शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

कुर्झे धरणावर ९ महिन्यांपासून वीजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:10 IST

निधीअभावी कामे रखडली : आपत्कालीन परिस्थितीत दरवाजे उघडायचे कसे?

सुरेश काटे

तलासरी : दापचरी दुग्ध प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या कुर्झे धरणाची सुरक्षा सध्या रामभरोसे असून धरणावर सुरक्षा रक्षकांच्या बरोबरच नऊ महिन्यांपासून वीज पुरवठाही नाही. मात्र, वीज पुरवठ्याअभावी आपत्ती काळात धरणाचे दरवाजे उघडायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, ६ ते ८ नोव्हेंबर या काळात चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. आपत्काळात कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. पण, वीजपुरवठाच नसेल तर हे दरवाजे उघडायचे कसे असा प्रश्न आहे.

नऊ महिन्यापासून या धरणावर वीज पुरवठा बंद आहे. दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीज पुरवठा सार्वजनिक बांधकाम खात्याचे वीज विभाग बघते. याचा कारभार कल्याण वरून चालतो. त्यामुळे येथे या विभागाने एक कर्मचारी ठेवला आहे. तरीही तांत्रिक समस्येमुळे नऊ महिन्यांपासून वीज पुरवठा बंद आहे. याबाबत दापचरी बांधकाम विभागाने प्रकल्प अधिकाऱ्यांना तसेच सार्वजनिक बांधकाम वीज विभागाला पत्रव्यवहार केला आहे, पण अद्याप यावर कार्यवाही झालेली नाही.दापचरी दुग्ध प्रकल्पाचा वीज पुरवठा वीज वितरण कंपनीकडे हस्तांतरण करण्याचा प्रस्ताव पाच वर्षापासून प्रलंबित आहे. त्यामुळे दापचरी येथील वीज समस्या दूर करण्यास दुग्ध विकास आयुक्तांकडून निधीच मिळत नाही. दापचारी दुग्ध प्रकल्पाची वीज व्यवस्था डबघाईला आली आहे. गेल्या चाळीस वर्षात धरण परिसरातील वीज तारा, ट्रान्सफार्मर बदलण्यात आलेले नाहीत, त्यामुळे या धरणावर वारंवार वीज पुरवठा बंद पडतो. पण याची दुरुस्ती करण्यासाठी प्रकल्प कार्यालय निधीच देत नाही. निधी अभावी सामग्री खरेदी कशी करायची, अशी विचारणा कल्याण वीज विभागाचे अधिकारी करतात.पालघर जिल्ह्याला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने आपत्काळात कुर्झे धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्याच्या सूचना केल्या आहेत. पण विजेअभावी दरवाजे उघडायचे कसे, धरणाचे दरवाजे मॅन्युअली उघडण्यास तीन ते चार लागतात. तसेच पाण्याचा जोर जास्त असल्यास दरवाजे मॅन्युअली उघडणे शक्य होत नाही, अशावेळी दरवाजे न उघडल्यास धरणास धोका उद्भवू शकतो.धरणावर वीज पुरवठा नऊ महिन्यापासून बंद आहे. प्रकल्प कार्यालयाला वारंवार पत्रव्यवहार केला आहे. सुरक्षा रक्षकाअभावी सामग्री चोरीस जात आहे. तसेच विजेअभावी धरणाचे दरवाजे उघडणे शक्य होत नाही. - कुंदन वाघ, ज्युनिअर अभियंता, बांधकाम विभाग, दापचरीवीज दुरुस्तीसाठी प्रकल्पाकडून निधीच दिला जात नसल्याने चाळीस वर्षापासूनच्या वीज तारा ट्रान्सफार्मर दुरुस्त कसे करायचे.- प्रशांत धोडे, उपअभियंता,वीज विभाग, कल्याण.धरणावरील वीजपुरवठा सुरू करण्याबाबत वीज विभागाला कळविले आहे. परंतु दुग्ध विभाग आयुक्त वरळी, यांच्याकडून निधी उपलब्ध होत नाही. - एस.सी. चौधरी, सहा. प्रकल्प अधिकारी, दापचरी

टॅग्स :DamधरणVasai Virarवसई विरार