शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

किनारपट्टीला लाटांचे टेन्शन, कामे तूर्त स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:35 IST

जिल्ह्यातील किनारपट्टीवरील घरांच्या संरक्षणासाठी मंजूर झालेले धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे प्रकरण हरित लवाद कोर्टात पोहचल्याने बंधारे उभारण्याचे काम तूर्तास लांबले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अजस्त्र लाटा घरावर आदळून संसार उध्वस्त होऊ नये म्हणून किनारपट्टीवर एकच धावपळ सुरू आहे.

- हितेन नाईकपालघर - जिल्ह्यातील किनारपट्टीवरील घरांच्या संरक्षणासाठी मंजूर झालेले धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे प्रकरण हरित लवाद कोर्टात पोहचल्याने बंधारे उभारण्याचे काम तूर्तास लांबले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात अजस्त्र लाटा घरावर आदळून संसार उध्वस्त होऊ नये म्हणून किनारपट्टीवर एकच धावपळ सुरू आहे.किनारपट्टीवरील घरे, शेती, बागायती आदींची भरतीच्या पाण्यापासून होणारी धूप रोखण्यासाठी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड कडून धुपप्रतिबंधक बंधारे बांधण्याचे काम प्रगतीपथावर होते. रायगड जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा, नावेदर, सासवगे या चार गावासह मुंबईर् (वर्सोवा) येथील सागर कुटीर ते हिंदू स्मशानभूमी, हिंदुजा हॉस्पिटल, माहीम, हाजी अली दर्गा, प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल, वाळकेश्वर, गीता नगर, कुलाबा, रेडिओ क्लब ते अपोलो बंदर आदींसह पालघर जिल्ह्यातील आशापुरा मंदिर एडवन, सातपाटी, नवापूर, तारापूर, आणि घिवली, रान गाव, कळंब, नरपड, अर्नाळा किल्ला या नऊ गावासमोरील समुद्राच्या महाकाय लाटांना थोपवून धरण्यासाठी बंधारे मंजूर करण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआरझेड) तो प्रस्ताव नामंजूर केल्याने व एनजीटी द्वारे हे प्रकरण उच्चन्यायालायत पोहोचल्याने धुपप्रतिबंधक बंधारे उभारण्याच्या कामांना स्थिगती मिळाली आहे.राज्यात पर्यटनाला सुगीचे दिवस आल्याने किनारपट्टी जवळील जागा महसूल विभागाच्या मदतीने गिळंकृत करण्याच्या प्रकरणा मध्ये मोठी वाढ होऊ लागली होती. सीआरझेड नियमांचे सर्रास उल्लंघन करून मोठमोठी बांधकामे उभारण्यात आल्याने भविष्यात पर्यावरणाला पोहचनारा धोका पाहता काही खाजगी एनजीओ आणि पर्यावरण संस्थांनी हरित लवादा मध्ये याचिका दाखल केली होती. तीवर निर्णय देताना जो पर्यंत कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन तयार करून तो केंद्रा कडे मान्यतेसाठी पाठविला जात नाही तो पर्यंत राज्यातील सर्व बंधारे उभारणीच्या कामांना ६ जुलै पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. पर्यावरणप्रेमींच्या आक्षेपामुळे कोस्टल झोन प्लॅन केंद्राकडे पाठविण्यासाठी पर्यावरण विभागा कडून काम सुरू असल्याचे कळते.पर्यावरणप्रेमींनी घेतला होता आक्षेपमहाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या २३ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत बंधाºयाचे प्रस्ताव तपासण्यात आले होते. त्यावेळी पर्यावरण प्रेमींनी आपला आक्षेप नोंदविला होता.त्या आक्षेपामध्ये बंधारे उभारल्यास पर्यावरण पूरक तिवरांची झाडे, मासे प्रजनन क्षेत्र, वन्यजीव क्षेत्र, नैसिर्गक सौंदर्य स्थळे आदींना धोका निर्मिण होणार असल्याची बाजू त्यांनी मांडली होती.कोस्टल झोन प्लॅन केंद्राकडे सादर झाल्यावर पर्यावरण विभागा कडून अंतिम परवानगी मिळणे अपेक्षित आहे. त्यानंतर कामांना सुरुवात होऊन मच्छिमारांनी घरे सुरक्षित राहतील- एन यु चौरे , सहाय्यकअभियंता (पतन विभाग)

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या