शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:24 IST

Tauktae Cyclone Vasai News : मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आशिष राणे 

वसई - वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर मागील आठवड्यात घोंघावलेलं तौत्के चक्रीवादळ व त्यामुळे झालेली अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसईकरांच्या शेती, बागायती व घराचं अतोनात नुकसान झाले होते. चक्रीवादळ शमताच तिसऱ्या दिवशीपासूनच वसई तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने येथील नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यास तात्काळ सुरुवात केली. दरम्यान युद्धपातळीवर रात्रंदिवस महसूल व कृषी विभागाने तहसीलदार वसई यांच्या नेतृत्वाखाली आजवर त्यामुळे नुकसानीचे आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर यात कृषी म्हणजे शेतीचे जवळपास 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला दिली आहे

मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या संदर्भातील माहिती वसई तहसीलदार भगत यांनी देताना स्पष्ट केले की,या सर्वच नुकसान ग्रस्त व पीडितांच्या पंचनाम्यांना आम्ही महसूल विभागाने प्राधान्य दिले असून आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत तर शेतीचे आता पर्यंत 70 टक्के पंचनामे झाले आहेत. एकुणच या संपूर्ण कामासाठी साधारण 32 तलाठी, 6 सर्कल,2 नायब तहसीलदार,31 ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. वादळात झालेल्या नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे काम लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल विभाग उत्तम रित्या काम करत आहे. 

6 सर्कलमध्ये उत्तम काम व पंचनामे 

आतापर्यंत 6 सर्कलमध्ये झालेल्या पंचनाम्यामध्ये 17 कच्ची घरे पडली आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना एकूण 16 लाख 16 हजार 700 रुपये अनुदान मिळावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये  मांडवी येथील कच्या 7, माणिकपूर येथील  3,आगाशी येथील 3 आणि निर्मळ येथील 4 घरांचा समावेश आहे. या सगळ्यात वादळ आल्या दिवसापासून महसुलचे कर्मचारी व  ग्रामसेवक सातत्याने काम करत आहेत. वादळाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यापासून ते स्थलांतर केलेल्या नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्यापर्यंत आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यापर्यंत कर्मचारी हे मागील 8 दिवसांपासून सतत काम करत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले 

महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी युद्ध पातळीवर पंचनामा करीत आहेत. तालुक्यातील नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला त्याची शासन नियमानुसार भरपाई कशी मिळेल या दृष्टीने युद्धपातळीवर आम्ही काम करत आहोत. दोन ते चार दिवसात सर्व प्रकारचे पंचनामे ही पूर्ण होतील 

- उज्वला भगत, वसई तहसीलदार 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र