शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

कचरा वर्गीकरणाचा बोजवारा, आरोग्याबाबत वसई-विरार महानगरपालिका उदासीन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 11:30 PM

वसई-विरार शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

- आशिष राणेवसई - वसई-विरार शहरात सध्या कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. तर कचरा व्यवस्थापनासाठी अर्थात ओला - सुका कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा करत देऊ केलेले निळे आणि हिरवे डबे तर सोसायटीच्या आवारात चक्क फुटलेल्या अवस्थेत दिसत असल्याचे चित्र सर्वच प्रभागात दिसते आहे. किंबहुना महापालिकेने वाटप केलेले ते निळे व हिरवे डबे आता फुटलेल्या स्थितीत असल्याने त्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण होणेच अक्षरश: थांबले असल्याने शहरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. मात्र, यामुळे नागरिकांच्या आरोग्याप्रती पालिकेचे धोरण उदासीन असल्याचे समोर येत आहे.दरम्यान, पुन्हा निळे आणि हिरवे डबे मिळणार नाहीत अशी भूमिका महापालिकेने घेतल्याने आता याचा परिणाम शहरात दिसतो आहे. कचºयामुळे सर्वत्र दुर्गंधी आणि रोगराईला आमंत्रण मिळाल्याची सध्याची शहरातील अवस्था आहे. एकीकडे महापालिका सांगते की, आपला ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो निळ्या आणि हिरव्या डब्यात टाकावा. पण, आज वसई - विरार शहरातील अनेक सोसायट्यांच्या तसेच चाळींच्या आवारातील कच-याचे हे डबे पूर्णपणे तुटलेलेच दिसतात. यामुहे कचरा जमिनीवर पडत असून नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागते आहे.वसई पश्चिमेस व पूर्वेस आणि पेल्हार भागात हे कचºयाचे डबे धूळ खात पडल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे महापालिका नागरिकांच्या आरोग्याबाबत व शहरातील स्वच्छतेबाबत किती जागरूक आहे, हे दिसून येत आहे.महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात मोठमोठ्या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांना सुका कचरा निळ्या डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात टाकून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले. तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी तर यासाठी खास ‘महिला ब्रँड अँबेसेडर’ची नियुक्ती केली होती. या आवाहनानंतर शहरातील प्रत्येक प्रभागाप्रमाणे कचºयाच्या डब्याचे वितरण करण्यात आले. मात्र दोन वर्षांनी महापालिकेचे हे निळे आणि हिरवे डब्बे फुटले. या फुटक्या डब्यातून आता कचरा व घाणेरडे पाणी बाहेर पडत आहे.ही समस्या कुठल्याही एका प्रभागापुरती मर्यादित नाही, तर ती वसई, विरार, नालासोपाºयाच्या म्हणजेच ९ प्रभागात आणि त्यांच्या परिसरातील हजारो सोसायट्यांमध्ये निर्माण झाली आहे. यासंदर्भात असंख्य स्थानिकांनी महापालिकेकडे नवीन डबे पुरवण्याची मागणी केली असता पालिकेकडून नकार दिला जात आहे. आता डबे मिळणार नाहीत. त्याचे वाटप एकदाच केले गेले. काही करदाते वर्षभर तर कोणी सहा महिन्यांपासून महापालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधीकडे नवीन डब्याची मागणी करत आहेत. तरीही पालिकेने डबे पुरवलेले नाहीत.महापालिका काही महिन्यांपासून कचºयाचे डबेच नसल्याची भूमिका घेत असतानाच, दुसरीकडे मात्र पूर्व - पश्चिम आणि पेल्हारमध्ये कचºयाचे डबेच चक्क धूळखात पडल्याचे दिसले आहे.वसई पूर्वेकडे रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या एका मोठ्या गोडावूनमध्ये हे डबे दिसतात. तर दुसरीकडे पेल्हारच्या जलशुद्धी केंद्राच्या अडगळीच्या ठिकाणीसुद्धा हे निळे आणि हिरवे डबे कुणालाही दिसू नयेत असे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका जनतेची दिशाभूल करत असून शहरात रोगराईला आमंत्रण देत असल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात आयुक्त आणि शहर अभियंता माधव जवादे यांना संपर्क केला असता ते जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.

कुठे गेल्या महिला ब्रँड अँबेसेडर ?तत्कालीन आयुक्त सतीश लोखंडे यांनी मोठा गाजावाजा करून स्वच्छ भारत अभियान मोहीम आणि शहरात प्रभाग निहाय ओला आणि सुका कचरा व्यवस्थापन तसेच वर्गीकरणासाठी आधी डबे वाटले. नंतर काही महिलांना महिलाना प्रभागनिहाय ब्रॅण्ड अँबेसेडर बनवले.काही काळ पालिकेचे स्वछता निरीक्षक आणि आरोग्य कर्मचारी प्रभागात फिरले. मात्र नंतर हे सर्वण गायब झाले. मग सर्वत्र आवाहन करून सभा बैठका घेण्यासाठी या महिला अँबेसेडर फिरताना आढळून आल्या. तत्कालीन आयुक्त लोखंडे गेले आणि या ब्रँड अँबेसेडरही शहरातून गायब झाल्या.कचरा वर्गीकरणाच्या नुसत्याच भूलथापानागरिकांना सुका कचरा निळ्या डब्यात तर ओला कचरा हिरव्या डब्यात टाकून कचरा वर्गीकरणाचे आवाहन केले होते. मात्र, आज हजारो हाऊसिंग सोसायट्यांमधील कचरापेट्या फुटलेल्या आणि तुटलेल्या अवस्थेत असल्याने एकाच कचरा पेटीत सुका व ओला कचरा टाकला जात आहे. कचरा वर्गीकरणाची मोहीम अपयशी ठरताना दिसते आहे.शहरातील निळे व हिरवे डबे तुटलेल्या अवस्थेत आहेत, याची पालिकेला कल्पना आहे. पुन्हा एकदा शहरातील हाऊसिंग सोसायटी आणि इतर विभागात त्यांची नावे टाकून त्या डब्याचे वाटप लवकरच केले जाईल. मात्र सोबत आपणच त्या डब्यांची जातीने देखभाल करून सक्तीने ओला व सुका कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण करायचे आहे. याबाबत आता माघार नाही. किंबहूना याबाबत एक संयुक्त बैठकही घेतली जाईल.- प्रवीण शेट्टी, महापौर, वसई विरार शहर महापालिका, मुख्यालय

टॅग्स :Vasai Virarवसई विरार