शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पावसाळ्यात चिकू बागांना रोगांचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:57 IST

बागायतदारांना आर्थिक फटका : तालुका कृषी विभागाकडून उपाययोजनांविषयी आवाहन

अनिरुद्ध पाटील डहाणू : जुलै आणि आॅगस्ट महिन्यात चिकू फळपिकावर फायटोपथोरा या बुरशीजन्य रोगामुळे फळांवर काळे डाग पडतात. प्रथम जमीनीलगत आणि त्यानंतर संपूर्ण झाडाला लागण होऊन मोठ्या प्रमाणात फळगळ होऊन बागायतदारांनाना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. दरम्यान रोगाचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता प्राथमिक उपाय योजावेत, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी केले आहे.

चिकूला भौगोलिक मानांकन, फळपीक विमा कवच आदी सुविधा मिळू झाल्यानंतर निर्यातक्षम फळांचा दर्जा उत्तम राखणे आवश्यक आहे. याकरिता बागा रोगमुक्त होण्याकरिता विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान जुलै आणि आॅगस्ट महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान होत असल्याने बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. मादी पंतग फळाच्या देठावर, कळयांच्या पाकळ्यावर, तयार होत असलेल्या फळावर अंडी घालते. अंड्यातून बाहेर आलेली सूक्ष्म अळी देठाच्या भागाकडून कळीच्या पाकळ्या खाऊन फळात प्रवेश करून गरातून थेट बीमध्ये प्रवेश करते. अळी सूक्ष्म असल्याने तीने पाडलेले छिद्र फळ वाढताना भरून येते. फळाचे बाहेरून कोणतेही लक्षण दिसून येत नाही.योजावयाचे प्राथमिक उपाय:च्झाडावरील रोगट, कमी उत्पादन देणाऱ्या फांद्या कापून बोर्डोपेस्ट लावावे. बोर्डोपेस्ट तयार करताना १ किलो मोरचुद व १ किलो कळीचा चुना घेऊन १० ते ३० लिटर पाणी वापरावे. बोर्डोेपेस्ट वापराने फांद्याच्या कापलेले भागावर सूक्ष्म जिवाणू व बुरशीजन्य रोगाचे नियंत्रण होते.च्पाण्याचा निचरा होण्यासाठी शेतात चर काढावेत. बागेत खाली पडलेला पालापाचोळा, कचरा साफ नसल्याने किड व रोगास पोषक वातावरण तयार होते. याकरिता पावसाळ्यापूर्वी बाग स्वच्छ करून घ्यावी. जमिनीतील कोष व अळ्या नष्ट करण्यासाठी एकरी १२ किलो कार्बारील भुक्टी जमीनीत मिसळावी.बागेचे व्यवस्थापन करताना प्रोफेनोफॉस ५० टक्के प्रवाही १५ मि.लि. १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. याकरिता एक महिन्याने २.८ टक्के डेल्टामेथ्रीन १० मि.लि. त्यानंतर एक महिन्याने तिसºया फवारणीसाठी लॅम्डा सायहॅलोथ्रिन ५ टक्के १० मि.लि. आणि नंतर चौथ्या फवारणीसाठी इंडोक्झाकार्ब १४.५ टक्के ५ मि.लि. १० लि. पाण्यातून फवारणे आवश्यक असल्याची माहिती कृषी पर्यवेक्षक सुनील बोरसे यांनी दिली.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारFarmerशेतकरी