शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

उत्तन समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य; महापालिकेच्या नाकर्तेपणावर मच्छीमार संतप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 6:04 PM

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरा रोड -  सार्वजनिक ठिकाणांची साफसफाईची जबाबदारी मीरा भाईंदर महानगरपालिकेची असताना उत्तन समुद्र किनारी मोठ्या प्रमाणात लाटांनी वाहून आलेल्या कचऱ्या कडे मात्र महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.  त्यामुळे समुद्रकिनारी कचऱ्याचे साम्राज्य असून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे मच्छीमारांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील दैनंदिन कचरा उचलणे व साफसफाईची जबाबदारी मीरा-भाईंदर महापालिकेची आहे. या कामासाठी महापालिकेने कोट्यावधी रुपयांचे कंत्राट दिले आहे. सध्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.  जेणेकरून समुद्राच्या लाटांनी उत्तनच्या किनाऱ्यावर विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणात वाहून आला आहे.  किनाऱ्यावर सध्या कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कचरा किनाऱ्यावर तसाच पडून असल्याने दुर्गंधी पसरली आहे. यामुळे रोगराई पसरण्याची भीती मच्छिमार यांनी व्यक्त केली आहे. समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात गोळा झालेल्या कचऱ्यामुळे मच्छिमारांना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळा होत आहे. जाळी विणणे, बोट दुरुस्ती, रंगरंगोटी आदी कामां मध्ये व्यत्यय येत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. 

संपूर्ण शहराचा कचरा आणून उत्तन मध्ये पालिका टाकते. या कचऱ्याच्या बेकायदेशीर डंपिंग मुळे आधीच नागरिक हैराण झाले आहेत. परंतु संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकणाऱ्या महापालिकेला उत्तन - पाली समुद्र किनारी साचलेले कचऱ्याचे ढीग मात्र साफ करावेसे वाटत नाही हे संतापजनक असल्याचे स्थानिक नगरसेविका शर्मिला बगाजी यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक