शहरं
Join us  
Trending Stories
1
बळीराजाची खरी दिवाळी...! जीएसटी कपातीचा शेतकऱ्यांना काय-काय फायदा होणार? एकदा पहाच... 
2
वाट माझी बघतोय रिक्षावाला संघटना खूश होणार; कार, दुचाकींवर लागणार एवढा जीएसटी...
3
GST: मोठी घोषणा! २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू होणार; काय स्वस्त काय महागले...
4
GST Rate Cuts News: आरोग्य विमा, जीवन विम्यासह ३३ औषधांवर शून्य GST; विद्यार्थ्यांना काय...? 
5
दिल्ली पोलीस पुण्यात आले, बेड्या ठोकून घेऊन गेले; बलात्कार प्रकरणी अभिनेता आशिष कपूरला अटक
6
कामगारांनो, आता ९ तासांऐवजी १२ तास काम, मात्र...; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
7
दादर टर्मिनसबाहेरील पार्किंगमध्ये दुचाकी पेटल्या; १०-१२ दुचाकी खाक
8
भिवंडीत उड्डाणपुलावर दोन भरधाव कारचा अपघात, दुचाकीस्वाराचा थेट रस्त्यावर पडून दुर्दैवी मृत्यू
9
यमुनेचा रौद्रावतार! पुरग्रस्तांच्या छावण्यांतही पाणी घुसले; २०१३ ची पातळी ओलांडली
10
मराठा आंदोलन संपताच राज ठाकरे वर्षा बंगल्यावर; घेतले गणपतीचे दर्शन, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत
11
जिओ कंपनी उदार झाली...! ९ वर्ष झाल्याचे सेलिब्रेशन करणार; एक महिन्याचा रिचार्ज फ्री देणार...
12
जीएसटी परिषदेबाबत पहिली बातमी! २५०० रुपयांच्या आतील चप्पल, बुटांवर ५ टक्के कर : रिपोर्ट
13
...तोपर्यंत उपोषण, शासन निर्णय फाडणे, होळी करणे थांबवा; छगन भुजबळांचं OBC कार्यकर्त्यांना आवाहन
14
प्रमोशन दिलं नाही, महिला कर्मचारी बॉसवर संतापली! 'असा' बदला घेतला की सगळेच अवाक् झाले
15
सावधान! ChatGPT सोबत गप्पा मारताय? तुमची प्रत्येक गोष्ट ऐकू शकतात पोलीस
16
येत्या काही महिन्यात देशात राजकीय बदल होणार; ‘हायड्रोजन बॉम्ब’चा अर्थ काय? २ नेत्यांचे मोठे दावे
17
उत्तर प्रदेशात एक खाजगी बस पाण्यात उलटली, एका मुलासह दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
निर्बंधांचा परिणाम...! सौदी अरेबियाने या भारतीय कंपनीला कच्च्या तेलाचा पुरवठा रोखला
19
पाण्याच्या खदाणीत मिळाला महिलेसह मुलीचा मृतदेह; कासारवडवलीतील घटना
20
जुलैपासून टेस्लाने किती बुकिंग मिळविली? एलन मस्कनाही अपेक्षित नव्हते...

वसई-विरारमध्ये नियमांची पायमल्ली! प्रशासनाकडून नियोजनाचा अभाव : बाजारांत सामाजिक अंतराचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 10:04 IST

कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात.

विरार : वसई-विरार महापालिका क्षेत्रात दररोज मृत्यू पावणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, त्यानंतरही नागरिकांकडून नियमांची पायमल्ली व खुद्द वसई-विरार महापालिकेकडूनही नियोजनाचा अभाव असल्याने कोविड-१९ च्या संक्रमणाचे सावट कायम आहे.कोविड-१९चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य सरकारने १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास सकाळी ७ ते ११ या वेळात मुभा आहे. मात्र, वसई-विरार महापालिका क्षेत्रात बहुतांश ठिकाणी या नियमाचा गैरफायदा घेत कित्येक दुकाने सुरू असतात. बहुतांश ठिकाणी तर भाजी विक्री व्यावसायिक प्रचंड प्रमाणात वाढलेले निदर्शनास येत आहेत. परिणामी भाजी बाजारात सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते. विशेष म्हणजे पालिकेने या भाजी विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळले जावे म्हणून मार्किंग करून त्याच जागेत बसण्याकरिता बजावलेले असतानाही या नियमांचे उल्लंघन केले जात आहे, तर ग्राहकांचीही फेरीवाल्यांच्या गाड्यांसभोवती खरेदीसाठी गर्दी उसळत असतानाही यावर कोणाचेही नियंत्रण दिसत नाही. विशेष म्हणजे याविरोधात पालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार केल्यास दखल घेतली जात नाही, तर काही वेळा या फेरीवाल्यांकडून चिरीमिरी घेऊन पालिका कर्मचारीच या फेरीवाल्यांना मुख्य मार्गावरून उठवून गल्लीबोळात व्यवसाय करण्याची मुभा देत आहेत. याचे परिणाम म्हणून अनेक ठिकाणी मर्यादित वेळेनंतरही काही दुकाने पुढून बंद असली तरी मागून सुरू असताना दिसतात. अशा कित्येक दुकानदारांची पाहणी करून मग पोलीसही वसुली करत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे कोविड-१९ संक्रमणाला रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात आहे..नागरिकांची भटकंती सध्या प्रामाणिकपणे घरी बसून सरकारच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्यांची नाहक कोंडी झाली आहे. आपण किती दिवस घरी बसून राहायचे? असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर आहे. सोबतच कारणाशिवाय फिरणाऱ्या व्यक्तींची धरपकड करून पोलीस त्यांची अँटिजन टेस्ट करत असले तरी कडक नियमावली नसल्याने बेफिकीर नागरिकांच्या भटकंतीत कमी आलेली नाही. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या