शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यामध्ये १५० बेकायदा शाळा, कारवाई करण्यासाठी होते दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 00:47 IST

वसई तालुक्यात एकूण १५० बेकायदा शाळा आहेत. तर या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षा धोक्यात आली आहे.

विरार : वसई तालुक्यात एकूण १५० बेकायदा शाळा आहेत. तर या शाळांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षा धोक्यात आली आहे. तर प्रशासनातर्फेया शाळांना नोटिसा बजावण्याव्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.नुकत्याच जाहीर झालेल्या यादीनुसार वसई तालुक्यात एकूण १५० बेकायदा शाळा आहेत. या शाळांचे मालक गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाला फसवत आहेत. इतकेच नाही तर यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. मात्र, पोलीस प्रशासन व शिक्षण विभाग हे एकमेकांवर जबाबदारी ढकलत असून ठोस कारवाई केली जात नाहीे. या शाळांवर कारवाईची सुरूवात झाली असून प्रशासनातर्फे आतापर्यंत १८ शाळांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र, नोटिसा देऊनही शाळा मालक कसलीच हालचाल करत नसल्यामुळे प्रशासनाने पोलिसांची मदत घेतली आहे.पोलीस कारवाईसाठी विलंब करत आहेत. शाळा मालकाला अटक केल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी पोलिसांकडून कारवाई होत नाहीे, असे अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांचे म्हणणे आहे. शिक्षण मंडळाचा अंधाधुंदी कारभार सुरु असून त्यांनी विद्यार्थ्यांची कुठेच सोय केलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची शक्यता आहे. शिक्षण मंडळाने आतापर्यंत नोटिसा पाठवण्याशिवाय कसलीच कारवाई केली नाही तर विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पोलीस कारवाईसाठी दिरंगाई करत आहेत.वसई पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना बेकायदा शाळा चालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ चा भंग करत असल्याने तत्काळ त्या शाळा बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच तालुक्यात बेकायदा असलेल्या शाळांना नोटिसा बजावून त्या बेकायदा असल्याचा फलक लावण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे. तर प्रशासनाने नुकतेच या शाळांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत १३ शाळांवर कारवाई झाली असून इतर शाळांची चौकशी सुरु आहे.वसई तालुक्यात बऱ्याच शाळा या प्राथमिक स्तराच्या आहेत. परंतु हे शाळेचे चालक आणि मालक या शाळा माध्यमिक शिक्षण देत आहेत. शाळेला परवानगी नसतानाही अनेकदा मजले वाढवले जातात. विशेष म्हणजे या शाळांना प्रशासनातर्फे परवानगी दिलेली नसते. तर खालच्या दाराचे व कच्चे बांधकाम केल्यामुळे या शाळांच्या इमारतीत सतत गळती सुरु असते. स्वच्छता नसते जिने अरूंद आहेत, अग्निशमनची व्यवस्था उपलब्ध नाही.शाळांच्या बाहेर कचºयाचे ढिगारेबºयाच शाळा या नाल्याच्या बाजूला बांधलेल्या असतात. तर शाळांच्या बाहेर कचºयाचे ढिगारे असतात. यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही मोठा आजार होण्याची शक्यता आहे. तसेच शाळेत पूर्ण दिवस दुर्गंधी असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही व पूर्ण दिवस त्यांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. प्रशासनाने आता युद्ध पातळीवर कारवाई सुरु करण्याची गरज आहे.आम्ही युद्धपातळीवर कारवाई सुरू केलेली आहे. नोटिसाही बजावलेल्या आहेत. लवकरच बेकायदा शाळा बंद होतील.- माधवी तांडेल, गटशिक्षण अधिकारी

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्रVasai Virarवसई विरार