शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

रिक्षा सापडली आचारसंहितेच्या पेचात; भाजपाकडून तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 1:00 AM

मतदान केंद्रापासून २०० मीटरचा भाग हा प्रतिबंधित, रिक्षावाल्यांना फटका

- हितेन नाईक पालघर: बहुजन विकास आघाडीला रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षाची वाहतूक बंद ठेवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी एकी कडे केल्याने रिक्षा चालकामधून तीव्र संताप व्यक्त केला जात असताना दुसरी कडे दिव्यांग, जेष्ठ नागरिक आणि रु ग्णांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्यात येणाºया रिक्षावर निवडणूक निर्णय अधिकाºया कडून ही मज्जाव करण्यात येणार असल्याने जेष्ठांना मतदान केंद्रा पर्यंत पोचायला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.बहुजन विकास आघाडीकडून शिट्टी हे चिन्ह भाजप-सेनेच्या प्रयत्नाने हिसकावून घेतल्या नंतर बविआ उमेदवार बळीराम जाधव यांना रिक्षा चिन्ह मिळाल्याने मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार शुक्ला यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या कडे केली आहे. बहुजन विकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक बिथरले असून उद्या आम्हाला रेल्वे इंजिन चिन्ह मिळाले असते तर सर्व रेल्वे सेवा बंद ठेवली असती का? असा प्रश्न आमदार हितेंद्र ठाकूर यांनी उपस्थित करून कमळ, घड्याळ, हाताचा पंजा, या चिन्हा बाबत काय? असा उपप्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.आरटीओकडून जिल्ह्यात सुमारे ३३ हजार रिक्षाचीं नोंद करण्यात आली असून गरीब रिक्षाधारकांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह रिक्षावर चालत असतो. आज हजारो रिक्षाचा वापर प्रचारासाठी केला जात असून या व्यवसायातून चांगले उत्पन्न रिक्षा धारकांना मिळत आहे. तर अनेक दिव्यांग, जेष्ठ नागरिक, रु ग्णांना मतदान केंद्रापर्यंत पोचिवण्यासाठी रिक्षाची व्यवस्था करण्यात येते. मतदान केंद्रा पासून २०० मीटर चा भाग हा प्रतिबंधित भाग म्हणून रेखांकित केला जातो. या प्रतिबंधित भागा मध्ये प्रचार करण्यास, उमेदवारी चिन्ह नेण्यास, मतदारांना प्रभावीत करण्यास निवडणूक निर्णय विभागाने बंदी घातली आहे.वसई, विरार तसेच अन्य भागात मोठ्या प्रमाणात रिक्षा ची वाहतूक सुरू असत. त्यात बविआ चे कार्यकर्ते या दरम्यान मतदारांना आॅटो रिक्षा दाखवून त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करतील अशी तक्रार शुक्ला यांनी केली आहे. दरम्यान, आ. ठाकूर यांनीही सर्वसामान्यांची ओळख असा रिक्षाचा प्रचार केला आहे. त्यामुळे २९ एप्रिल रोजी होणाºया मतदानाच्या दिवशी सर्व रिक्षा प्रतिबंधित भागाच्या बाहेर ठेवाव्यात अथवा त्यादिवशी सर्व रिक्षा बंद ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. नारनवरे यांची भेट घेत विचारले असता प्रतिबंधित भागापर्यंत वाहने नेण्यास यापूर्वीही बंदी होती आणि ती आताही राहणार आहे.भाजपच्या पदाधिकाºया कडून आमच्या व्यवसायावर गदा आणण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यातील सर्व रिक्षाधारक रस्त्यावर उतरून आंदोलन उभारू अश्या प्रतिक्रि या रिक्षाधारका कडून व्यक्त केल्या जात आहेत.तीन हजार २०० जणांची नोंद सर्वच पक्षांसमोर ठरणार आव्हाननिवडणूक आयोगाच्या सूचनानुसार ज्या मतदारांना मतदान केंद्रा पर्यंत पोचण्यास त्रास होत असेल अशा ३ हजार २०० मतदारांची नोंद मतदान यादी वरून करण्यात आली असून व्हीलचेअर वरून त्यांना मतदान केंद्रा पर्यंत नेण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले.सातपाटी सह किनारपट्टीवरील अनेक गावातील मतदान केंद्रा समोर मोठया वाळूचे ढीग असल्याने व्हील चेअर चा उपयोग होणार नसल्याने आणि रिक्षांना परवानगी नसल्याने मतदानासाठी आलेल्या अनेक जेष्ठ नागरिक, दिव्यांग,आजारी रु ग्णांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019palghar-pcपालघर