शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

येथे केवळ महिलांना प्रवासभाडे, बोटीने जाण्यासाठी पुरूषांना फुकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 00:08 IST

अर्नाळा गावातील अजब प्रथा : बोटीने जाण्यासाठी पुरूषांना भाडे नाही

प्रतीक ठाकूर

विरार : अर्नाळा सागरी किनाऱ्यापासून पासून काहीच अंतरावर अर्नाळा किल्ला आहे. मात्र, या किल्ल्यात जाण्यासाठी केवळ महिलांकडून प्रवास भाडे घेतले जाते तर पुरूष फुकट प्रवास करतात. आतापर्यंत गावकऱ्यांनी किंवा प्रशासनाने यावर काहीच आक्षेप घेतलेला नाही.

अर्नाळा सागरी परिसरात असलेल्या अर्नाळा किल्ला गावात रोज हजारो लोक ये - जा करत असतात. अर्नाळा किल्ला गावात तीन साडे तीन हजारच्या जवळपास लोकसंख्या आहे. हे गाव समुद्रातील एक बेट असून येथे प्रवासाठी केवळ फेरी बोट हे एकमेव साधन आहे. मात्र, येथील एका पद्धतीमुळे महिलांना प्रवास करणे कठीण होते आहे.

या गावात प्रवासासाठी असलेल्या फेरी बोटीत केवळ महिलांकडून प्रवास भाडे घेतले जाते. तर गावातील पुरु ष मंडळी फुकट प्रवास करतात. असे का? याचे उत्तर मात्र कुणाकडे नाही आहे. परंपरागत ही प्रथा सुरू आहे. आणि काळ बदलला तरी ही प्रथा तशीच सुरू आहे. विशेष म्हणजे, याचे कुणाला काहीच गैर वाटत नाही. प्रवासासाठी दुसरे कोणतेही साधन या गावात नाही. सध्या येथे ठेका पद्धतीने दोनच प्रवासी वाहतूक बोट आहेत. ही बोट कंत्राटी पद्धतीने मेरीटाइम बोर्डाच्या नियमानुसार चालवली जाते. त्याचे प्रवासी भाडे हे सुद्धा मेरीटाइम बोर्डने ठरविले आहे. पण यात गावाच्या या अजब प्रथेनुसार केवळ गावातील महिलांना प्रवासासाठी पैसे मोजावे लागतात.पुरु ष मासेमारी करतात आणि आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळी धावून येतात. तर महिला मासेमारी करून आणलेले मासे विक्र ीसाठी नेतात. त्यामुळे घराचे संपूर्ण अर्थकारण त्यांच्याकडे असते, म्हणून महिलांकडून पैसे घेतले जातात अशी माहिती गावकºयांनी दिली. विशेष म्हणजे, या गावातील महिला सुद्धा या प्रथेच्या विरोधात जात नाहीत. केवळ परंपरागत रीत असल्याने त्या निमूटपणे त्याचे पालन करतात. सध्या गावातील परिस्थिती बदलली आहे. महिलांना सतत कोणत्या न कोणत्या कामासाठी शहरात जावे लागते. मुलांना शाळेत सोडणे असेल, भाजीपाला, शिक्षण, नोकरी याकामी महिलांना प्रवास करावा लागत आहे. प्रयेक वेळेस त्यांना या प्रवासासाठी १० रु. मोजावे लागतात. स्त्री पुरु ष समानतेचे धडे गल्लो गल्लीतून दिले जात आहेत. पण केवळ परंपरेच्या नावाखाली महिलांना असमानतेची वागणूक दिली जात असल्याचे उदारण आहे.आमच्या गावातील सर्व आर्थिक व्यवहार हा महिलांच्या हाती आहेत, ही प्रथा अनेक वर्षापासून सुरु आहे. महिलांकडे पैसे असतात म्हणून फक्त महिला प्रवासभाडे देतात. परंपरागत प्रथा असल्याने नाईलाजास्तवर आम्हाला तोटा सहन करून व्यवसाय करावा लागत आहे. ङ्क्त- चंद्रकांत मेहेर,ठेकेदार, मेरी टाईम बोर्डही गावाची प्रथा आहे, आणि ती कधीपासून सुरु झाली याची कुणालाही माहिती नाही. पण परंपरा म्हणून आम्ही सर्वजण याचे पालन करतो.- आनंद मेहेर, स्थानिकआमच्या घरातील पुरूष खोल समुद्रात जाऊन मासेमारी करतात, वेळ प्रसंगी मदतीला धावतात. त्यांनी पकडून आणलेले मासे आम्ही विकून पैसा मिळवतो, त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहार महिलांकडे असतात. या प्रथेचे आम्हाला काहीही वाटत नाही- वनिता वैती, स्थानिक 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारboat clubबोट क्लब