शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्र डागले, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा; ग्रामस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 00:30 IST

पाण्यासाठी करावी लागत होती वणवण

भातसानगर : शहापूर तालुक्यातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरु वात केली असून नागरिकांनी ‘लोकमत’चे कौतुक केले आहे.

तालुक्यात मागीलवर्षी कमी पाऊस झाल्याने व पाऊसही लवकरच गेल्याने मोठ्या प्रमाणात गावपाडयात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. या वर्षी मात्र खूपच पाऊस पडला. यामुळे यावर्षी उशिरा पाणीटंचाई निर्माण होईल असे वाटत असतानाच अजनूप, दापूर परिसरातील कोळीपाडा व वरचा गायदरा या दोन पाड्यात टंचाई निर्माण झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच ग्रामपंचायती मार्फत पाठविण्यात आलेला प्रस्ताव प्रांत कार्यालयाकडून थेट जिल्ह्याधिकारी यांनी मागवून तात्काळ टँकर मंजूर करून पाणीपुरवठा सुरू केला आहे.

कोळीपाडा व वारलीपाडा येथील ग्रामस्थ एकाच विहिरीवर पाणी भरतात. या विहिरीत पाणी नसल्याने त्यांना पाण्यासाठी दिवसरात्र वणवण भटकावे लागत होते. कोळीपाड्याची लोकसंख्या आज अडीचशेच्या आसपास असून वारली पाड्याची लोकांख्याही शंभरच्या जवळपास आहे. या पाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे केली होती. मात्र त्यास गती देण्याचे काम ‘लोकमत’ने केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरवर्षी येथे टंचाई होते. टँकरने पाणीपुरवठाही केला जातो. मात्र इतक्या वेगाने कार्यवाही ही केवळ ‘लोकमत’च्या वृत्तामुळे अशी प्रतिक्रि या ग्रा.पं. सदस्य प्रदीप चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMaharashtraमहाराष्ट्रWaterपाणी