शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

नागरिकत्व कायद्याविरुद्ध रिक्षाचालकांचा ‘रास्ता रोको’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 23:39 IST

भिवंडीत रिक्षा वाहतूक बंद : विद्यार्थी, नोकरदार यांचे झाले हाल; ठिकठिकाणी आंदोलने

भिवंडी : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करवून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन झाले आहे, असा आरोप करीत भिवंडी तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाने सोमवारी रिक्षांचा १२ तासांचा बंद पुकारला होता. या बंदमध्ये शहरातील १९ रिक्षा संघटनांनी सहभाग घेतला होता. शहरातील आनंद दिघे चौक येथे दुपारी ३ वाजता काहीवेळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे भिवंडीतील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते.

सकाळी रिक्षाबंद आंदोलनामुळे शालेय विद्यार्थी, कामगार व नोकरदारवर्गाचे हाल झाले. मात्र, काही ठिकाणी रु ग्णांचे व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बंदमध्ये सहभाग न घेता रिक्षा रस्त्यावर उतरवून प्रवाशांना दिलासा दिला. त्यामुळे आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भिवंडीत काही दिवसांपासून विविध पक्ष व संघटनांमार्फत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी भिवंडीत तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाच्या वतीने आनंद दिघे चौकात ‘रस्ता रोको’ आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा कायदा रद्द करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली. देशामध्ये महागाई वाढत आहे. उद्योग, व्यवसाय डबघाईला आले आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे अनेक प्रश्न व समस्या असताना शासन मुक्याची भूमिका बजावत आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाने विकासात्मक धोरण राबवण्याऐवजी धार्मिक तृष्टीकरण करून जनतेला वेठीस धरले आहे. असा आरोप रिक्षाचालक संघटनेने केला. संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी खालीद खान, कॉ. सुनील चव्हाण, अस्लम काबाडी, अय्युब शेख, अख्तर (बाबू) शेख, अनंता गुळवी, इद्रीस शेख आदींसह रिक्षाचालक सहभागी झाले.भिवंडीत एमआयएमचा कॅण्डल मार्चभिवंडी : केंद्र शासनाने लागू केलेल्या एनआरसी व सीएए कायद्यांविरोधात सोमवारी सायंकाळी ६ वाजता एमआयएमचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील कोटर गेट मशीद ते जुनी महापालिका कार्यालय असा कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. सुरुवातीला कोटर गेट मशीद ते धर्मवीर आनंद दिघे चौक असा हा मार्च निघणार होता. मात्र, त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, या कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर १७ जानेवारी सुनावणी होणार असल्याचे गुड्डू यांनी सांगितले.मीरा रोडमध्ये समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीममीरा रोड : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात शहरात आंदोलने सुरू आहेत. त्याला उत्तर म्हणून भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी शनिवारी रात्रीपासून या कायद्यांच्या समर्थनार्थ आंदोलन व सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मात्र भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेने थेट स्वत:च्या नावाने हे आंदोलन करणे टाळले आहे. तर, विरोध आणि समर्थनार्थ चालणाऱ्या आंदोलनांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhiwandiभिवंडी