शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

तलासरी-डहाणूला दोन महिन्यांत भूकंपाचे ७०० धक्के, भूकंपग्रस्तांना मुख्यमंत्री भेटणार की नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:41 IST

पालघर जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर पासून भूकंपाचे कमी-अधिक तीव्रतेचे सुमारे ७०० धक्के बसल्याची नोंद भूकंप मापक यंत्राने घेतल्याची माहिती आहे.

पालघर - जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यात ११ नोव्हेंबर पासून भूकंपाचे कमी-अधिक तीव्रतेचे सुमारे ७०० धक्के बसल्याची नोंद भूकंप मापक यंत्राने घेतल्याची माहिती असून ४.१ रिष्टर स्केल च्या धक्क्याने जिल्हाप्रशासनाची झोप उडवून टाकली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरूपी भूकंपमापन केंद्र उभारण्याचा निर्णय जिल्हाप्रशासनाने घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली.जिल्ह्यात एकामागोमाग सुरू झालेल्या भूकंपाच्या पाशर््वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या भूकंपा दरम्यान सर्व शासकीय अधिकारी व विविध प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास करण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती सादर केली. ह्यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.नवनाथ जरे आदी उपस्थित होते. या बैठकीला रिलायन्स गॅस पाईपलाईन, डहाणू थर्मल पॉवर स्टेशन, तारापूर अणू ऊर्जा प्रकल्प, सूर्या प्रकल्प आदी प्रकल्पांच्या अधिकाºयांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये घेतल्या जात असलेल्या दक्षतेबाबतचे सादरीकरण केले. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन दक्ष असून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आश्रमशाळांच्या आवारात तात्पुरती सोय म्हणून तंबू उभारले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या आवारातही आणखी तंबू उभारले जातील. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले असता मागील ३ महिन्यांपासून विद्यार्थी भीतीने शाळेतच येत नसल्याने त्यांचा अभ्यासक्रम बुडाल्याने एन परीक्षेच्या तोंडावर प्रशासनाने त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या काही उपाययोजना आखल्या आहेत का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यावर शिक्षणाधिकाºयांच्या बैठकीत त्या संदर्भात उपाय योजले जातील असे जिल्हाधिकाºयांनी सांगितले.यावेळी कुर्झे धरणाच्या डागडुजीसाठी निधीची मागणी करण्यात आली असून सर्वेक्षण केलेल्या १ हजार ५०० घरापैकी १ हजार ३०० घरांना नुकसानभरपाई देणे, घर बांधणीसाठी स्थानिक गवंड्यांना प्रशिक्षण देणे, गंजलेले विद्युत खांब तात्काळ बदली करणे, हैद्राबाद आणि दिल्ली येथील तांत्रिक यंत्रणा मार्फत सिस्मोमीटर बसवून भूकंपाचे नियमित विश्लेषण करणे, कायमस्वरूपी सिस्मोग्राफीक सेंटर उभारणे आदी बाबत निर्णय घेण्यात आले.तिच्या कुटुंबीयांना भरपाई नाहीचभूकंपा दरम्यान जीव वाचिवण्यासाठी घरातून बाहेर पळणाºया। या दोन वर्षीय मुलीचा दगडावर आपटून झालेला मृत्यू मिळणाºया नैसर्गिक आपत्तीच्या भरपाईच्या निकषात बसत नसल्याने तिच्या कुटुंबियांना कुठलीही आर्थिक मदत मिळत नसल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहाय्यता फंडातून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी होत आहे.मागील ३ महिन्यापासून तलासरी,डहाणू मध्ये एकावर एक भूकंपाचे धक्के बसून ग्रामस्थ जीव मुठीत धरून आपले जीवन जगत असून अत्यंत भयावह परिस्थिती उद्भवली आहे. वाडा आणि सातपाटी येथे कार्यक्र मासाठी येणाºया मुख्यमंत्र्यांना हाकेच्या अंतरावर असलेल्या भूकंपग्रस्त भागातील जनतेची भेट घ्यावीशी वाटली नसल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उद्या ते भूकंपग्रस्तांची भेट घेणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :EarthquakeभूकंपVasai Virarवसई विरार