शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

उद्धवसाहेब, वाढवण बंदराबाबत स्थानिकांना दिलेला शब्द पाळा; स्थानिकांचा आर्त टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 00:28 IST

उद्ध्वस्त होणारी गावे वाचवण्यासाठी लढा

हितेन नाईक

पालघर : वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध असेल तर शिवसेना पूर्ण ताकदीनिशी तुमच्यासोबत राहील, असे पालघरमध्ये जाहीर वक्तव्य करून स्थानिकांचे मनोधैर्य वाढविणारे शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्थानिकांचा बंदराला दिवसेंदिवस विरोध वाढत असतानासुद्धा अजून गप्प का, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, उद्ध्वस्त होणारी गावे वाचविण्यासाठी लढा उभारणाऱ्या स्थानिकांवर पोलिसांच्या दबावतंत्राचा वापर सुरू करण्यात आला आहे.

केंद्राने वाढवण बंदराला लागणारी पर्यावरण विभागाची परवानगी मिळवीत बंदर उभारणीची जाहीररीत्या घोषणा केली असताना वाढवण बंदरविरोधी संघर्ष समिती आणि स्थानिकांनी मागील ३-४ महिन्यांपासून आपले लढे सुरू ठेवले आहेत. त्यामुळे वाढवणच्या भूमीत एक फावडे मारण्याची हिंमत अजून जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांना झाली नसून वाढवण बंदरविरोधी लढ्याने आता व्यापक स्वरूप प्राप्त केले आहे. 

महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, सीपीएमचे आमदार विनोद निकोले, आदिवासी एकता परिषद, कष्टकरी संघटना, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती संस्था आदी संघटना स्थानिकांच्या लढ्यात सहभागी झाल्या आहेत.मागच्या अनेक निवडणुकांच्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांनी वाढवण बंदर स्थानिकांना नको असेल तर शिवसेना ते कदापि होऊ देणार नाही, असा विश्वास इथल्या स्थानिकांना दिला होता. त्यामुळे पालघर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या खासदार आणि आमदारांना इथल्या मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. त्यामुळे आता याची परतफेड करायची पाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची असून ते आता राज्याचे मुख्यमंत्री असल्याने प्रथम त्यांनी वाढवण गावात घुसवलेल्या पोलिसांना माघारी बोलाविण्याचे आदेश द्यायला हवेत. 

निवडणूक काळात ४-४ दिवस पालघरमध्ये तळ ठोकून राहणारे मंत्री एकनाथ शिंदे, संपर्कप्रमुख आ. रवींद्र फाटक यांना शिवसेनेच्या ताकदीसोबत वाढवणवासीयांच्या मदतीला तत्काळ पाठविण्याचे आदेश द्यायला हवेत, अशी माफक अपेक्षा शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारा मतदार करीत आहे.

गावात पोलीस शिरलेत, आम्हाला भीती वाटते!वाढवणवासीयांनी उभारलेल्या विरोधाला बळ मिळू नये यासाठी किनारपट्टीवरील पोलीस ठाण्यातून स्थानिक तरुण आणि पदाधिकाऱ्यांच्या ज्या चौकशा सुरू करण्यात आल्या आहेत, त्या तत्काळ थांबविण्याचे आदेशही जारी करायला हवेत, अशा मागण्या करण्यात येत आहेत. त्याचबरोबर, ‘साहेब, गावात पोलीस शिरलेत, आम्हाला भीती वाटते !’ अशी आर्त हाक शाळकरी मुले मारतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना