शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

वसईत ११४ संशयित डेंग्यू रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 23:15 IST

१० महिन्यांची आकडेवारी : तर मलेरिया रुग्णांची संख्या ५० वर

मंगेश कराळे 

नालासोपारा : वसई तालुक्यात कचऱ्यामुळे मलेरिया आणि डेंगूचा प्रसार होत असून मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसते आहे. आरोग्य विभाग कीटकनाशके आणि औषधांवर कोट्यवधी रूपये खर्च करत असून हा खर्च कागदावर दाखवण्यापुरताच मर्यादित आहे का, अशी विचारणा नागरिक करत आहेत.

वसई - विरार मनपाच्या काही प्रभागात घाणीचे साम्राज्य, कचºयाचे ढीग आणि दुर्गंधी यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचे रु ग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. मनपा तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची रांग लागलेली आहे. जानेवारी २०१९ ते ३१ आॅक्टोबर २०१९ पर्यंत ११४ संशयित डेंग्यू तर मलेरियाचे ५० रु ग्ण आढळून आल्याचे वैद्यकीय आरोग अधिकारी डॉ. तबस्सुम काझी यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. शहरातील कचरा आणि डासांची संख्या काही कमी झालेली नाही. दरम्यान, विरारच्या सहकार नगरमधील एकाच परिवाराच्या चार जणांना डेंग्यूची लागण झाल्याचेही कळते.मनपा हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूचे रुग्ण याची संख्या हजारोंच्या घरात असल्याची माहिती एका डॉक्टर अधिकाºयाने नाव न सांगण्याचा अटीवर दिली. खाजगी क्लिनिक आणि हॉस्पिटलमध्ये आरोग्य विभागाने आदेश काढून डेंग्यू, मलेरिया रुग्णाची माहिती देण्यासाठी आदेश काढले पाहिजे, अशीही मागणी जोर धरू लागली आहे.डेंग्यूच्या कचाट्यात पोलीस : वालीव पोलीस ठाण्याच्या दोन पोलिसांना डेंग्यूची लागण झाली होती. गोपनीय विभागातील पोलीस हवालदार रवी पवार, बाफाने चौकी येथील पोलीस नाईक घुगे आणि पोलीस कर्मचारी सोनवणे यांच्या मुलीला डेंग्यूची लागण झाली होती. त्यावेळी त्यांना उपचारासाठी ग्लोबल, प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तुळींज पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी आणि अधिकाºयालाही डेंग्यूची लागण झाल्याचे समजते.कीटकनाशके आणि औषधांची फवारणी महानगरपालिकेकडून करण्यात येत नसल्यामुळे ही रोगराई आणि डासांची संख्या वाढली आहे.- मनीषा वाडकर, संतप्त नागरिकमनपा रुग्णालयातील ओपीडीमध्ये आलेल्या पेशंटच्या नोंदीवरून आरोग्य विभाग माहिती देते. कोणीही काही सांगितले तरी तो आकडा ग्राह्य धरला जात नाही. - बळीराम पवार, आयुक्त, वसई मनपा

टॅग्स :Vasai Virarवसई विरार