शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

मोखाड्यात रोजगार हमी योजनेचे तीनतेरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 12:56 AM

रोजगार हमी कायदा केंद्र आणि राज्य शासनाने पारित केला असला तरी स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर आली आहे.

रवींंद्र साळवेमोखाडा : मोलमजुरी करून हातावर पोट असलेल्या आदिवासींना काम नसल्याने येथील आदिवासी रोजगारासाठी शहराकडे स्थलांतरित होतो आहे. यामुळे रोजगार हमी योजनेचे अपयश चव्हाट्यावर आले आहे.स्थानिक पातळीवर रोजगार मिळावा, स्थलांतर थांबावे, या उद्देशाने रोजगार हमी कायदा केंद्र आणि राज्य शासनाने पारित केला असला तरी स्थानिक प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. मोखाडा तालुक्यात १७ हजार ८७० नोंदणीकृत मजूर असून सामाजिक वनीकरण २२ कामे, ८० मजूर, वन विभाग १७ कामे, ३०१ मजूर, सा.बां.विभाग मोखाडा १ काम, ४१ मजूर, कृषी विभाग ५४ कामे, १८७४ मजूर अशी एकूण यंत्रणेची ९४ कामे सुरु असून त्यावर २२९६ मजूर काम करत आहेत. तर ग्रामपंचायतीची ९३ कामे सुरू असून तेथे ८१५ मजुरांना रोजगार मिळाला आहे. अशी रोजगार हमी योजने अंतर्गत यंत्रणा आणि ग्रामपंचायत स्तरावर १८७ कामे सुरू असून केवळ ३ हजार १११ मजुरांनाच रोजगार उपलब्ध झाला आहे. उर्वरीत १४ हजार ५८ जॉबकार्डधारक मजूर रोजगारासाठी स्थलांतरित झाले आहेत.मोखाडा तालुक्यात वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या पायाभूत सुविधांबरोबरच रोजगाराचा प्रश्न ज्वलंत आहे. स्वातंत्र्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक पक्ष आणि संघटना सत्तेत आल्यास येथील रोजगाराचा प्रश्न सोडवू, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ, यापुढे प्रत्येक हाताला काम हाच अजेंडा असे सांगत मतांचा जोगवा मागत आले आहेत. गेल्या ७० वर्षात अनेक सत्तांतरे झाली, परंतु येथील समस्या कायम आहेत.रोजगार हमी योजनेत रोजगाराची हमी मिळत नसल्याने आदिवासी समाज रोजगारासाठी गावोगाव भटकतो. वीटभट्टी, इमारत बांधकाम, रेती काढणे अशा मिळेल त्या कामाच्या शोधात कुटुंबासह फिरतो आणि फक्त जगण्यापुरतीच मजुरी पदरात पडली तरी समाधानी राहतो. या भटकंतीमुळेच जव्हार, मोखाडासारख्या आदिवासीबहुल तालुक्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे. वर्षातील ७ ते ८ महिने रोजगारासाठी स्थलांतरित व्हावे लागते.>२००५ मध्ये रोजगार हमी कायदा लागू करून या कायद्यातील तरतुदीचे आणि महाराष्ट्राच्या मूळ रोहयोतील तरतुदीचे एकत्रीकरण करून देशातील सर्वच राज्यांमध्ये ही योजना राबवण्यात आली. परंतु शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेला बासनात गुंडाळून ठेवण्याचे काम केले जात असल्याने आदिवासींची रोजगाराअभावी होणारी पायपीट थांबलेली नाही. या योजनेत मागेल त्याला कामही मिळत नाही आणि १५ दिवसात दामही मिळत नाही.>रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणाहून रोजगाराची मागणी होत आहे त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला जाईल.- विजय शेट्ये, तहसीलदार मोखाडा