शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

तारूनिया सकळां, आम्हां कृपादृष्टी पाहे; विसर्जनाला पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 23:26 IST

भावपूर्ण वातावरणात निरोप

पालघर : आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला गुरुवारी, अनंत चतुर्दशीला भक्तांनी भावपूर्ण वातावरणात निरोप दिला. ढोल ताशाच्या गजरात निघालेल्या या विसर्जन मिरवणुकांना पावसाने देखील जोरदार हजेरी लावली. पावसाचा जोर कायम असतानाही जिल्ह्यातील ५९७ सार्वजनिक आणि ४ हजार ३७२ खाजगी गणपतींचे विसर्जन कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत पार पडले.

आठवडाभरापासून पावसाने जिल्ह्यात अक्षरश: थैमान घातलेले आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी पावसाने थोडी उघडीप दिल्यानंतर घरगुती गणपतींच्या विसर्जनाला सुरुवात झाली. तर सार्वजनिक मंडळाचे गणपती संध्याकाळी ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास विसर्जनासाठी बाहेर पडले. पालघरमधील तिवारी कुटुंबियांचा ‘फुलांचा राजा’ आणि जुन्या पालघरमधील ‘पालघरचा राजा’ या दोन प्रसिद्ध गणपतींना निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त उपस्थित होते. ‘फुलांचा राजा’ हा गणपती नेहमीच भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला असून यावर्षी गणपती बाप्पाच्या दोन्ही बाजूस विविध फुलांचा वापर करून गजराजांच्या प्रतिमा उभारण्यात आल्या होत्या. रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी, लेझीम पथकांची मानवंदना देण्यात येत असताना रस्त्या-रस्त्यावर राजकीय पक्षांकडून सर्व गणेश मंडळांचे फूल, श्रीफळ तसेच मानचिन्ह देऊन स्वागत केले जात होते. संध्याकाळी ७ च्या सुमारास गणेश मंडळांची मोठी गर्दी झाली असताना विसर्जन पाहण्यासाठी आलेले लोक आणि कामावरून परतणारे चाकरमानी अशी अलोट गर्दी होती. अशावेळी पालघर पोलीस आणि अनिरुद्ध बापू स्वयंसेवी अनुयायांनी या गर्दीवर नियंत्रण आणून वाहतूकही सुरळीत केली.

पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने विशेष दक्षता घेतली होती. या उत्सवाला कुठलेही गालबोट न लागता हे सण शांततेत साजरे व्हावेत या दृष्टीने कडक पावले उचलली होती. तसेच उत्सवादरम्यान एकूण १ हजार ८८१ जणांवर कारवाई करण्यात आली.विसर्जनाच्या निर्माल्यातून २० टन सेंद्रिय खतमुंबई : दरवर्षी अनंत चतुर्दशीनंतर मुंबईतील चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (अलिबाग)चे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण रक्षणासाठी निर्माल्यातून सेंद्रीय खताची निर्मिती करण्याच्या स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.यंदा गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून फुल, फळे आणि आरास इत्यादी निर्माल्य गोळा करून त्याचे रूपांतर सेंद्रिय खतात केले जाणार आहे. तिन्ही ठिकाणच्या निर्माल्यातून सुमारे २० ते २५ टन सेंद्रीय खत निर्माण केले जाणार आहे. गेल्यावर्षी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.मोखाड्यात गणपती बाप्पाला निरोपमोखाडा : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’, ‘एक लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’, या घोषणा, त्याचप्रमाणे ढोलताशे, पांरपरिक सनई - संबळाच्या तालावर तसेच बेंजोची साथ, डीजेची साथ आणि गुलालाची उधळण करत तालुकावासियांनी दहा दिवस विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप दिला. मोखाड्यात दहा दिवस विराजमान होणाऱ्या गणरायांची संख्या कमी असल्याने शांततेत तसेच गावपाड्यांतील भक्तांनी स्थानिक नदी पात्रात तर मोखाडा, घोसाळी येथे तलावात विसर्जन करण्यात आले. विसर्जनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस खात्याने चोख व्यवस्था ठेवली होती.

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019