शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

वसई विरार महापालिका दुर्घटनेच्या प्रतिक्षेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 11:14 PM

नुसत्या नोटीसांनी काय होणार? : रहिवाशांना पर्याय नाही, पुन्हा घर मिळण्याची हमी नाही

नालासोपारा : वसई विरार महानगरपालिकेच्या अंतर्गत शेकडो इमारती धोकादायक अवस्थेत आहेत. त्यामध्ये शेकडो परिवार आपला जीव धोक्यात घालून राहतात. जोरदार पाऊस पडला तर अशा धोकादायक इमारतीना मोठ्या प्रमाणात धोका असतो. यामुळे कोणतीही जीवितहानी होऊ नये याकरिता या धोकादायक इमारतींना महानगरपालिका नोटीस पाठवून देते आणि आपला पल्ला झाडते.

या इमारती रिकाम्या करुन त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी का पावले उचलत नाही? काही इमारती खाली करण्याबाबत कोर्टात केस चालू आहे. यामुळे या इमारती तोडून रिडेव्हलपमेंट करण्यासाठी कोणीही बिल्डर पुढे येत नाही. वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालासोपारा पूर्व विभागात मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारती आहेत. काही इमारती तर कधीही पडून मोठा अपघात घडू शकतो. इमारती खाली न करता काही परिवार याच इमारतीमध्ये आपला जीव मुठित ठेवून राहतात. भरपूर वेळा धोकादायक इमारती म्हणून मनपाने नोटीस पाठवून सुध्दाही रहिवासी या इमारती रिकाम्या करत नाहीत आणि महानगरपालिका या गंभीर विषयावर मूग गिळून बसली आहे. वसई विरार महानगरपालिकाने गेल्या पावसाळ्यापूर्वी या धोकादायक इमारतीना नोटीस पाठवून रिकाम्या करण्याचे आदेश द्या असे सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बजावले होते. या विभागातील प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपल्या विभागातील धोकादायक इमारतीना नोटीस पाठवल्या तरी रहिवासी त्या रिकाम्या करतच नाहीत.

याबाबत त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, आम्ही घर रिकामे करू पण उद्या आम्हाला घर ते पुुन्हा मिळेल याची हमी काय? याबाबत वसई विरार महानगरपालिका काही ठोस पावले उचलत नसल्यामुळे आम्ही आमचा जीव मुठित ठेवून राहत आहोत. नालासोपारा पूर्वेकडील सर्वात जास्त धोकादायक अशा २३ इमारती आत्मवल्लभ सोसायटीमधे आहेत.या इतक्या धोकादायक आहेत की काही घरे आरपार दिसत असून त्यांचे प्लास्टर मोठ्या प्रमाणात निघाले असल्यामुळे कधीही मोठी जीवितहानीची घटना घडू शकते. यांना नालासोपारा महानगरपालिका विभागाने धोकादायक इमारती म्हणून नोटीस पाठवल्या आहेत पण रहिवासी आपली घर रिकामी करीतच नाहीत.आमची पर्यायी व्यवस्था का नाही करत असे नाव न सांगण्याच्या अटीवर आम्ही या धोकादायक इमारतीमधे राहत असून अनेक परिवार राहतात. आम्हाला राहण्याची पर्यायी व्यवस्था, भाडे, डिपॉझिट आणि आम्हाला पुन्हा घर मिळेल की नाही याचे काहीही ट्रस्टी सांगत नाही म्हणून आम्ही आमचा जीव मुठित धरत राहत आहोत.- संतप्त रहिवाशी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार