शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आदिवासी तरुणाचे पारंपरिक हस्तकला कौशल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:12 IST

हस्तकलेला मार्केट नाही, शासनाची उदासीनता, सरकारने दखल घेण्याची केली मागणी

- हुसेन मेमन जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा म्हटला की, समोर उभे राहते ती बेरोजगारी. स्थलांतर आणि कुपोषण या येथील गंभीर समस्या आहेत. यावर मात करण्यासाठी सरकार प्रत्येक हाताला काम, घराघरात रोजगार अशा घोषणा करीत आहे. तर येथील बेरोजगारांना रोजगार मिळावा म्हणून रोजगार हमी योजना सुरू आहेत. मात्र सरकारच्या उदासीनतेमुळे या योजनेचाही पाहिजे तसा फायदा झालेला नाही. मात्र यावर मात करत एका आदिवासी तरुणाने आपल्या अंगी असलेली पारंपरिक हस्तकला जोपासली आहे.

जव्हार तालुक्यातील रामखिंड गावातील भगवान कडू याने घरातच स्टुडिओ बनविला आहे. हा आदिवासी तरुण बोहडा या उत्सवासाठी ५२ देवांचे मुखवटे तयार करतो. या हस्तकलेतून सोंगे, देवदेतांचे मुखवटे, पाळीव प्राणी, तारपा, घरातील संसारोपयोगी साहित्य बनविले जात आहे. ही वडिलोपार्जित हस्तकला आपण जोपासत असल्याचे त्याने सांगितले. परंतु हस्तकलेला मार्केट नसल्याची खंत व्यक्त केली असून, या हस्तकलेची सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे. मात्र या बाबतीत शासनाची उदासीनता दिसून येत आहे.

भगवान कडू यांनी आपल्या वडिलांकडून ही मुखवटे तयार करण्याची कला जोपासली आहे. भगवान कडू यांची पत्नी व मुलेही त्यांना ही कला जोपण्यास मदत करीत आहेत. रद्दी कागदाच्या लगद्यापासून आकर्षक मूर्ती तयार करून त्यांची विक्री हे कुटुंब करीत आहे.विशेष म्हणजे भगवान कडू हे एका हाताने अपंग असूनही मूर्तींना सुबक आकार देत आहेत. या मूर्ती बनविण्यासाठी जंगलातील चेरी झाडाची साल पाण्यात भिजवून डिंक तयार केला जातो. त्या साहित्याचा वापर करून देवाच्या मूर्तीसह कासव, हरीण असे अनेक प्राणीही साकारले जातात.

हरीण, सांबर, बकरी, वाघ मुखवटा, सूर्यनारायण, दळण दळणारी महिला, तीर कमान चालविणारा पुरुष, कासव, गणपती, असे आकर्षक मुखवटे बनवीत आहे. तारप्याचे विविध आकर्षक प्रकार, गौतम बुद्ध, जाती अशा अनेक प्रकारच्या हुबेहूब मर्ू्त्या साकारल्या जात आहेत.

डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावात उपजत कलेच्या विकासाला फारसा वाव नव्हता. बनविलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ नव्हती. कडू बांधवांना व्यवसाय वाढीसाठी अर्थसहाय्याची गरज होती. परंतु या कलाकारांकडे ना शेती होती ना वडिलोपार्जित संपत्ती.

या विपरीत परिस्थितीत भगवान कडू यांना तत्कालीन ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत कर्ज मिळाले. त्या माध्यमातून सरकारकडून भरविल्या जाणाºया विविध प्रदर्शनात त्यांनी भाग घेतला. तिथे या मूर्ती विकून हातात पैसा येऊ लागला. त्यांनी मिळालेल्या अर्थसहाय्याची परतफेड केली, मात्र तरीही कालांतराने या कलाकाराकडे दुर्लक्ष होत गेल्याचे दु:ख कडू यांनी व्यक्तकेले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVasai Virarवसई विरार