शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

तेवीस कंत्राटदारांना पकडणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:07 IST

आर्थिक गुन्हे तपासशाखा : किती दिवस कागदोपत्री दाखविणार फरार

नालासोपारा : वसई विरार शहर महानगरपालिकेत ३१६५ ठेका कर्मचाऱ्यांचा पगार, वैद्यकीय भत्ता, घर भत्ता २५ कंत्राटदारांनी हडप केला म्हणून २ मार्च २०१९ ला विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पण नाममात्र २ कंत्राटदारांना अटक करून व गुन्हा दाखल होऊनही चार महिने उलटल्यानंतरही २३ कंत्राटदारांना अद्याप पर्यंत अटक न केल्यामुळेच ते बिनधास्तपणे वसई तालुक्यात वावरत असून कागदपत्रांवर मात्र फरार आहेत. प्रथम हा गुन्हा विरार पोलिसांकडे होता पण तपास व्यवस्थीत होत नसल्याने व हा विषय दैनिक लोकमतने लावून धरल्याने तो तपास पालघर अप्पर पोलीस अधीक्षकांनी १५ मे रोजी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला पण अद्याप तपास मात्र शून्य. हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे गेल्यानंतर तरी आम्हाला न्याय मिळेल या प्रतिक्षेत असणाºया कामगारांची मात्र घोर निराशाच झाली आहे.

१२२ करोडच्या घोटाळ्याचा योग्य तो तपास होऊन दोषी कंत्राटदार आणि मनपा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून पोलिसांनी कर्मचाºयांना न्याय मिळवून देणे गरजेचे होते पण आर्थिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी गुन्हे दाखल झालेल्या २३ कंत्राटदारांना मात्र ते त्यांचे नातेवाईक किंवा जावई असल्याप्रमाणे आर्थिक व्यवहार करून पाठींशी घातल असल्याची चर्चा सध्या वसईत जोर धरू लागली आहे. जर खरोखरच तपास अधिकाºयांना कामगारांना न्याय द्यायचा असता तर वसई न्यायालयाने अंतरिम जामीन नामंजूर केलेल्या कंत्राटदारांना वेळ न घालवता त्यांनी कधीच अटक केली असती पण त्यांनी कामगारांना न्याय मिळवून देण्याऐवजी गुन्हे दाखल असलेल्या कंत्राटदारांना न्यायालयाकडून जामीन कसा मिळेल यावर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हा वर्ग केल्यानंतर २१ मे रोजी वसई न्यायालयात आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व तपास अधिकारी महेश शेट्टे यांनी या गुन्ह्याबाबत कंत्राटदारांनी कर भरलेले आहेत की नाही याबाबत संबंधित खात्यासोबत पत्रव्यवहार केलेला असून तिकडून काही उत्तरे येणे बाकी असल्याचा जबाब दिला असल्याचे सूत्रांकडून कळते तर आठ दिवसांनी २९ मे रोजी पुन्हा वसई न्यायालयात अटक आरोपी विलास चव्हाण याने शासनाच्या विविध करापोटी १ कोटी भरले असून उर्वरीत १ कोटी रु पये भरावयाचे आहे अशी दुहेरी भूमिका घेणारा जबाब दिला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळते. आरोपी व अटक कंटारदार विलास चव्हाण याने १ कोटी भरल्याचे कोणाकडून सर्टीफाय करून घेतले ? सेवा कर, व्यवसाय कर, कामगार राज्य विमा योजना, कामगार आयुक्तालय तसेच संबंधित विभागाकडून याबाबत सर्टिफाय केल्याशिवाय आरोपी सांगतो म्हणून तपास अधिकाºयाने न्यायालायत कसा काय जबाब दिला व त्याचे म्हणणे कसे काय ग्राह्य धरले असे अनेक प्रश्न उभे टाकले असून त्यांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.गुन्हे दाखल झाल्यावर फरार असलेले कंत्राटदारदिव्या इंटरप्राइजेस (कमलेश ठाकूर), वेदांत इंटरप्राइजेस (समीर विजय सातघरे), मधुरा इंटरप्राइजेस (समीर सातघरे), गजानन इंटरप्राइजेस (अर्चना पाटिल), संखे सिक्युरिटी सर्व्हिस (दिनेश भास्कर संखे), श्रीजी इंटरप्राइजेस (योगेश घरत), ओम साई एंटरप्राइजेस (विनोद पाटिल), वरद एंटरप्रायजेस (सुरेंद्र बी. भंडारे), वरद एंजिनिअरिंग (अभिजित गव्हाणकर), स्वागत लेबर कॉन्ट्रक्टर (नंदन जयराम संखे), क्लासिक एंटरप्राइजेस (दिनेश पाटील), द हिंद इलेक्तिट्रकल अँड इंजीनियर (किशोर नाईक), सिद्धी विनायक एंटरप्राइजेस (नितिन शेट्टी), अथर्व एंटरप्राइजेस, सद्गुरु ट्रेडिंग कंपनी (जिग्नेश देसाई), शिवम एंटरप्रायजेस (तबस्सुम ए.मेमन), रिलाएबल एजन्सी ( झकीर के. मेमन), चिराग लेबर कॉन्ट्रक्टर (राजाराम एस गुटूकडे), युनिव्हर्सल एंटरप्रायजेस (सुबोध देवरु खकर), बी एल होणेंज सिक्युरिटी (सुरेंद्र भंडारे), जीवदानी फायर सर्व्हिसेस (किशोर पाटील), आरती सुनील वाडकर आणि श्री अनंत एंटरप्रायजेस (रवी चव्हाण)विरार पोलिसांनी तपास केला नसल्यामुळे तो आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग केला आहे. ज्यांचे पैसे या कंत्राटदारांनी खाल्ले आहेत त्यांचे जबाब सुद्धा विरार पोलिसांनी घेतले नव्हते. तपास कुठ पर्यंत आला ते तुम्हाला कळवतो. -विश्वास वळवी, पोलीस उपअधीक्षक,वसई न्यायालयाने कंत्राटदारांचा अंतरिम जामीन नामंजूर केला तरी त्यांना अटक का केली नाही ? न्यायालयाने त्यास मनाई केली आहे का ? की वरिष्ठ अधिकाºयांने अटक न करण्याचा आदेश दिला आहे का ? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. पण पोलिसांना कामगारांचे काहीही सोयरसुतक नाही. पोलीसच कंत्राटदारांना पाठीशी घालत आहेत.- निलेशी खराते, वकील,

घोटाळा नक्की कितीचा ?१२२ करोडचा घोटाळा झाला म्हणून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला पण याची वास्तविकता पाहता हा घोटाळा १० पटीपेक्षा जास्त असल्याचे सूत्रांकडून कळते आहे. म्हणून या घोटाळ्याची एस आय टी चौकशी केली तर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन याचे बिंग फुटून घोटाळा कितीचा झाला हे उघड होईल तर या घोटाळ्यास नक्की कोण जवाबदार आहे हे सुद्धा बाहेर येईल.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार