शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
3
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
4
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
5
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
6
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
7
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
8
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
9
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
10
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
11
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
12
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
13
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
14
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
15
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
16
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
17
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
18
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
19
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
20
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...

वसई पूर्व पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारी सूर्याची मुख्य जलवाहीनी गोखीवरे चिंचपाडा येथे पुन्हा दुसऱ्यांदा फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2021 18:38 IST

सोमवारी होणार दुरुस्तीचे काम; २४ तास बंद राहणार पाणीपुरवठा

-आशिष राणे

वसई: वसई विरार शहर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची मुख्य जलवाहिनी रविवार दि १७ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास वसई पुर्वेस गोखीवरे चिंचपाडा येथे फुटून नादुरुस्त झाल्यानं येथील शहरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दि १७ ऑक्टोबर रोजी सकाळी येथील वसई पूर्व पश्चिम विभागात मोडणाऱ्या नवघर माणिकपूर शहर,वसई गाव आणि नवघर पूर्व, डी प्रभागातील एव्हरशाईन,वसंत नगरी भागास पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाची ( ७८८ )मि मी व्यासाची (एम एस)  पाईपलाईन रविवारी सकाळी अचानकपणे पुन्हा दुसऱ्यांदा वसई पूर्वेतील गोखीवरे चिंचपाडा येथे क्लासिक कंपनी समोर फुटल्याने शहरांतील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्याने  लोकमत ला दिली.

आता तातडीने तिच्या दुरुस्तीचे काम रवि वारी हातीं न घेता हे काम सोमवार दि १८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात येणार आहे असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केलं तसेच तिच्या दुरुस्ती साठी दिवसभर म्हणजेच २४ तास लागणार असल्याने शहरातील तिन्ही प्रभागातील  भागात पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद राहील सोबत जरी पाणी पुरवठा सुरू झाल्यावर देखील तो पुढील एक ते दोन दिवस अनियमित आणि कमी दाबाने होईल,त्यामुळे शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि वसई विरार  महापालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन नवघर माणिकपूर शहराच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. एकंदरीतच एन उन्हाच्या तडाख्यात  दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा विस्कळीत राहणार असल्याने नागरिकांनी नुसती चिंताच व्यक्त न करता नाराजीही ही व्यक्त केली.

टॅग्स :WaterपाणीVasai Virarवसई विरार