शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जलचरांनी बहरले बावखल, राकेश रिबेलो या तरूणाचे अथक परिश्रम आले फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 01:09 IST

वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे.

नालासोपारा - वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्या नष्ट होत असताना वसईतील एका तरूणाने गावातील कचरा व मातीने गाडलेली बावखल पुन्हा जिवंत करून दाखवले आहे. राकेश रिबेलो असे या तरूणाचे नाव असून त्याने एकट्याने बुजलेलीे बावखल पुन्हा जीवंत केले. ती मध्ये गोड्या पाण्याचे झरे आढळल्याने बावखल पाण्याने भरून गेले आहेत. त्यात कासव, मासे आदींची सद्या रेलचेल पहायला मिळत आहे.वसईतील पश्चिम पट्यात वाडी, शेतीसाठी व इतर कामांसाठी याच बावखलाचा वापर होतो. बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी बावखले महत्वाचे काम करतात. वसईचा भू प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकांचा बेपर्वा वृत्तीमुळे बावखळे नष्ट होऊ लागली आहेत. परिणामी पर्यावरणाचा समतोलही बिघडू लागला आहे. वसईतील पुर्वी ५०० हून अधिक असणाऱ्या बावखलांची संख्या ३०० पेक्षा कमी झाली असून जी आहेत त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे.रमेदी गावातील खोपवाडी येथे जूने बावखल होते. त्यात रहाट लावून ग्रामस्थ पाणी भरत असत. तसेच, या मुळे परिसरातील कुपनलिका आणि विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असायची. त्या भोवती हिरवी झाडी असल्याने विविध पक्षी येत असत. मात्र, काहींनी मातीचा भराव आणि कचरा टाकून बावखल बुजवून टाकले होते.बोटीवरून गावात परतलेल्या राकेश ने या बावखलाचे महत्व ओळखून ते पुन्हा तयार करण्याचे ठरवले. ग्रामस्थांची परवानगी घेतली मात्र, कुणी प्रत्यक्ष मदतीला आले नाही. त्यामुळे त्याने काही दिवस काम करून कचरा काढून बावखल स्वच्छ केला. त्यानंतर जेसीबी आणून मातीचा भराव काढला. या बावखलाच्या खाली गोड पाण्याचे झरे लागले. काही दिवसात ते बावखल स्वच्छ पाण्याने भरुन गेले आहे. या बावखलात रहाटासाठी लागणारा खुंट, चर्चचा एक क्र ॉस आढळला. या प्रयत्नामुळे तेथे विविध जातीचे मासे आणि कासवे आले आहेत. गावातील तरु ण मासेमारीचा आनंद घेण्यासाठी या बावखलात आता येत असतात.बावखल पुन्हा तयार झाल्याने खोपवाडीची शोभा पुन्हा पुर्ववत झाली आहे. हे गावाचे वैभव असल्याचे गावकरी सांगतात. कुणावर अवलंबून रहाण्यापेक्षा मी स्वत: हे काम केले आणि एक बावखळ वाचवू शकलो याचा मला आनंद आहे असे राकेशने सांगितले. वसईत बावखले वाचिवण्याची मोहीम सुरू आहे. अशा वेळी राकेशने जिवंत करून दाखवलेले बावखल या मोहीमेसाठी स्फूर्तीदायी ठरू शकणार आहे.बावखल म्हणजे काय?पाण्याचा साठा करण्यासाठी खड्डा बनवलेला असतो. त्यास वसईतल्या बोलीभाषेत बावखळ किंवा बावखले असे म्हणतात. बाव म्हणजेच विहीर होय. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गाड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. पूर्वी रहाट बसवून वाडी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी तसेच पाणी पिण्यासाठी देखील याचा वर्षभर वापर केला जात असे.उत्तर कोकणातील काही भागात आजही याचा वापर होतो. बावखलामुळे जमिनीत ओलसरपणा राहतो. त्यामुळे, आजू-बाजूच्या विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहते.’’ बावखलाच्या पाण्यात आजू-बाजूला झाडे-झुडपे फुलत असत. पूर्वी मुले बावखलात पोहोण्यासाठी देखील जात असत. बावखले ही वसईच्या पारंपारिक संस्कृतीची ओळख आहे. बावखलाजवळील गर्द हिरव्या झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाई.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या