शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्व कायद्याविरुद्ध रिक्षाचालकांचा ‘रास्ता रोको’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 23:39 IST

भिवंडीत रिक्षा वाहतूक बंद : विद्यार्थी, नोकरदार यांचे झाले हाल; ठिकठिकाणी आंदोलने

भिवंडी : केंद्र सरकारने संसदेत मंजूर करवून घेतलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे राज्यघटनेच्या कलम १४ चे उल्लंघन झाले आहे, असा आरोप करीत भिवंडी तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाने सोमवारी रिक्षांचा १२ तासांचा बंद पुकारला होता. या बंदमध्ये शहरातील १९ रिक्षा संघटनांनी सहभाग घेतला होता. शहरातील आनंद दिघे चौक येथे दुपारी ३ वाजता काहीवेळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. यामुळे भिवंडीतील जनजीवन दिवसभर विस्कळीत झाले होते.

सकाळी रिक्षाबंद आंदोलनामुळे शालेय विद्यार्थी, कामगार व नोकरदारवर्गाचे हाल झाले. मात्र, काही ठिकाणी रु ग्णांचे व शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून काही रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बंदमध्ये सहभाग न घेता रिक्षा रस्त्यावर उतरवून प्रवाशांना दिलासा दिला. त्यामुळे आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. भिवंडीत काही दिवसांपासून विविध पक्ष व संघटनांमार्फत नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी भिवंडीत तालुका रिक्षा-चालक-मालक महासंघाच्या वतीने आनंद दिघे चौकात ‘रस्ता रोको’ आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत हा कायदा रद्द करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली. देशामध्ये महागाई वाढत आहे. उद्योग, व्यवसाय डबघाईला आले आहेत. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. असे अनेक प्रश्न व समस्या असताना शासन मुक्याची भूमिका बजावत आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाने विकासात्मक धोरण राबवण्याऐवजी धार्मिक तृष्टीकरण करून जनतेला वेठीस धरले आहे. असा आरोप रिक्षाचालक संघटनेने केला. संघाच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेऊन प्रांताधिकारी डॉ. मोहन नळदकर यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी खालीद खान, कॉ. सुनील चव्हाण, अस्लम काबाडी, अय्युब शेख, अख्तर (बाबू) शेख, अनंता गुळवी, इद्रीस शेख आदींसह रिक्षाचालक सहभागी झाले.भिवंडीत एमआयएमचा कॅण्डल मार्चभिवंडी : केंद्र शासनाने लागू केलेल्या एनआरसी व सीएए कायद्यांविरोधात सोमवारी सायंकाळी ६ वाजता एमआयएमचे शहर अध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या मार्गदर्शनाखाली कँडल मार्च काढण्यात आला. यामध्ये महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील कोटर गेट मशीद ते जुनी महापालिका कार्यालय असा कॅण्डल मार्च काढण्यात आला होता. सुरुवातीला कोटर गेट मशीद ते धर्मवीर आनंद दिघे चौक असा हा मार्च निघणार होता. मात्र, त्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, या कायद्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून त्यावर १७ जानेवारी सुनावणी होणार असल्याचे गुड्डू यांनी सांगितले.मीरा रोडमध्ये समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीममीरा रोड : नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स कायदा (एनआरसी) आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात शहरात आंदोलने सुरू आहेत. त्याला उत्तर म्हणून भाजपसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांनी शनिवारी रात्रीपासून या कायद्यांच्या समर्थनार्थ आंदोलन व सह्यांची मोहीम सुरू केली आहे. मात्र भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषदेने थेट स्वत:च्या नावाने हे आंदोलन करणे टाळले आहे. तर, विरोध आणि समर्थनार्थ चालणाऱ्या आंदोलनांमुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारbhiwandiभिवंडी