शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दुकाने बंद ठेवून शेतकऱ्यांना पाठिंबा, नालासोपाऱ्यात जबरदस्ती दुकाने बंद करणाऱ्यांना पाेलिसांची समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 00:42 IST

Nalasopara News :

नालासोपारा : शेतकऱ्यांच्या विरोधातील कृषी विधेयक रद्द करण्याच्या मागणीवरून शेतकऱ्यांनी मंगळवारी ‘भारत बंद’चे आवाहन केले होते. त्याला समर्थन देत नालासोपारा शहरातील दुकानदारांनी स्वतः सकाळपासून दुकाने बंद ठेवून समर्थन दिले. रस्त्यावरही तुरळक वाहतूक सुरू होती. बंदच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये, यासाठी तुळिंज आणि नालासोपारा पोलिसांनी नाक्या-नाक्यावर पोलीस बंदोबस्त ठेवला होता.नालासोपारा पूर्वेकडील परिसरात एरवी दिसणारी गर्दी या बंदमुळे तुरळक प्रमाणात होती. पूर्व आणि पश्चिमेतील ९५ टक्के दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे बंद ठेवली होती. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्याही तुरळक होती.संतोष भवन परिसरात काँग्रेसचे उतावळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हातात पक्षाचे झेंडे घेऊन दुकाने बंद करण्यासाठी जबरदस्ती करत होते, पण दुकानदारांनी त्यांना विरोध केला. तुम्ही सांगू नका, आम्ही दुकाने बंद करणार आहाेत, असे त्यांनी सांगितले. तुळिंज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे.बी. सूर्यवंशी पोलीस कर्मचाऱ्यांसह तेथे पोहाेचले. जबरदस्ती करू नका, अन्यथा दुकानदारांनी तक्रार दिल्यास गुन्हे दाखल करू, असा दम दिल्यावर हे कार्यकर्ते निघून गेले, तसेच आचोळे गावाच्या बाजूला असलेल्या परिसरात काँग्रेसचे कार्यकर्ते दुकान बंद करण्यासाठी दम देत असल्याचे तुळिंज पोलिसांना कळल्यावर त्यांनी फोनवरून समज दिल्याचे कळते. नालासोपारा पोलिसांनी एसटी डेपो, सिविक सेंटर, हेगडेवार चौक, हनुमाननगर, श्रीप्रस्था या परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

आंदोलनाला शीख बांधवांचा पाठिंबावसई : शेतकरी आंदोलनाला वसईतील शीख बांधवांनीही पाठिंबा दिला आहे. वसईच्या अंबाडी रोडवरील गुरुद्वाराजवळ मंगळवारी संध्याकाळी त्यांनी एकत्र येऊन जोरदार निदर्शने करण्यात आली. दुपारी ४ नंतर हे आंदोलन झाले. या वेळी या गुरुद्वारासमोर ७० ते ८० शीख बंधू व भगिनींनी एकत्र येऊन ‘जय जवान, जय किसान’ आणि ‘किसान एकता जिंदाबाद’ अशा घोषणा देत निदर्शने केली.

बोईसरमध्ये भारत बंदला चांगला प्रतिसाद   बोईसर : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात मंगळवारी अनेक पक्ष व संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला बोईसरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. अत्यावश्यक सेवा व आर्थिक संस्था वगळता हॉटेल व बाजारपेठा बंद होत्या, तर रिक्षाची तुरळक वाहतूक सुरू होती. सकाळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम, बविआ, बसपा, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी बोईसर ते चित्रालय बाजारपेठेपर्यंत येऊन घोषणाबाजी केली. बोईसर पोलीस ठाण्याचे ४६ कर्मचारी, ४ अधिकारी, १० पालघर मुख्यालयातील कर्मचारी आणि स्ट्रायकिंग फोर्स तैनात होते. दुपारी ३ नंतर बंद मागे घेण्यात आला, तर तारापूर एमआयडीसीमध्ये बंदचा प्रभाव फारसा दिसला नाही. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार