शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2019 : शिवसेनेने पालघरचा गड राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 06:08 IST

काँग्रेसचे नम पराभूत; पश्चिम पट्ट्याने तारले

- हितेन नाईकपालघर : पालघर विधानसभा मतदारसंघातील एकूण २४ फेऱ्यांपैकी पाचव्या फेरी नंतरच शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या योगेश नम यांच्यावर घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवत ४० हजार १४८ मताधिक्याने विजय मिळविला. बहिष्काराच्या मुद्द्याने गाजलेल्या या मतदारसंघात नेहमीप्रमाणे पश्चिम पट्ट्याने वनगा यांना साथ दिल्याने हा सेनेचा बालेकिलल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

पालघर विधानसभेत एकूण पाच उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत सेना महायुतीचे उमेदवार श्रीनिवास वणगा आणि काँग्रेसचे योगेश नम यांच्यात झाली. गुरुवारी सकाळी पालघरच्या स. तु. कदम या महाविद्यालयात सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरूवात झाली. पहिल्या फेरीपासून १ हजार २३२ मतांनी काँग्रेसचे योगेश नम आघाडीवर होते. ही आघाडी त्यांनी चौथ्या फेरीपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मिळवले असले तरी पाचव्या फेरीमध्ये श्रीनिवास वनगा यांनी ४९२ मतांनी आघाडी घेतली.

सेनेने आघाडी घेतल्याची माहिती समाजमाध्यमांवर झळकायला सुरुवात झाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी हळूहळू मतदान केंद्राबाहेर जमायला सुरूवात केली. ८ व्या फेरीमध्ये सेनेने २ हजार ६३३ मतांची आघाडी घेतल्यानंतर सेनेच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी करायला सुरूवात झाली. सतत वाढत जाणारे मताधिक्य आणि ६ हजार १२८ मतांच्या आघाडीनंतर ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशाी जोरदार घोषणाबाजी होऊ लागली.

यामध्ये महिला कार्यकर्त्या, पदाधिकाऱ्यांचा सहभाग मोठा होता. पश्चिम भागातील मतदान पेट्यांमधील मतांची रसद सेनेला मिळू लागल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या विजयाच्या दिशेने सुसाट निघालेल्या वारूला रोखण्याची किमया कुठलाहीउमेदवार करू शकला नाही. अखेर २४ फेºयांनंतर श्रीनिवास वनगा यांनी काँग्रेसच्या शंकर नम यांचा ४० हजार १४८ मतांनी पराभव केल्याचे निवडणूक निर्णय अधिकाºयांनी जाहीर केले, आणि शिवसेनेचा एकच जल्लोष सुरू झाला.

दरम्यान, वाढवण बंदर आणि डहाणू पर्यावरण प्राधिकरण हटवणे आणि केळवे पूर्व, झंजरोली, मायखोप आदी भागातील उड्डाणपूल, रस्ते, सोयीसुविधांची वानवा या विरोधात २३ गावपाड्यांनी टाकलेल्या बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर सुमारे ५० हजार मतदारांनी मतदान टाळले. यातील मतदारांचा मोठा टक्का हा सेनेचा असल्याने प्रचंड मताधिक्य प्राप्त करण्याची संधी गमावली.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019palghar-acपालघरShiv Senaशिवसेना