शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

भर उन्हात शेतकऱ्यांच्या भात बियाण्यांसाठी रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 1:22 AM

भर उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. तर बियाणे न मिळाल्याने असंख्य शेतकरी रिकाम्या हाताने परतले.

वाडा : बाजारभावाच्या अर्ध्या किमतीत शेतकऱ्यांना भात बियाण्यांचे वाटप करण्याचा कार्यक्रम पंचायत समिती कृषी विभागाकडून हाती घेण्यात आला होता. मंगळवारी संध्याकाळी होणाºया या वाटपासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच रांगा लावल्याचे दिसून येत होते. मात्र, प्रशासनाच्या नियोजनाअभावी, कृषी विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि अपुºया कर्मचाºयांमुळे शेतकºयांना भर उन्हात तासन्तास ताटकळत उभे राहावे लागले. तर बियाणे न मिळाल्याने असंख्य शेतकरी रिकाम्या हाताने परतले.

तालुक्यातील शेतकºयांसाठी पंचायत समितीकडून भात बियाणे वाटप करणार असल्याचे पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून कळवण्यात आले होते. या भात बियाण्यांचे टोकन वाड्यातील जिल्हा परिषद शाळा-१ मध्ये दिले जात होते. तर भात बियाणांचे प्रत्यक्ष वाटप पंचायत समितीसमोरील शासकीय गोदामात करण्यात येत होते. हे भात बियाणे घेण्यासाठी शेतकºयांनी पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लावल्या होत्या.

एकीकडे राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकºयांना बांधावर बियाणे तसेच खते, औषधे पुरवावीत अशा सूचना प्रशासनाला केल्या. तरीही शेतकºयांना उन्हातान्हात रांगा लावून ताटकळत उभे राहावे लागल्याचे चित्र या वेळी दिसले.

पंचायत समितीकडून तालुक्यातील शेतकºयांसाठी ४२० क्विंटल भात बियाण्यांची मागणी केली होती. मात्र शासनाकडून पहिल्या टप्प्यात अवघे १९० क्विंटलच भातबियाणे प्राप्त झाल्याने तालुक्यातील केवळ ७०० शेतकºयांनाच हे भात बियाणे मिळाले. त्यामुळे उपस्थित उर्वरित हजारो शेतकºयांना रिकाम्या हातानेच परतावे लागले.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार