शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पालघर जिल्ह्याचा ४६१ कोटींचा आराखडा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 23:22 IST

गतवर्षी निधी दिला ६१ टक्के : डिसेंबर अखेर झाला फक्त ४१ टक्के खर्च

पालघर : पालघर जिल्ह्याच्या या वर्षाच्या ४६१ कोटी ४१ लाख रूपयांच्या प्रारूप आराखड्यास खासदार कपिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मात्र त्याचवेळी गतवर्षीच्या ६२२ कोटी ४४ लाख ५१ हजारांच्या तरतूदींपैकी ६२ टक्के निधी संबंधित यंत्रणा देण्यात आला असला तरी त्यापैकी केवळ १८२ कोटी ८६ लाख ८६ हजार म्हणजे ४१.१३ टक्के इतकाच खर्च डिसेंबर अखेर करण्यात आला आहे.

पालघर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश गंधे, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे, आमदार आनंद ठाकूर, हितेंद्र ठाकूर, विलास तरे, शांताराम मोरे, अमित घोडा, निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, वसई विरार मनपा आयुक्त सतिश लोखंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार डॉ.अजित कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा नियोजन अधिकारी गोपाल भारती यांसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सर्व अधिकारी उपस्थित होते.

विद्युत वितरण पालघर विभागातून ग्राहकांना देण्यात येणारी बिले वेळेवर न मिळणे, चुकीचे रिडिंग देऊन भरमसाठ बिले देणे, बिले वेळेवर वाटप न करणे तसेच बिल वाटप व इतर कामे महिला बचत गटांना द्यावे असा शासन निर्णय असतांना त्याची अंमलबजावणी न होता ही कामे खाजगी ठेकेदारांना दिले जात असल्याने ठाकरे ह्यांनी नाराजी व्यक्त केली. ह्यावेळी मच्छीविक्रेत्या महिलासह शेतकरी महिलांसाठी प्रत्येक तालुक्यात मार्केट उभारणीसाठी जागा मिळावी ह्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. इथला ग्रामीण भाग तहानलेला असतांना मोखाड्यातील धरणाचे पाणी सिन्नर कडे वळविण्याचा डाव असल्याचे कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो ह्यांनी निदर्शनास आणून देताच सभागृहाने ह्याला ठाम विरोध केला. ह्यावेळी पाटबंधारे विभागांतर्गत मंजूर रस्त्याची कामे हाती न घेणे, वाडा येथील क्रीडा संकुलां साठी आलेल्या ७५ लाखाच्या निधीचा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिलेला धनादेश पेनल्टी लागल्याने बाऊन्स होणे,अखर्चीक निधी, बाबत अनेक लोकप्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित केले.

यावेळी मार्गदर्शन करताना पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत. जिल्ह्याच्या विकास कामांसाठी मिळणारा निधी १०० टक्के खर्च करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत. सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये मांडलेल्या विषयांची गांभिर्याने नोंद घ्यावी व त्यावर तातडीने कार्यवाही करावी. नियोजन समिती सदस्यांनी त्यांच्या तक्रारी लेखी स्वरुपात सादर कराव्यात. त्यांची दखल घेऊन कार्यवाही केली जाईल. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावयाच्या विषयांबाबत प्रस्ताव सादर करावेत.यावेळी पालघर जिल्ह्यातील पर्यटनावर आधारीत प्लिझंट पालघर या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.आदीवासी उपयोजनांसाठी ३३९.१२ कोटी

  • प्रारुप आराखड्यात सर्वसाधारण योजनेसाठी १२२.२९ कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ११.६१ कोटी रु पये आणि आदिवासी उपयोजनेसाठी ३२७.५१ कोटी रूपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
  • यंत्रणांकडील शिल्लक, बचत आणि अतिरिक्त मागणीच्या पुनर्विनयोजनास मान्यता देण्यात आली. जिल्हाधिकाºयांनी प्राप्त निधीच्या अनुषंगाने कार्यन्वयीन यंत्रणांनी केलेला खर्च व अनुषंगीक माहिती दिली.
  • सर्व जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला पत्रकारांना आमंत्रित करण्यात येते मात्र पालघर जिल्हा ह्याला अपवाद ठरत असून पत्रकारांना निमंत्रण दिले जात नाही. त्यामुळे पुढच्या बैठकी पासून पत्रकारांना निमंत्रण देण्यात यावे अशी मागणी ज्योती ठाकरे यांनी केली.
टॅग्स :palgharपालघर