शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

विरारच्या पापडखिंड धरण धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2019 3:25 PM

विरार शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील पापडखिंड धरण धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे.

ठळक मुद्देविरार शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील पापडखिंड धरण धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. लांब पल्ल्याचा प्रवास न करता अगदी विरार शहराला लागून असलेले धरण पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे. धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे.

वसई - विरार शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागातील पापडखिंड धरण धबधबा सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो आहे. लांब पल्ल्याचा प्रवास न करता अगदी विरार शहराला लागून असलेले धरण पाहण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे. मात्र या धबधब्यावर तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे डोंगरावरून दरड कोसळून मोठा जीवावर बेतणारा अपघात होण्याची भीती अन्य उपस्थित पर्यटकांकडूनच व्यक्त होत आहे.  

पालघर, वसई हा पूर्व पश्चिम भाग बऱ्यापैकी निसर्गरम्य वातावरण, हिरवेगार डोंगर, पाण्याचे ओहोळ नानाविध कारणांनी उजवा आहे. यापैकी  उत्तम असे हे ठिकाण म्हणून विरार पूर्वेकडील पापडखिंडकडे पाहिले जाते. हा परिसर दरवर्षी पावसाळ्यात व आताही पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. सुट्टीच्या दिवशी अथवा पावसामुळे रेल्वे सेवा बंद असल्यास या धबधब्यावर वसई-विरारकरांची मोठी गर्दी दिसून येते. मात्र आता काही तरूणांकडून याठिकाणी मद्यपान करून हुल्लडबाजी सुरू आहे. 

पावसाळ्याचे दिवस असल्याने डोंगरावरील दगडही कमकुवत होत असतात.  त्यातच हे तरुण डोंगराच्या टोकापर्यंत टोळक्याने जातात. डोंगरावरून दरड कोसळण्याची घटना घडू शकण्याची भीती पर्यटक व्यक्त करत आहेत.

पापडखिंड धरणाच्या पाण्यात उतरू नये ?

पापडखिंड धरणाच्या पाण्यात गेल्या वर्षी अनेक तरुणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना काळजी म्हणून यंदा या धरणाच्या  पाण्यात कोणीही तरुण अथवा पर्यटक पोहण्यासाठी उतरू नये यासाठी वसई विरार महापालिकेने या भागात दोन सुरक्षारक्षक कार्यरत ठेवले आहेत. मात्र धबधब्यावर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने तरुणांची हुल्लडबाजी सुरू आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस