शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Vasai Virar | नायगाव वाहनतळातील वाहनांना भीषण आग, १५-१६ दुचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:23 IST

काल (सोमवारी) रात्री ११च्या सुमारास अचानक वाहनांनी पेट घेतला.

मंगेश कराळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: नायगाव पश्चिमेच्या रेल्वे स्थानकालगत असलेल्या वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली असून यात १५ ते १६ दुचाकी जळून खाक झाली आहेत.

नायगाव पश्चिमेच्या भागात रेल्वे स्थानकाला लागून व नायगाव उड्डाणपुलाच्या खालील वाहने पार्किंग मध्ये ठेवण्यात आली होती. सोमवारी रात्री ११ च्या सुमारास अचानकपणे वाहन तळात उभ्या असलेल्या वाहनांनी पेट घेतला. एका जवळ एक वाहन उभे असल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती. या घटनेची माहिती नागरिकांनी वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना व पोलिसांना दिली या घटनेची माहिती मिळत आज अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू केले याआगीत सुमारे १५ ते १६ दुचाकी वाहने जळून खाक झाली असून वाहनधारकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या वाहन तळामध्ये सुमारे शेकडो गाड्या उभ्या होत्या मात्र नायगाव पश्चिमेच्या स्थानिक नागरिकांनी तातडीने त्या गाड्या बाजूला केल्याने मोठी हानी टळली आहे. नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण अजूनही समजू शकले नाही घटनास्थळी माणिकपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जळून खाक झालेल्या वाहनांचा पंचनामा केला आहे.

टॅग्स :nalasopara-acनालासोपाराbikeबाईकfireआगParkingपार्किंग