकेटर मायदेशी परतण्याची भीती, PCBचा मोठा निर्णय
13
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटातील कारची ११ वर्षात ५ वेळा विक्री; खरा मालक कोण, शेवटचा व्यवहार कधी झाला?
14
नगरपरिषद निवडणुकीत नवी समीकरणे; बहुजन विकास आघाडी अन् मनसेची युती होणार? नेते म्हणाले...
15
Children's Day 2025: सुकन्या समृद्धी ते म्युच्युअल फंड SIP पर्यंत; बालदिनी तुमच्या मुलांना द्या खास आर्थिक गिफ्ट, जाणून घ्या स्कीम्स
16
बॉलिवूडच्या 'भट' कुटुंबात कटुता!, आलियाने सख्ख्या काकाला बोलवलं नाही लग्नाला अन् राहालाही नाही भेटवलं, मुकेश भट यांचा खुलासा
17
अंजली दमानियांकडून राजीनाम्याची मागणी; मला योग्य वाटेल ते मी करेन, अजित पवारांची प्रतिक्रिया
18
'अमेरिकन कामगारांना ट्रेन करा आणि घरी जा...' ट्रम्प प्रशासनाचं नवीन फर्मान; भारतीय IT अभियंते चिंतेत
19
"हिंदीतील लॉबीने मला स्वीकारलं नाही...", अजिंक्य देव स्पष्टच बोलले; अजय-सनीचं घेतलं नाव
20
डरानेवालो को डराओ! 'शिवतीर्थ'समोर बॅनरबाजी; उत्तर भारतीय सेनेने मनसे प्रमुख राज ठाकरेंना डिवचलं

जिल्ह्यातील ग्रामस्थांची जि.प.वर धडक :  ‘आमचा गाव-आमचा विकास’ कसा होणार? निधीच्या वापराची मिळेना माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 08:58 IST

गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ‘आमचा गाव-आमचा विकास’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम शासनाने हाती घेतल्याचे सांगितले जात असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही.

पालघर: विक्रमगड, जव्हार, मोखाडा भागात आलेला निधी आणि त्या निधीच्या वापरात होणारा भ्रष्टाचार हे कित्येक वर्षांपासूनचे समीकरण आजही संपलेले नाही. याच तालुक्यातील पेसा, वित्त आयोगाच्या निधीच्या वापराची माहिती ग्रामस्थांना वर्षानुवर्षे दिली जात नसल्याने जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींतील  ग्रामस्थांनी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली. गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींचा लोकसहभाग ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने ‘आमचा गाव-आमचा विकास’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम शासनाने हाती घेतल्याचे सांगितले जात असले तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही. जिल्हा पातळीवर धोरणात्मक निर्णय, तालुकास्तरावर पर्यवेक्षकीय कामकाज व ग्रामसत्रावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येते. सर्वसमावेशक  ग्रामपंचायत  विकास आराखडे तयार केले जातात आणि निधीच्या नियोजनाचे अधिकार ग्रामसभेला देण्यात आले आहेत.  जव्हार तालुक्यातील देवीचापाडा, भोकरहट्टी, रोझपाडा, गवटका, वांगडपाडा, साखळीपाडा, डोवाची माळी, नवापाडा, खर्डी, पालवीपाडा, मोरगिला आदी २८ ग्रामपंचायती, तसेच मोखाडा तालुक्यातील बेडूकपाडा, सोनारवाडी, वडाचापाडा अशा पाच ग्रामपंचायती, तसेच विक्रमगड तालुक्यातील डोयाचापाडा, ठाकरेपाडा, माडाचापाडा, तसेच कर्हे,  अशा पाच ग्रामपंचायतींकडे निधी किती आला, कोणत्या विकासकामावर किती खर्च झाला, याची माहिती मागूनही मिळत नसल्याचे ग्रामसभा सदस्यांचे म्हणणे आहे. मागील सहा महिन्यांपासून  आमच्या ग्रामपंचायतीकडे, पंचायत समितीकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे पत्रव्यवहार करूनही कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी सोमवारी वयम् चळवळीच्या कार्यकर्त्यांसोबत पालघर येथील जिल्हा परिषद संकुलात ठाण मांडल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सी. एन. वाघमारे, उपमुख्य कार्यकरी अधिकारी टी.ओ. चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली आणि चर्चा केली. यावेळी पाच वर्षांत पेसा आणि वित्त आयोगाच्या खर्च झालेल्या निधीची माहिती देणे, ग्रामपंचायतीच्या भिंतीवर सार्वजनिक माहिती लावणे, पेसा ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक ग्रामसभा लावीत नाहीत किंवा आम्ही लावलेल्या ग्रामसभांना ग्रामसेवक उपस्थित राहत नाहीत, पाड्याच्या हिश्श्यात आलेला निधी कसा खर्च करायचा, हे ग्रामकोष समितीला माहीत नसल्याने ग्रामसेवकाकडून फसवणूक होते. त्यामुळे ग्रामकोष समितीला प्रशिक्षण द्यावे, ग्रामसभा खात्यांचे पासबुक, चेकबुक ग्रामसभेच्या कार्यालयात ठेवण्यात यावे, गावपाड्यांचा बनवलेला पंचवार्षिक आराखडा, तसेच वार्षिक आराखड्याची प्रत ग्रामसभेला तात्काळ मिळावी आदी मागण्यांचे निवेदन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांना देण्यात आले. त्यांनी संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, गटविकास अधिकारी यांना दोन दिवसांत लेखी आदेश देण्यात येतील, असे सांगितले.काय आहे शासन निर्णयजिल्ह्यातील ८ तालुक्यांपैकी पालघर व वसई हे अंशतः पेसा क्षेत्रात येत असून, मोखाडा, जव्हार, तलासरी, डहाणू, विक्रमगड, वाडा हे तालुके पूर्णतः पेसा क्षेत्रात येतात. २१ एप्रिल २०१५ च्या शासन निर्णयानुसार पेसा निधी हा ग्रामपंचायत स्तरावर खर्च करण्याच्या सूचना आहेत. पायाभूत सुविधा, आदिवासींना व्यवसाया-संदर्भात प्रशिक्षण, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, वनीकरण आदी कामांची निवड ग्रामसभांमध्ये करून त्याची अंमलबजावणी करणे अपेक्षित असते. 

टॅग्स :palgharपालघर