शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

वसई तालुक्याचा ग्रामीण भाग आता कोरोनामुक्तीच्या मार्गावर; आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 12:29 AM

अवघ्या १० जणांवर उपचार सुरू

पारोळ : वसई तालुक्यातील नागरिक दिवाळी उत्सवात खरेदीसाठी घराबाहेर पडल्याने दिवाळीनंतर कोरोना महामारीची मोठी लाट येईल, अशी भीती व्यक्त होत होती. पण दिवाळीनंतर वसई ग्रामीण भागात कोरोना नियंत्रणात असल्याचे दिसत असून आता कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होत असल्याने मृत्युदरही शून्यावर आला आहे. यामुळे वसईचा ग्रामीण भाग कोरोनामुक्तीच्या मार्गावर आहे.

वसई ग्रामीण भागात सध्या फक्त १० बाधितांवर उपचार सुरू असून लवकरच तेसुद्धा बरे होतील, अशी आशा व्यक्त होत आहे. मागील १८ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नसल्याची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली आहे. ही माहिती वसई ग्रामीण भागासाठी दिलासा देणारी ठरली आहे. तसेच मागील १४ दिवसांत ग्रामीण भागात केवळ ४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने खाली आल्याने ग्रामीण भागातील जनतेने आता सुस्कारा सोडला आहे. लवकरच ग्रामीण भागात कोरोनाला हरवण्यात यश मिळेल आणि कायमस्वरूपी कोरोना या भागातून गाशा गुंडाळेल, अशी आशा नागरिकांना वाटते.

वसई शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यानंतर जून महिन्यात कोरोनाने वसई ग्रामीण भागात शिरकाव केला. त्यानंतर सप्टेंबर महिन्यापर्यंत ग्रामीण भागातदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने नागरिकांना धास्ती वाटत होती. कोरोनाचा आकडा हजारीपार गेल्यानंतर ग्रामीण भागातदेखील कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला होता. मात्र जसजसे लॉकडाऊन शिथिल झाले, तसतसे येथील व्यवहार रुळावर येत गेले. व्यवहार रुळावर आल्यानंतर ग्रामीण भागात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यात कोरोनाचा प्रभाव ग्रामीण भागातून कमी होत गेला. आता वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या हद्दीत कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असताना ग्रामीण भाग मात्र कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करतो आहे.

लवकरच हद्दपार दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणा सज्ज झाली होती. ग्रामीण भागातून लवकरच कोरोना हद्दपार होईल, असा विश्वास बाळगला जात आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस