शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मेनोरी खाडीवर पुलाच्या कामाची निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:40 IST

याआधी जेट्टीच्या आड पुलाचे बांधकाम होत असल्याचा ग्रामस्थांनी केला होता आरोप

ठळक मुद्देयाआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.गोराई येथील जेट्टीचे काम देखील बंद पाडण्यात आले होते.

मीरारोड - मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली असून त्याचा ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. याआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. पण महापालिकेने मुलाच्या कामासाठी निवीदा कढल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोनाचा पावित्रा घेतला आहे. मनोरी, गोराई, उत्तन भागात बडड्या उद्योजकांपासून राजकारणी आणि बिल्डरांनी जमिनी घेतल्या असून त्यांच्या फायद्यासाठी शासन, पालिका आणि राजकारणी पुल बांधण्याचा घाट सातत्याने घालत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.मुंबई हद्दीतील गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्यास स्थानिक जागरुक ग्रामस्थांसह विविध संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी सातत्याने गावकरी आंदोलन करत आले आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेने मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी निवीदा मागवल्या आहेत. या आधी मेरी टाईम बोर्डाने दोन्ही ठिकाणी रो रो सेवेच्या नावाखाली जेट्टी बांधण्याचे काम मंजुर केले. मनोरी येथील जेट्टीचे काम तर पुला सारखेच असल्याचा आरोप करत ते ग्रामस्थांनी बंद पाडले होते. गोराई येथील जेट्टीचे काम देखील बंद पाडण्यात आले होते.मुंबई , ठाण्यातील गावं बिल्डर, राजकारणी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली बक्कळ फायद्यासाठी नामशेष केली आहेत. तर बडे उद्योजक, राजकारणी, बिल्डर आदींनी गेल्या अनेक वर्षांपासून गोराई, मनोरी सह भार्इंदरच्या उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडी गावच्या धारावी बेटावरील गावं उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. येथील नैसिर्गक पर्यावरणा सह जीवसृष्टीचे सरंक्षण व्हावे , भूमिपुत्रांचे आणि गावांचे अस्तित्व कायम टिकून रहावे , गावची संस्कृती कायम रहावी अशी भुमिका या विरोधा मागे धारावी बेट बचाव सह अन्य संघटनांनी सातत्याने मांडली आहे.पुल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारी देखील वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे. अवास्तव बांधकामे फोफावणार आहेत. मुळात या ठिकाणी एस्सेल वर्ल्ड सारखे बडे उद्योजक तसेच राजकारणी, बिल्डर आदींनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी केल्या असुन त्या विकासासाठी मोकळ्या करण्या करता तसेच त्यांच्या फायद्या करता शासन, पालिका आणि राजकारणी सातत्याने पुल बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप समितीचे जॉजफ घोन्सालवीस, संदिप बुरकेन, ल्युड डिसोझा आदींनी केला आहे.शासन, राजकारणी केवळ गोराई आणि मनोरी खाडीवर पुल बांधण्याचा सातत्याने उपद्व्याप करत आले आहेत. पण या गावां मध्ये अद्यावत रु ग्णालय, महाविद्यालय , उद्याने - मैदाने, चांगली परिवहन सेवा आदी सुविधा देण्याची मात्र यांची दानत नाही. गाव परिसरातच स्थानिकांना रोजगार - उद्योगासाठी हे कोणतेही प्रयत्न करत नाहित. गेल्या अनेक वर्षांपासून सतत निवेदने - मागण्या करुन देखील त्या बद्दल हे अवाक्षर काढत नाहित. परंतु रो - रो सेवा , पूल , पर्यटन आराखडा, एसईझेड आदींची ग्रामस्थांनी मागणी नसताना देखील सुपाऱ्या घेऊन आमच्यावर लादत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय .

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMorchaमोर्चाmira roadमीरा रोड