शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पालघरमध्ये अतिवृष्टीमुळे वीजपुरवठा खंडीत, 2 दिवस पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 09:31 IST

प्लांटमधील वीज खंडितमुळे वसई-विरार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

ठळक मुद्देवसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट (पालघर) परिसरात बुधवार पासून अतिवृष्टी तसेच जोराचा वारा सुरू आहे

वसई - पालघर जिल्ह्यात पाऊस पडत असून बुधवार संध्याकाळपासून पालघर जंगलपट्टी भागात सोसाट्याचा वारा व अतिवृष्टीमुळे येथील वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्याच्या दोन्ही फिल्टर प्लांटचा वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे याचा विपरीत परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यातच येथील धुकटंन व मासवण फिल्टर प्लांट मधील वीजखंडीत जोपर्यंत सुरळीत चालू होत नाही तोपर्यंत गुरुवारी देखील वसई विरार शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा नियंत्रक अधिकाऱ्याने लोकमतला दिली.

वसई विरार शहर महानगरपालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या मासवण पंपिंग स्टेशन व धुकटन फिल्टर प्लांट (पालघर) परिसरात बुधवार पासून अतिवृष्टी तसेच जोराचा वारा सुरू आहे. १ डिसेंबर रोजी रात्री ७.४५ ते रात्री ८.४५ असा 1 तास म.रा.वि.म.(MSEB)विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे रात्री ७.४५ च्या रात्री ते ९.४५ असा  २ तास सूर्या धरणातून होणारा शहरातील पाणी पुरवठा पूर्ण पणे बंद होता. परिणामी गुरुवार २ डिसेंबर रोजी पहाटे ४.३० पासून म.रा.वि.म. (MSEB) चा विद्युत पुरवठा खंडित झाला असून काही तांत्रिक बिघाड झाल्या मूळे  हा विद्युत पुरवठा सकाळी ७.०० वाजे पर्यंत खंडीतच होता. एकुणच सदरचा तांत्रिक बिघाड दुरुस्ती नंतर म.रा.वि.म.(MSEB) चा विद्युत पुरवठा  सुरळीत झाल्या नंतरच आता वसई विरार शहरातील सूर्या धरणातून होणारा पाणीपुरवठा सुरू होईल, असेही महापालिका प्रशासनाने कळवले आहे. त्यामुळे गुरुवारी शहरात होणारा पाणी पुरवठा अनियमित आणि कमी प्रमाणात होईल तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे विनंती वजा आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केलं आहे.  

टॅग्स :Vasai Virarवसई विरारWaterपाणीpalgharपालघरRainपाऊस