शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

लवकरच करा घरे रिकामी; पुन्हा आली पालिकेची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2024 10:44 IST

तिसऱ्या मुंबईतील ३००० कुटुंबे १४ वर्षांनंतर होणार बेघर : दिलासा नाहीच

- मंगेश कराळेलोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : तिसरी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसई-विरारला अनधिकृत इमारतीच्या बांधकामांनी जणू गालबोटच लागले असल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाच्या इमारती पाडण्याच्या आदेशानंतर येथील ३००० कुटुंबे १४ वर्षांनंतर  बेघर होण्याची चिन्हे आहेत.  रहिवासी घरे वाचविण्यासाठी अनेक ठिकाणी धाव घेत असले तरी त्यांना दिलासा मिळत नसल्याचे दिसत आहे. आयुक्त अनिलकुमार पवार यांनी ३० सप्टेंबरपर्यंत कारवाईला बंदी घातली होती. आता मनपाने त्यांना लवकरात लवकर घर रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.

सध्या भाड्याने राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर सुरु केले आहे. मात्र, स्वत:च्या घरात राहणारे घाबरले आहेत. महापालिकेने वीज विभागाला पत्र देऊन दोन दिवसांत इमारतींचा वीज, पाणीपुरवठा बंद करण्यात येईल, असे सांगितले आहे. 

२०१० ते १२ पर्यंत येथे प्रत्येकी चार मजल्यांच्या ४१ इमारती उभारण्यात आल्या. सर्व फ्लॅट विकले. काही वर्षांपूर्वी अजयने त्याच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याची तक्रार केली होती, मात्र त्यावर कारवाई झाली नाही. यानंतर जमीन मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर सीताराम, अरुण यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना तुरुंगात टाकण्यात आले. हायकोर्टाने मनपाला सर्व इमारती पाडण्याचे आदेशही दिले. 

न्यायालयाने मनपाकडून नोव्हेंबरपर्यंत कारवाईचा अहवाल मागवला आहे. पावसाळ्यापूर्वी येथे राहणाऱ्या सुमारे तीन हजार सदनिकाधारकांना मनपाने नोटिसा देण्यास सुरुवात केली. यामुळे लोक घाबरू लागले. घर वाचवण्यासाठी रहिवाशांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले. लोक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही गेले, मात्र त्यांना सगळीकडून केवळ आश्वासनेच मिळाली आहेत. 

पावसाळ्यात कोणालाही बेघर केले जाणार नाही, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले होते. त्यामुळे ३० सप्टेंबरपर्यंत कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही देण्यात आले होते. आता मनपाने सर्व फ्लॅट लवकरात लवकर रिकामे करावेत, असा सूचना फलक लावला आहे. येथे पुन्हा नोटीस देण्याचे काम सुरू झाल्याचे महानगरपालिकेच्या ‘डी’ प्रभागाचे सहायक आयुक्त मोहन संखे यांनी सांगितले.