शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख सेवा द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2019 11:42 PM

संडे अँकर । दक्षता जनजागृती सप्ताह ; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, जिल्हा परिषदेत झाला कार्यक्रम

ठाणे : जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख कामांचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ करून सर्व प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहण्याचे मार्गदर्शनपर धडे अ‍ॅण्टीकरप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाºयांना शुक्रवारी दिले.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून, कामामध्ये पारदर्शकता ठेवून, अधिकारी-कर्मचाºयांनी नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलद गतीने व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व त्याचे महत्त्व डॉ. पाटील यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनात आणून दिले. ‘इमानदारी एक जीवनशैली’ ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) यंदा ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ हाती घेण्यात आला आहे. यास अनुसरून नियोजन भवन येथे अधिकारी व कर्मचाºयांसाठी शुक्रवारी उशिरापर्यंत कार्यशाळा घेऊन सखोल मार्गदर्शन पाटील यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे म्हणाले की, शासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाचे काम कोणत्याही अडवणुकीविना, तत्परतेने आणि पारदर्शीपणे कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. आपण शासकीय सेवक आहोत, याचे भान ठेवून आपली सेवा बजावायला हवी’ असे हातोटे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, संगीता भागवत, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता इंदुरकर आदी उपस्थित होते.जनजागृतीसाठी कार्यक्रमयावेळी शिवाजी पाटील आणि अशोक पाटील यांनी समयोचित भाषण केले. तर, ‘भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात तयार केलेल्या विविध लघुचित्रफिती, प्रसिद्ध मान्यवरांचे दृकश्राव्य माध्यमातील प्रतिक्रि या पोलीस उपअधीक्षक मदन बल्लाळ यांनी उपस्थितांना ऐकवल्या. या ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’निमित्ताने लाचलुचपत विभागाद्वारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत.शासकीय कार्यालयांत बॅनर, पोस्टरद्वारे जागरराज्यभरात २८ आॅक्टोबरपासून दक्षता सप्ताह सुरू झाला आहे. या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लाच घेऊ नये, याबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडून मार्गदर्शन तसेच शपथ दिली जाणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांसारखे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच बॅनर, पोस्टरद्वारे जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसईthaneठाणे