शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

शहरी विद्यार्थ्यांनी लुटली भातलावणीची मौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:17 PM

ग्रामीण जीवन ओढ लावणारे : मित्रांनाही प्रेरित करण्याचा मानस

डहाणू/बोर्डी : खेड्यातील निसर्ग शेती आणि शाश्वत जीवनाच्या ओढीने मुंबई शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी नरपड गाव गाठूनग्रामीण जीवनाचा अनुभव घेतला. पहिल्यांदाच त्यांनी शेतात भात लावणीचे काम करून वनभोजनाचाही आनंद लुटला.

मुंबईस्थित पर्यावरण तज्ज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत यांच्याकडून जागतिक तापमान वाढ आणि निसर्ग शेती यांविषयीची माहिती बनसोडे सरांच्या माध्यमातून मालाड येथील दालमिया महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मिळाली. खेड्यातील जीवन पाहण्यासाठी दहा विद्यार्थ्यांचा गट तालुक्यातील नरपड गावात आला. त्यांनी येथील पर्यावरण प्रेमी आणि निसर्गशेतीचे पुरस्कर्ते कुंदन राऊत यांच्या शिवाराला भेट दिली. या परिसरातील शेती व बागायतींची वैशिष्ट आणि यापूर्वी येथे आढळलेल्या बिबट्या, मोर, रानडुक्कर, हायना अशा पशुपक्षांचा वावर आदींची माहिती या विद्यार्थ्यांना देण्यात आली.

काही वेळााने बांधावरून भाताच्या रोपवाटिकेतून रोपांची खणणी करण्याचे प्रात्यक्षित आदिवासी मजुरांनी दाखवल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यास सांगण्यात आले. मात्र, आयुष्यातील हा पहिलाच अनुभव असल्याने हे तंत्र शिकताना त्यांना सुरुवातीला झगडावे लागले. त्यानंतर त्यांनी वन भोजनाचा आनंदही लुटला. दरम्यान या विद्यार्थ्यांना शिवारात अनवाणी येताना काटेकुटे, चिखल,साप इ. भीती वाटली होती. परंतु काही वेळातच हा मऊ चिखल तुडवताना आलेला आनंद अवर्णनीय होता. यापुढेही गवत व भात कापणी, झोडणी अशी कामे करण्यासह येथील चिकू वाडीतील कामाचा अनुभव, झाडावर चढणे याकरिता पुन्हा परतणार असल्याचा विश्वास व्यक्त करताना, खेड्यातील शेतीची मौज लुटण्यास शहरी मित्रांना प्रोत्साहित करणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.

पर्यावरण तज्ञ अ‍ॅड. गिरीश राऊत निसर्ग शेती आणि शाश्वत जीवन याविषयी तरु णांना प्रेरणा देण्याचे काम करीत आहेत. त्यामुळेच या विद्यार्थ्यांनी शिवारात उतरून काम केले. त्यांना खेड्यात येऊन काम करायचे आहे हे ऐकून सकारात्मक वाटले. - कुंदन राऊत (शेतकरी, नरपड गाव)

टॅग्स :Farmerशेतकरी