शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

४७ वर्षांपासून उर्से गावाचा ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2019 11:19 PM

गेल्या 47 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरु ष व अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक गौरीत्सव, नवरात्रोत्सव ,गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत.

कासा : डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य उर्सें गाव ह्या गावाने एक गांव एक गणपतीच्या माध्यमातून जनते समोर एक आदर्श उभा केला आहे.

गेल्या 47 वर्षांपासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरु ष व अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक गौरीत्सव, नवरात्रोत्सव ,गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत. यंदाचे ४७ वे वर्ष असून ह्या गावाची लोकसंख्या २५०० च्या आसपास आहे. गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे व खेळांचे आयोजन केले जाते.ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावाने जोपासला आहे.कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही. म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येउन सर्व उत्सव साजरे करतात.विशेष म्हणजे गावातील तरु ण एकत्र येऊन डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात, येथे बनविण्यात येणारा आरासही इको फ्रेंडली असतो, ह्या वर्षी बांबू, नारळीच्या पात्या, लाकडाचा भुसा, कापूस ह्या पासून नारळ तयार करून त्यात बाप्पाना विराजमान केलं आहे विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नसून सर्व आर्थिक बाब हि गावकरीच गोळा करतात. या गावाने एक आपले स्वत:चे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात . तर सर्व काम ही श्रमदनातून केली जातात.ह्या गावाची परंपरा अशी कि गणपती व गौरी विसर्जना नंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो व भगवंता वरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात. ह्या मधून उरलेले पैसे गरजवंत गाव शेतकरयांना व्याजाने वाटप केले जातात .व पुढील वर्षी ह्याच पैश्यातून हे सण साजरे करतात. दर वर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात. ठिकाणी जुगार व नश्या यांना पूर्णपणे विरोध असतो व असे करणारास दंड आकारला जातो गांवकरीनी सामाजिक भावनेतून संघिटत व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश ह्या माध्यमातून उर्से गावाने जनतेला देण्याचा प्रयत्न केलाय.