शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:24 IST

Tauktae Cyclone Vasai News : मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आशिष राणे 

वसई - वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर मागील आठवड्यात घोंघावलेलं तौत्के चक्रीवादळ व त्यामुळे झालेली अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसईकरांच्या शेती, बागायती व घराचं अतोनात नुकसान झाले होते. चक्रीवादळ शमताच तिसऱ्या दिवशीपासूनच वसई तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने येथील नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यास तात्काळ सुरुवात केली. दरम्यान युद्धपातळीवर रात्रंदिवस महसूल व कृषी विभागाने तहसीलदार वसई यांच्या नेतृत्वाखाली आजवर त्यामुळे नुकसानीचे आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर यात कृषी म्हणजे शेतीचे जवळपास 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला दिली आहे

मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या संदर्भातील माहिती वसई तहसीलदार भगत यांनी देताना स्पष्ट केले की,या सर्वच नुकसान ग्रस्त व पीडितांच्या पंचनाम्यांना आम्ही महसूल विभागाने प्राधान्य दिले असून आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत तर शेतीचे आता पर्यंत 70 टक्के पंचनामे झाले आहेत. एकुणच या संपूर्ण कामासाठी साधारण 32 तलाठी, 6 सर्कल,2 नायब तहसीलदार,31 ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. वादळात झालेल्या नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे काम लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल विभाग उत्तम रित्या काम करत आहे. 

6 सर्कलमध्ये उत्तम काम व पंचनामे 

आतापर्यंत 6 सर्कलमध्ये झालेल्या पंचनाम्यामध्ये 17 कच्ची घरे पडली आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना एकूण 16 लाख 16 हजार 700 रुपये अनुदान मिळावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये  मांडवी येथील कच्या 7, माणिकपूर येथील  3,आगाशी येथील 3 आणि निर्मळ येथील 4 घरांचा समावेश आहे. या सगळ्यात वादळ आल्या दिवसापासून महसुलचे कर्मचारी व  ग्रामसेवक सातत्याने काम करत आहेत. वादळाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यापासून ते स्थलांतर केलेल्या नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्यापर्यंत आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यापर्यंत कर्मचारी हे मागील 8 दिवसांपासून सतत काम करत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले 

महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी युद्ध पातळीवर पंचनामा करीत आहेत. तालुक्यातील नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला त्याची शासन नियमानुसार भरपाई कशी मिळेल या दृष्टीने युद्धपातळीवर आम्ही काम करत आहोत. दोन ते चार दिवसात सर्व प्रकारचे पंचनामे ही पूर्ण होतील 

- उज्वला भगत, वसई तहसीलदार 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र