शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
"पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
6
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
7
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
8
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
9
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
10
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
11
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
12
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
13
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
14
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
15
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
16
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
17
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणे; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
18
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
19
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
20
पक्षासाठी उतरलो रस्त्यावरी, तरीही बसविले घरी, आयातानाच दिली उमेदवारी
Daily Top 2Weekly Top 5

वसई-विरार महापालिकेत भ्रष्टाचार झालेला नाही; आयुक्त गंगाथरन यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 02:58 IST

पालकमंत्री दादा भुसेंची आढावा बैठक संपन्न, याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या.

वसई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसई-विरारची परिस्थिती चिंताजनक होऊ लागल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषीमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयाला भेट देत सर्व लोकप्रतिनिधी व प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. या वेळी महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार झालेला नाही व तसे विधान मी केले नसल्याचा दावा आयुक्त गंगाथरन डी. यांनी केला.

वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला खासदार राजेंद्र गावित, बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तसेच वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, आ. रवींद्र फाटक, आ. श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी कैलास शिंदे, पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे, वसई-विरार महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर शासकीय अधिकारी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्याचा कोरोनासंदर्भातील आढावा देताना जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पालघर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकप्रतिनिधी व स्थानिक अधिकारी यांच्या समित्या स्थापन करून या परिस्थितीशी कशा प्रकारे लढा देता येईल व कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याची माहिती विशद केली. याउलट, वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोणत्याही स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता त्यांच्याशी कोणत्याही प्रकारे या विषयावर चर्चा न करता महापालिकेचे आयुक्त गंगाथरन डी. हे मनमानी कामकाज चालवत आहेत, असा सूर होता. याप्रसंगी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंदर्भात विविध सूचना केल्या. दरम्यान, या आढावा बैठकीत चर्चेदरम्यान खुलासा करताना महानगरपालिकेत कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार झालेला नाही व तसे विधान मी केले नसल्याचा दावा आयुक्त गंगाथरन यांनी केल्याने उपस्थित लोकप्रतिनिधी व पत्रकारांना धक्का बसला.ग्रामीण भागातील रुग्णांना रुग्णालयांत दाखल करून घ्याकोरोना पॉझिटिव्ह रुग्ण हे मुंबई, ठाणे यासारख्या ठिकाणी जास्त खर्च करून उपचारासाठी दाखल होतात. मात्र, वसई तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही.रुग्णांना ६० कि.मी. दूर विक्रमगड, बोईसरला उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला. याची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करून घेण्याचे आदेश दिले तसेच काही विशेष सूचनादेखील आयुक्तांना समक्ष दिल्या.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारpalgharपालघर