शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

वसई तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुसाट, युद्धपातळीवर महसूल व कृषी विभाग करतंय रात्रंदिवस काम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 20:24 IST

Tauktae Cyclone Vasai News : मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आशिष राणे 

वसई - वसई तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवर मागील आठवड्यात घोंघावलेलं तौत्के चक्रीवादळ व त्यामुळे झालेली अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसईकरांच्या शेती, बागायती व घराचं अतोनात नुकसान झाले होते. चक्रीवादळ शमताच तिसऱ्या दिवशीपासूनच वसई तालुक्यातील महसूल व कृषी विभागाने येथील नुकसान भरपाईचे पंचनामे करण्यास तात्काळ सुरुवात केली. दरम्यान युद्धपातळीवर रात्रंदिवस महसूल व कृषी विभागाने तहसीलदार वसई यांच्या नेतृत्वाखाली आजवर त्यामुळे नुकसानीचे आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर यात कृषी म्हणजे शेतीचे जवळपास 70 टक्के पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती वसई तहसीलदार उज्वला भगत यांनी लोकमतला दिली आहे

मागील आठवड्यात आलेलं तौक्ते चक्रीवादळ व अतिवृष्टी व जोरदार वाऱ्यामुळे वसई तालुक्यात खास करून ग्रामीण व थोड्या प्रमाणात शहरी भागात कच्च्या आणि पक्क्या घराचे, छपराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या संदर्भातील माहिती वसई तहसीलदार भगत यांनी देताना स्पष्ट केले की,या सर्वच नुकसान ग्रस्त व पीडितांच्या पंचनाम्यांना आम्ही महसूल विभागाने प्राधान्य दिले असून आतापर्यंत 3 हजार 528 पंचनामे पूर्ण झाले आहेत तर शेतीचे आता पर्यंत 70 टक्के पंचनामे झाले आहेत. एकुणच या संपूर्ण कामासाठी साधारण 32 तलाठी, 6 सर्कल,2 नायब तहसीलदार,31 ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी रात्रंदिवस काम करत आहेत. वादळात झालेल्या नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचे काम लवकर पूर्ण करून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत मिळावी यासाठी महसूल विभाग उत्तम रित्या काम करत आहे. 

6 सर्कलमध्ये उत्तम काम व पंचनामे 

आतापर्यंत 6 सर्कलमध्ये झालेल्या पंचनाम्यामध्ये 17 कच्ची घरे पडली आहेत. ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना एकूण 16 लाख 16 हजार 700 रुपये अनुदान मिळावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये  मांडवी येथील कच्या 7, माणिकपूर येथील  3,आगाशी येथील 3 आणि निर्मळ येथील 4 घरांचा समावेश आहे. या सगळ्यात वादळ आल्या दिवसापासून महसुलचे कर्मचारी व  ग्रामसेवक सातत्याने काम करत आहेत. वादळाच्या वेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यापासून ते स्थलांतर केलेल्या नागरिकांच्या राहण्याची, जेवणाची सोय करण्यापर्यंत आणि त्यानंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यापर्यंत कर्मचारी हे मागील 8 दिवसांपासून सतत काम करत असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले 

महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी युद्ध पातळीवर पंचनामा करीत आहेत. तालुक्यातील नुकसान झालेल्या प्रत्येक नागरिकाला त्याची शासन नियमानुसार भरपाई कशी मिळेल या दृष्टीने युद्धपातळीवर आम्ही काम करत आहोत. दोन ते चार दिवसात सर्व प्रकारचे पंचनामे ही पूर्ण होतील 

- उज्वला भगत, वसई तहसीलदार 

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळVasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्र