शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जलचरांनी बहरले बावखल, राकेश रिबेलो या तरूणाचे अथक परिश्रम आले फळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 01:09 IST

वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे.

नालासोपारा - वसई म्हटलं की डोळ्यासमोर येते ती हिरव्यागार केळीच्या बागा व लांबच लांब पसरलेली नारळ-पोकळीची झाडे. वसईच्या संस्कृतीचे प्रतिक असलेले आणि पर्यावरणाचा समतोल टिकविणारी बावखले (शेत तळी) यामुळे हा वसईचा पट्टा नेहमी हिरवीगार राहिला आहे. मात्र, गेल्या काही वर्षात त्या नष्ट होत असताना वसईतील एका तरूणाने गावातील कचरा व मातीने गाडलेली बावखल पुन्हा जिवंत करून दाखवले आहे. राकेश रिबेलो असे या तरूणाचे नाव असून त्याने एकट्याने बुजलेलीे बावखल पुन्हा जीवंत केले. ती मध्ये गोड्या पाण्याचे झरे आढळल्याने बावखल पाण्याने भरून गेले आहेत. त्यात कासव, मासे आदींची सद्या रेलचेल पहायला मिळत आहे.वसईतील पश्चिम पट्यात वाडी, शेतीसाठी व इतर कामांसाठी याच बावखलाचा वापर होतो. बावखले म्हणजे मोठा खड्डा त्यात पावसाचे पाणी जमा केले जाते. पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी बावखले महत्वाचे काम करतात. वसईचा भू प्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गोड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. मात्र, वाढत्या शहरीकरणामुळे आणि लोकांचा बेपर्वा वृत्तीमुळे बावखळे नष्ट होऊ लागली आहेत. परिणामी पर्यावरणाचा समतोलही बिघडू लागला आहे. वसईतील पुर्वी ५०० हून अधिक असणाऱ्या बावखलांची संख्या ३०० पेक्षा कमी झाली असून जी आहेत त्यांचीही अवस्था वाईट झाली आहे.रमेदी गावातील खोपवाडी येथे जूने बावखल होते. त्यात रहाट लावून ग्रामस्थ पाणी भरत असत. तसेच, या मुळे परिसरातील कुपनलिका आणि विहिरींची पाण्याची पातळी वाढलेली असायची. त्या भोवती हिरवी झाडी असल्याने विविध पक्षी येत असत. मात्र, काहींनी मातीचा भराव आणि कचरा टाकून बावखल बुजवून टाकले होते.बोटीवरून गावात परतलेल्या राकेश ने या बावखलाचे महत्व ओळखून ते पुन्हा तयार करण्याचे ठरवले. ग्रामस्थांची परवानगी घेतली मात्र, कुणी प्रत्यक्ष मदतीला आले नाही. त्यामुळे त्याने काही दिवस काम करून कचरा काढून बावखल स्वच्छ केला. त्यानंतर जेसीबी आणून मातीचा भराव काढला. या बावखलाच्या खाली गोड पाण्याचे झरे लागले. काही दिवसात ते बावखल स्वच्छ पाण्याने भरुन गेले आहे. या बावखलात रहाटासाठी लागणारा खुंट, चर्चचा एक क्र ॉस आढळला. या प्रयत्नामुळे तेथे विविध जातीचे मासे आणि कासवे आले आहेत. गावातील तरु ण मासेमारीचा आनंद घेण्यासाठी या बावखलात आता येत असतात.बावखल पुन्हा तयार झाल्याने खोपवाडीची शोभा पुन्हा पुर्ववत झाली आहे. हे गावाचे वैभव असल्याचे गावकरी सांगतात. कुणावर अवलंबून रहाण्यापेक्षा मी स्वत: हे काम केले आणि एक बावखळ वाचवू शकलो याचा मला आनंद आहे असे राकेशने सांगितले. वसईत बावखले वाचिवण्याची मोहीम सुरू आहे. अशा वेळी राकेशने जिवंत करून दाखवलेले बावखल या मोहीमेसाठी स्फूर्तीदायी ठरू शकणार आहे.बावखल म्हणजे काय?पाण्याचा साठा करण्यासाठी खड्डा बनवलेला असतो. त्यास वसईतल्या बोलीभाषेत बावखळ किंवा बावखले असे म्हणतात. बाव म्हणजेच विहीर होय. वसईचा भूप्रदेश चारही बाजूंनी खाडी आणि समुद्राने वेढलेला आहे. त्यामुळे गाड्या पाण्याच्या साठ्यासाठी त्या काळात बावखलांची संकल्पना राबवण्यात आली. पूर्वी रहाट बसवून वाडी, शेतीसाठी आणि इतर कामांसाठी तसेच पाणी पिण्यासाठी देखील याचा वर्षभर वापर केला जात असे.उत्तर कोकणातील काही भागात आजही याचा वापर होतो. बावखलामुळे जमिनीत ओलसरपणा राहतो. त्यामुळे, आजू-बाजूच्या विहिरींतील पाण्याची पातळी टिकून राहते.’’ बावखलाच्या पाण्यात आजू-बाजूला झाडे-झुडपे फुलत असत. पूर्वी मुले बावखलात पोहोण्यासाठी देखील जात असत. बावखले ही वसईच्या पारंपारिक संस्कृतीची ओळख आहे. बावखलाजवळील गर्द हिरव्या झाडांमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाई.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारnewsबातम्या