शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
4
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
5
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
6
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
7
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
8
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
9
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
10
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
11
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
12
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
13
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
14
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
15
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
16
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
17
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
18
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
19
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

स्थानिक शिक्षकांना प्राधान्य, अनेक आंदोलनांना अखेर आले यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 02:18 IST

जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे.

हितेन नाईक पालघर : जिल्हा परिषदेने तात्पुरत्या स्वरूपाच्या ९ वी व १० वी वर्गासाठीच्या अध्यापकांसाठी केलेल्या भरतीत जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच स्थानिकांना प्रथम प्राधान्य देऊन ७५ पैकी ६३ स्थानिक शिक्षक उमेदवारांची निवड केली आहे. पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रि या पार पडल्याने पालघर जिल्हा परिषदेने एक वेगळा आदर्श पायंडा पाडला आहे.जिल्हा परिषदेच्या ८ वी इयत्तेपर्यंतच्याच शाळा असूूून ८ वी उत्तीर्ण होऊन गेलेल्या बहुतांश विद्यार्थ्यांना इतर शाळेत अतिरिक्त तुकड्या उपलब्ध नसल्याने ते शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकले जाण्याची दाट शक्यता होती. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने शाळांतील ९ वी व १० वी च्या अतिरिक्त तुकड्याना मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांद्वारे जिल्हा परिषद शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांना धाडला होता. हे अतिरिक्त विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये याकरिता अखेर शालेय शिक्षण विभागाने ३१ जुलै २०१५ ला त्यास मान्यता दिली. या अंतर्गत जिल्ह्यातील ६० शाळांचा तुकडी वाढीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानुसार जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ३९ शाळांतील या तुकड्यांसाठी तात्पुरत्या ११४ शिक्षक भरतीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने शेष फंडातून मंजूर केला. यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली उप मुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवी), वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचा समावेश असलेली निवड समिती स्थापन करण्यात आली आणि शिक्षण विभागाकडून वृत्तपत्रात जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या. याअंतर्गत उमेदवारांनी अध्यापक शिक्षण केलेल्या विद्यापीठातून मिळविलेल्या गुणांकानुसार त्यांची पात्रता ठरविण्यात आली. विशेष बाब म्हणजे यासाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात आले असून यात त्यांना २० अतिरिक्त गुण देण्यात आले आहेत.या शिक्षक भरतीसाठी जि. प.शिक्षण विभागाने विज्ञान, गणित व इंग्रजी विषयासाठी शिकविणाºया उमेदवारांचे अर्ज १२ ते १९ जुलै २०१८ पर्यंत मागविले. यामध्ये ४५६ अर्ज प्राप्त झाले. २० ते २४ जुलै पर्यंत आलेल्या अर्जाच्या छाननीनंतर २५ जुलै रोजी तात्पुरत्या पात्र उमेदवारांच्या याद्या घोषित करण्यात आल्या. यानंतर अर्ज भरलेल्या सर्व उमेदवारांच्या हरकती मागविण्यात आल्या. यामध्ये ३१ उमेदवारांनी हरकती घेतल्या. त्याची शहानिशा करून काही मान्य करण्यात आल्या व त्या वेबसाईट वर अंतिम यादी प्रसिद्ध करून निवड करण्यात आल्या.>नियुक्ती नऊ महिन्यांसाठी मासिक मानधन आठ हजार रुपयेजिल्ह्यात शिक्षकांची ११४ पदे रिक्त असल्याने अनेक शाळांमध्ये शिक्षक नसल्याचे कारण देऊन आंदोलन करून शाळेला टाळे ठोकण्याचे प्रकार वाढीस लागले होते. शिक्षकांची रिक्त पदे भरली जावीत ह्यासाठी शिक्षण विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव गेला आहे. जि.प.ने स्वत:च्या शेष फंडातून निधीची व्यवस्था करून ७५ पदे भरण्यात यश मिळविले आहे. ९ महिन्यांसाठी ८ हजार रु पये मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली असून उर्वरीत ३९ पदे टप्प्या टप्प्याने भरली जातील. शिक्षण विभागाकडील रिक्त जागांचा प्रश्न सुटल्यास ९ महिन्यानंतर या नियुक्त्या आपोआपच बरखास्त होतील. मात्र शासनस्तरावर हा प्रश्न ताटकळत राहिल्यास या ७५ शिक्षकांना पुढची मुदतवाढ मिळू शकते.>स्थानिकांना प्राधान्य देताना गुणवान शिक्षक मिळावेत म्हणून पारदर्शक निवड केली आहे. -राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारीस्थानिकांचा त्यांचा अधिकार मिळवून देणारी व त्यांना न्याय देणारी ही भरती आहे. - हरेश गावित,सायवन जि. प.शाळा डहाणू

टॅग्स :Teacherशिक्षक