शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

मेनोरी खाडीवर पुलाच्या कामाची निविदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:40 IST

याआधी जेट्टीच्या आड पुलाचे बांधकाम होत असल्याचा ग्रामस्थांनी केला होता आरोप

ठळक मुद्देयाआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता.गोराई येथील जेट्टीचे काम देखील बंद पाडण्यात आले होते.

मीरारोड - मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली असून त्याचा ग्रामस्थांच्या विविध संघटनांनी निषेध केला आहे. याआधी मेरी टाईम बोर्डाने जेट्टीच्या नावाखाली पुलाचे बांधकाम सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. पण महापालिकेने मुलाच्या कामासाठी निवीदा कढल्याने ग्रामस्थांनी पुन्हा आंदोनाचा पावित्रा घेतला आहे. मनोरी, गोराई, उत्तन भागात बडड्या उद्योजकांपासून राजकारणी आणि बिल्डरांनी जमिनी घेतल्या असून त्यांच्या फायद्यासाठी शासन, पालिका आणि राजकारणी पुल बांधण्याचा घाट सातत्याने घालत आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.मुंबई हद्दीतील गोराई व मनोरी खाडीवर पुल बांधण्यास स्थानिक जागरुक ग्रामस्थांसह विविध संघटनांचा तीव्र विरोध आहे. त्यासाठी सातत्याने गावकरी आंदोलन करत आले आहेत. त्यातच आता मुंबई महापालिकेने मनोरी खाडीवर पुल बांधण्यासाठी निवीदा मागवल्या आहेत. या आधी मेरी टाईम बोर्डाने दोन्ही ठिकाणी रो रो सेवेच्या नावाखाली जेट्टी बांधण्याचे काम मंजुर केले. मनोरी येथील जेट्टीचे काम तर पुला सारखेच असल्याचा आरोप करत ते ग्रामस्थांनी बंद पाडले होते. गोराई येथील जेट्टीचे काम देखील बंद पाडण्यात आले होते.मुंबई , ठाण्यातील गावं बिल्डर, राजकारणी यांनी शहरीकरणाच्या नावाखाली बक्कळ फायद्यासाठी नामशेष केली आहेत. तर बडे उद्योजक, राजकारणी, बिल्डर आदींनी गेल्या अनेक वर्षांपासून गोराई, मनोरी सह भार्इंदरच्या उत्तन, डोंगरी, चौक, पाली, तारोडी गावच्या धारावी बेटावरील गावं उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. येथील नैसिर्गक पर्यावरणा सह जीवसृष्टीचे सरंक्षण व्हावे , भूमिपुत्रांचे आणि गावांचे अस्तित्व कायम टिकून रहावे , गावची संस्कृती कायम रहावी अशी भुमिका या विरोधा मागे धारावी बेट बचाव सह अन्य संघटनांनी सातत्याने मांडली आहे.पुल झाल्यास येथील शहरीकरणासह गुन्हेगारी देखील वाढणार आहे. येथील शांतता व पर्यावरण नष्ट होणार आहे. अवास्तव बांधकामे फोफावणार आहेत. मुळात या ठिकाणी एस्सेल वर्ल्ड सारखे बडे उद्योजक तसेच राजकारणी, बिल्डर आदींनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी केल्या असुन त्या विकासासाठी मोकळ्या करण्या करता तसेच त्यांच्या फायद्या करता शासन, पालिका आणि राजकारणी सातत्याने पुल बनवण्याचा घाट घालत असल्याचा आरोप समितीचे जॉजफ घोन्सालवीस, संदिप बुरकेन, ल्युड डिसोझा आदींनी केला आहे.शासन, राजकारणी केवळ गोराई आणि मनोरी खाडीवर पुल बांधण्याचा सातत्याने उपद्व्याप करत आले आहेत. पण या गावां मध्ये अद्यावत रु ग्णालय, महाविद्यालय , उद्याने - मैदाने, चांगली परिवहन सेवा आदी सुविधा देण्याची मात्र यांची दानत नाही. गाव परिसरातच स्थानिकांना रोजगार - उद्योगासाठी हे कोणतेही प्रयत्न करत नाहित. गेल्या अनेक वर्षांपासून सतत निवेदने - मागण्या करुन देखील त्या बद्दल हे अवाक्षर काढत नाहित. परंतु रो - रो सेवा , पूल , पर्यटन आराखडा, एसईझेड आदींची ग्रामस्थांनी मागणी नसताना देखील सुपाऱ्या घेऊन आमच्यावर लादत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय .

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMorchaमोर्चाmira roadमीरा रोड