शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली! प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव : बाजारांत सामाजिक अंतराचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:04 IST

कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात.

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात दररोज मृत्यू पावणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली व खुद्द वसई-विरार महापालिकेकडूनही नियोजनाचा अभाव असल्याने कोविड-१९ च्या संक्रमणाचे सावट कायम आहे.कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात. बहुतांश ठिकाणी तर भाजी विक्री व्यावसायिक प्रचंड प्रमाणात वाढलेले निदर्शनास येत आहेत. परिणामी भाजी बाजारात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. विशेष म्हणजे पालिकेने या भाजी विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे म्हणून मार्किंग करून त्याच जागेत बसण्याकरिता बजावलेले असतानाही या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, तर ग्राहकांचीही फेरीवाल्यांच्या गाड्यांसभोवती खरेदीसाठी गर्दी उसळत असतानाही यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. विशेष म्हणजे याविरोधात पालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केल्यास दखल घेतली जात नाही, तर काही वेळा या फेरीवाल्यांकडून चिरीमिरी घेऊन पालिका कर्मचारीच या फेरीवाल्यांना मुख्य मार्गावरून उठवून गल्लीबोळात व्यवसाय करण्याची मुभा देत आहेत. याचे परिणाम म्हणून अनेक ठिकाणी मर्यादित वेळेनंतरही काही दुकाने पुढून बंद असली तरी मागून सुरू असताना दिसतात. अशा कित्येक दुकानदारांची पाहणी करून मग पोलीसही वसुली करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोविड-१९ संक्रमणाला रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे..नागरिकांची भटकंती सध्या प्रामाणिकपणे घरी बसून सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांची नाहक कोंडी झाली आहे. आपण किती दिवस घरी बसून राहायचे? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सोबतच कारणाशिवाय फिरणाऱ्या व्यक्तींची धरपकड करून पोलीस त्यांची अँटिजन टेस्ट करत असले तरी कडक नियमावली नसल्याने बेफिकीर नागरिकांच्या भटकंतीत कमी आलेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या