शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
5
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
6
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
7
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
8
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
9
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
10
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
11
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
12
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
13
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
14
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
15
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
16
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
17
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
18
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
19
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
20
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण

स्थानिक शिक्षकांना प्राधान्य, अनेक आंदोलनांना अखेर आले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 02:18 IST

जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे.

हितेन नाईक पालघर : जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे. पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रि या पार पडल्याने पालघर जिल्हा परिषदेने एक वेगळा आदर्श पायंडा पाडला आहे.जिल्हा परिषदेच्या ८ वी इयत्तेपर्यंतच्याच शाळा असूूून ८ वी उत्तीर्ण होऊन गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना इतर शाळेत अतिरिक्त तुकड्या उपलब्ध नसल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची दाट शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने शाळांतील ९ वी व १० वी च्या अतिरिक्त तुकड्याना मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे जिल्हा परिषद शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांना धाडला होता. हे अतिरिक्त विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता अखेर शालेय शिक्षण विभागाने ३१ जुलै २०१५ ला त्यास मान्यता दिली. या अंतर्गत जिल्ह्यातील ६० शाळांचा तुकडी वाढीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३९ शाळांतील या तुकड्यांसाठी तात्पुरत्या ११४ शिक्षक भरतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शेष फंडातून मंजूर केला. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी), वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचा समावेश असलेली निवड समिती स्थापन करण्यात आली आणि शिक्षण विभागाकडून वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. याअंतर्गत उमेदवारांनी अध्यापक शिक्षण केलेल्या विद्यापीठातून मिळविलेल्या गुणांकानुसार त्यांची पात्रता ठरविण्यात आली. विशेष बाब म्हणजे यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले असून यात त्यांना २० अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत.या शिक्षक भरतीसाठी जि. प.शिक्षण विभागाने विज्ञान, गणित व इंग्रजी विषयासाठी शिकविणाºया उमेदवारांचे अर्ज १२ ते १९ जुलै २०१८ पर्यंत मागविले. यामध्ये ४५६ अर्ज प्राप्त झाले. २० ते २४ जुलै पर्यंत आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर २५ जुलै रोजी तात्पुरत्या पात्र उमेदवारांच्या याद्या घोषित करण्यात आल्या. यानंतर अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या. यामध्ये ३१ उमेदवारांनी हरकती घेतल्या. त्याची शहानिशा करून काही मान्य करण्यात आल्या व त्या वेबसाईट वर अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड करण्यात आल्या.>नियुक्ती नऊ महिन्यांसाठी मासिक मानधन आठ हजार रुपयेजिल्ह्यात शिक्षकांची ११४ पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे कारण देऊन आंदोलन करून शाळेला टाळे ठोकण्याचे प्रकार वाढीस लागले होते. शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत ह्यासाठी शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव गेला आहे. जि.प.ने स्वत:च्या शेष फंडातून निधीची व्यवस्था करून ७५ पदे भरण्यात यश मिळविले आहे. ९ महिन्यांसाठी ८ हजार रु पये मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरीत ३९ पदे टप्प्या टप्प्याने भरली जातील. शिक्षण विभागाकडील रिक्त जागांचा प्रश्न सुटल्यास ९ महिन्यानंतर या नियुक्त्या आपोआपच बरखास्त होतील. मात्र शासनस्तरावर हा प्रश्न ताटकळत राहिल्यास या ७५ शिक्षकांना पुढची मुदतवाढ मिळू शकते.>स्थानिकांना प्राधान्य देताना गुणवान शिक्षक मिळावेत म्हणून पारदर्शक निवड केली आहे. -राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारीस्थानिकांचा त्यांचा अधिकार मिळवून देणारी व त्यांना न्याय देणारी ही भरती आहे. - हरेश गावित,सायवन जि. प.शाळा डहाणू

टॅग्स :Teacherशिक्षक