शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

निम्मी घरपट्टी थकीत!

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

गेल्या तीन वर्षांपासून घरपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याने थकबाकीचा वाढलेला डोंगर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे वसई विरार महानगरपालिकेची सोमवार पर्यंतची

- शशी करपे, वसई

गेल्या तीन वर्षांपासून घरपट्टी वसुलीकडे दुर्लक्ष झाल्याने थकबाकीचा वाढलेला डोंगर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता यामुळे वसई विरार महानगरपालिकेची सोमवार पर्यंतची वसुली अवघ्या ५० टक्यांपर्यंत पोचली आहे. येत्या १५ दिवसात वसुलीचे उद्दीष्ट गाठणे महाकठीण झाले असले तरी आयुक्तांनी वसुलीसाठी कडक मोहिम हाती घेतली असून नोटीसा, सील आणि जप्तीची कारवाई करीत वसुली सुरु केली आहे. घरपट्टी हेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायमस्वरुपी उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत मानले जाते. त्यामुळे किमान ९० टक्के वसुली झाली पाहिजे असे बंधनकारक आहे. अन्यथा सरकारी योजनांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. मात्र, वसई विरार महानगरपालिका हद्दीत सव्वा सहा लाख मालमत्ताधारक आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षात घरपट्टीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे थकबाकीचा रक्कम ८१ कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे चालू वर्षी घरपट्टीचे ९८ कोटीचे उद्दीष्ट गृहीत धरून थकबाकीसह पालिकेला १७९ कोटी रुपयांची वसुली करायची आहे. मात्र, सोमवार संध्याकाळपर्यंत पालिकेच्या तिजोरीत अवघे ९० कोटी रुपये जमा झाले असून घरपट्टी वसूली ५० टक्के झाली आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात घरपट्टी वसुलीचे उद्दीष्ट साध्य करणे पालिकेला अशक्य होणार आहे. महापालिकेला विरार विभागातून ४० कोटी रुपयांची वसुली करायची असून सध्या २० कोटीपर्यंत वसुली पोचली आहे. नालासोपारा विभागातून ८७ कोटीची वसुली करायची असून सोमवारपर्यंत वसुली अवघी ३९ कोटी रुपये झाली आहे. त्यामानाने नवघर-माणिकपूर आणि वसई विभागातून वसुलीचे उद्दीष्ट जवळपास साध्य होण्याची स्थिती आहे. नवघर-माणिकपूर विभागातील १९ कोटी पैकी १४ कोटी वसुली झाली आहे. तर वसई विभागातून ४ कोटी पैकी ३ कोटीपर्यंत वसुली झाली आहे. घरपट्टी वसुलीवर कंत्राटी कर्मचाऱ्यातील कपातीचा परिणाम झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात जेव्हा कर्मचारी संख्या अधिक होती त्याच काळात वसुली मात्र झाली नसल्याचे उजेडात आले आहे. गेल्या वर्षी विरार विभागात ४० कर्मचारी घरपट्टी विभागात कार्यरत होते. गेल्या दीड महिन्यांपासून ती संख्या ५ वर आली असून यात घरोघरी वसुली आणि कार्यालयात पैसे जमा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नालासोपारा विभागात १२५ कर्मचारी होते. आता फक्त २५ कर्मचारी आहेत. नवघर-माणिकपूर आणि वसई विभागात कर्मचारी संख्या घटली असली तरी वसुलीवर परिणाम झालेला नाही. दरम्यान, आयुक्तांनी लक्ष घातल्याने घरपट्टी वसुलीला वेग आल्याचे चित्र असताना घरपट्टी विभागातील अनेक प्रमुख अधिकारी वसुलीऐवजी अनधिकृत बांधकामांना घरपट्टी लावण्याकडे जास्त लक्ष देत आहेत. गेल्या चार महिन्यात अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात घरपट्टी लावली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. कर विभागासाठी स्वतंत्र मूल्य निर्धारक तथा कर निर्धारक संकलक अधिकारी अद्याप नेमण्यात आलेला नाही. सहाय्यक आयुक्त सदानंद सुर्वे यांच्याकडे आस्थापनासह कर विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. घरपट्टी वसुलीपेक्षा अवैध आणि अनधिकृत बांधकामांना ती लागू कशी करता येईल, यावरच यंत्रणेने भर दिल्याने हा प्रकार घडला आहे, अशी उघड चर्चा महानगरात आणि महापालिका वर्तुळात सध्या खमंगपणे सुरू आहे.जप्ती, सील ठोकणे अशा जहाल उपायांचा अवलंबचार महिन्यांपूर्वी कार्यभार हाती घेतलेल्या आयुक्त सतीश लोखंडे यांनी मात्र घरपट्टी वसुलीवर लक्ष केंद्रीत केल्याने वसुलीचा आकडा ५० टक्यांपर्यत पोचू शकला आहे. आता लोखंडे यांच्या आदेशानुसार नोटीसा, सक्तीची वसुली आणि जप्तीची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. तसेच मोठ्या थकबाकीदारांची नावे जाहिर फलकावर लावली आहेत. वसुलीचे कर्मचारी इमारतींच्या आवारात जाऊन घरपट्टी भरण्याची विनंती करतात. १५ मिनिटात थकबाकी भरली नाही तर थकबाकीदारांची नावे जाहिर करून त्यांच्यावर थेट जप्तीची कारवाई करु लागली आहेत. त्यामुळे वसुलीला थोडासा वेग आला आहे. घरपट्टी भरणे सोयीचे व्हावे यासाठी प्रत्येक विभागीय कार्यालयात सुट्टीच्या दिवशीही कर भरणा केंद्रे सुुरु ठेवण्यात आली आहेत. आॅनलाईनसह शहरातील राष्ट्रीयकृत बँकांच्या ५१ शाखांमध्ये कर भरण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मात्र, याबाबतीत लोकांमध्ये जागृती न झाल्याने या योजनेला तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.